शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र्य भारतात ही दुसरी निवडणूक ज्यात महागाईचा मुद्दा नाही - राजनाथ सिंह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 09:28 IST

आम्ही देशाच्या शत्रुंना कधीच सोडणार नाही. आमचे जवान पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक करायला गेले होते. त्याठिकाणी पिकनिकला गेले नव्हते म्हणून काँग्रेस पुरावे मागते

मंडी - भारताच्या निवडणुकीचा इतिहास पाहिला तर प्रत्येक निवडणुकीत महागाईचा मुद्दा असायचा. काँग्रेसच्या शासनकाळात महागाईचा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत यायचा. मात्र 2004 आणि 2019 च्या निवडणुकांमध्ये महागाई हा मुद्दा आला नाही. कारण भाजपा सरकारचं आर्थिक धोरणाचं नियोजन अशारितीने केले होते त्यात महागाईवर नियंत्रण मिळवता आले असा दावा केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी येथे प्रचारसभेत ते बोलत होते. 

यावेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, 2004 च्या आधी अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार होतं तर 2019 च्या निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. त्यामुळे निवडणुकीत इतर मुद्दे आले पण महागाई मुद्दा आला नाही. भाजपा सरकारच्या काळात आर्थिक नियोजन केल्यामुळे महागाईवर नियंत्रण ठेवता आलं. त्याचसोबत भ्रष्टाचारावर प्रहार केल्यामुळे महागाई कमी झाली. पाकिस्तानात महागाई प्रचंड वाढली असताना भारतात महागाईवर नियंत्रण ठेवण्यात सरकारला यश आलं. त्यामुळे महागाईला पाकिस्तानातून भारतात येता आलं नाही असा दावा त्यांनी केला. 

जेव्हा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे तुकडे करुन बांग्लादेश बनवला होता त्यावर त्यांची जयजयकार झाली. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला जशास तसे सडेतोड उत्तर दिलं त्यांचा जयजयकार का करु नये. भारतीय जवानांचे कौतुक आम्ही प्रत्येक व्यासपीठावरुन करु. जवान देशासाठी सीमेवर तैनात असतात म्हणून आपण देशात सुरक्षित राहतो असंही राजनाथ सिंह यांनी सांगितले. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर देशद्रोहाचा कायदा नष्ट करणार सांगते मात्र आम्ही सत्तेत आलो तर देशद्रोहाच्या कायद्यातील त्रुटी दूर करुन हा कायदा आणखी सक्षम करु ज्यामुळे देशाच्या विरोधात काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला चाप बसेल. आम्ही देशाच्या शत्रुंना कधीच सोडणार नाही. आमचे जवान पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक करायला गेले होते. त्याठिकाणी पिकनिकला गेले नव्हते म्हणून काँग्रेस पुरावे मागते असा टोला राजनाथ सिंह यांनी काँग्रेसला लगावला. तसेच भाजपामध्ये बुथवर काम करणारा कार्यकर्ता मुख्यमंत्री आणि पंतप्रधान बनू शकतो कारण आमच्याकडे परिवारवाद नाही असंही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकHimachal Pradesh Lok Sabha Election 2019हिमाचल प्रदेश लोकसभा निवडणूक 2019Rajnath Singhराजनाथ सिंहcongressकाँग्रेस