शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

भारताकडून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य वेळेपूर्वीच साध्य; नरेंद्र मोदी यांची ‘माती वाचवा’ अभियानात माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 05:44 IST

PM Modi attends programme on Save Soil Movement : सद्गुरू योगी वासुदेव यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘माती वाचवा’अभियानाअंतर्गत आज विज्ञान भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण संरक्षणासाठी व कार्बन उत्सर्जनाच्याविरोधात भारत करीत असलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली.

नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये इथेनॉलचे १० टक्क्यांपर्यंत मिश्रण करण्याचे लक्ष्य भारताने निर्धारित वेळेच्या पाच महिने आधीच साध्य केले आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत दिली.

सद्गुरू योगी वासुदेव यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘माती वाचवा’अभियानाअंतर्गत आज विज्ञान भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण संरक्षणासाठी व कार्बन उत्सर्जनाच्याविरोधात भारत करीत असलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, पेट्रोलमध्ये १० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रण लक्ष्य केंद्र सरकारने ठरविले होते. ते निश्चित कालमर्यादेच्या ५ महिने अगोदरच गाठल्याचे माेदी म्हणाले. 

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी भारत गेल्या आठ वर्षांपासून विविध पावले उचलत असल्याचे सांगून ते म्हणाले, मृदा आरोग्य कार्ड, नमामि गंगे, सेंद्रिय शेतीच्या प्रयोगातून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी काम केले जात आहे. विकसित देश कार्बन उत्सर्जनात आघाडीवर असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. भारत २०७० पर्यंत कार्बन उत्सर्जन मुक्त देश होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कार्बन उत्सर्जनात मोठी घटइथेनॉलचे प्रमाण वाढविल्यामुळे कार्बन उत्सर्जनात २७ लाख टन एवढी घट झाली आहे. तसेच ४१ हजार कोटी रुपयांचे विदेशी चलन वाचले आहे. शेतकऱ्यांना ४० हजार कोटी रुपयांचे अधिक उत्पन्न होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

‘रासायनिक खतांचा वापर टाळणे धोक्याचे ठरेल...’

- शेतकऱ्यांनी रासायनिक खते व औषधींचा वापर टाळल्यास शेतीच्या उत्पादनावर परिणाम होईल. यामुळे समर्थ पर्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांना रासायनिक शेतीपासून दूर करु नये, असे स्पष्ट मत सद्गुरू वासुदेव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.- सद्गुरू वासुदेव म्हणाले, की रासायनिक खतांमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले, हे सत्य आहे. हरित क्रांतीमुळे शेतकऱ्यांचे प्रति एकर उत्पादन वाढले आहे, हे नाकारता येणार नाही. - रासायनिक खते व औषधींना पर्याय द्यावा लागेल किंवा शेतकऱ्यांना पुरेशी सबसिडी द्यावी लागेल, त्यानंतर रासायनिक खतांच्या वापरावर प्रतिबंध लावण्याचा विचार करता येईल, अन्यथा देशात अन्नधान्याचा तुटवडा पडेल, असा इशारा त्यांनी दिला.

भारतात तीव्रता अधिकभारत व जगातील इतर देशांमध्ये पर्यावरणाचे प्रश्नच जवळपास सारखेच असले तरी त्यांची तीव्रता भारतात अधिक आहे. भारताची लोकसंख्या जगाच्या १७ टक्के आहे; परंतु भूप्रदेश जगाच्या केवळ चार टक्के एवढाच आहे. लोकसंख्या व भूप्रदेशाच्या प्रमाणामुळे इतर देशांमध्ये समस्यांची तीव्रता निश्चितपणे कमी असल्याचे सद्गुरू वासुदेव यांनी सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीenvironmentपर्यावरण