शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

स्वतंत्र्य भारतात ही दुसरी निवडणूक ज्यात महागाईचा मुद्दा नाही - राजनाथ सिंह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 09:28 IST

आम्ही देशाच्या शत्रुंना कधीच सोडणार नाही. आमचे जवान पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक करायला गेले होते. त्याठिकाणी पिकनिकला गेले नव्हते म्हणून काँग्रेस पुरावे मागते

मंडी - भारताच्या निवडणुकीचा इतिहास पाहिला तर प्रत्येक निवडणुकीत महागाईचा मुद्दा असायचा. काँग्रेसच्या शासनकाळात महागाईचा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत यायचा. मात्र 2004 आणि 2019 च्या निवडणुकांमध्ये महागाई हा मुद्दा आला नाही. कारण भाजपा सरकारचं आर्थिक धोरणाचं नियोजन अशारितीने केले होते त्यात महागाईवर नियंत्रण मिळवता आले असा दावा केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी येथे प्रचारसभेत ते बोलत होते. 

यावेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, 2004 च्या आधी अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार होतं तर 2019 च्या निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. त्यामुळे निवडणुकीत इतर मुद्दे आले पण महागाई मुद्दा आला नाही. भाजपा सरकारच्या काळात आर्थिक नियोजन केल्यामुळे महागाईवर नियंत्रण ठेवता आलं. त्याचसोबत भ्रष्टाचारावर प्रहार केल्यामुळे महागाई कमी झाली. पाकिस्तानात महागाई प्रचंड वाढली असताना भारतात महागाईवर नियंत्रण ठेवण्यात सरकारला यश आलं. त्यामुळे महागाईला पाकिस्तानातून भारतात येता आलं नाही असा दावा त्यांनी केला. 

जेव्हा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे तुकडे करुन बांग्लादेश बनवला होता त्यावर त्यांची जयजयकार झाली. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला जशास तसे सडेतोड उत्तर दिलं त्यांचा जयजयकार का करु नये. भारतीय जवानांचे कौतुक आम्ही प्रत्येक व्यासपीठावरुन करु. जवान देशासाठी सीमेवर तैनात असतात म्हणून आपण देशात सुरक्षित राहतो असंही राजनाथ सिंह यांनी सांगितले. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर देशद्रोहाचा कायदा नष्ट करणार सांगते मात्र आम्ही सत्तेत आलो तर देशद्रोहाच्या कायद्यातील त्रुटी दूर करुन हा कायदा आणखी सक्षम करु ज्यामुळे देशाच्या विरोधात काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला चाप बसेल. आम्ही देशाच्या शत्रुंना कधीच सोडणार नाही. आमचे जवान पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक करायला गेले होते. त्याठिकाणी पिकनिकला गेले नव्हते म्हणून काँग्रेस पुरावे मागते असा टोला राजनाथ सिंह यांनी काँग्रेसला लगावला. तसेच भाजपामध्ये बुथवर काम करणारा कार्यकर्ता मुख्यमंत्री आणि पंतप्रधान बनू शकतो कारण आमच्याकडे परिवारवाद नाही असंही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकHimachal Pradesh Lok Sabha Election 2019हिमाचल प्रदेश लोकसभा निवडणूक 2019Rajnath Singhराजनाथ सिंहcongressकाँग्रेस