वीज बिलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी स्वतंत्र कक्ष महावितरण: विशेष मोहिम राबवून दिले जातील वीज संयोजन
By Admin | Updated: September 11, 2015 21:24 IST2015-09-11T21:24:59+5:302015-09-11T21:24:59+5:30
जळगाव- येत्या दोन महिन्यात वीज संयोजनाची मागणी केलेल्या ग्राहकांना विशेष मोहीम राबवून वीज संयोजनांचे वाटप केले जाईल़ तसेच वीज बिलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दीक्षित वाडी कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरू केला जाईल, अशी माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता एस़एस़ सदामते यांनी दिली़

वीज बिलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी स्वतंत्र कक्ष महावितरण: विशेष मोहिम राबवून दिले जातील वीज संयोजन
ज गाव- येत्या दोन महिन्यात वीज संयोजनाची मागणी केलेल्या ग्राहकांना विशेष मोहीम राबवून वीज संयोजनांचे वाटप केले जाईल़ तसेच वीज बिलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दीक्षित वाडी कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरू केला जाईल, अशी माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता एस़एस़ सदामते यांनी दिली़ क्रॉम्प्टनकडून तालुक्याचा कारभार स्वीकारल्यानंतर महावितरण कंपनी सज्ज झाली असून पहिल्या टप्प्यात वीज संयोजन जोडणी आणि देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार आहेत़ याबाबत कंपनीकडून विशेष योजना आखण्यात आली असून येत्या दोन महिन्यात याच कामांवर भर दिला जाणार आहे़ त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून थांबलेली वीज संयोजन जोडणीची कामे आता तप्तरतेने केली जाणार आहेत़ ३ हजार ग्राहकांचे अर्ज प्रलंबितमहावितरणकडे आजरोजी वीज संयोजनाची मागणीसाठी जवळपास तीन हजार अर्ज आलेले आहेत़ घरगुती, कृषि पंप, पाणीपुरवठा या प्रकारातील हे अर्ज आहेत़ शहरात १३९८ ग्राहकांचे अर्ज प्रलंबित असून ३६९ ग्राहकांना मागील पंधरा दिवसात वीज संयोजन उपलब्ध करून देण्यात आले आहेत़ ग्रामिण भागातील जवळपास दोन हजार अर्ज प्रलंबित असून १ हजार अर्ज हे कृषि पंपासाठीचे आहेत़ तीन ठिकाणी उभारले जाणार ट्रान्सफॉर्मर भवनऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या निर्देशानुसार महावितरणकडून औद्योगिक वसाहत, दीक्षितवाडी आणि नशिराबाद येथे ट्रान्सफॉर्मर भवन उभारले जाणार आहेत़ यामुळे ट्रान्सफॉर्मर (रोहीत्र) दुरुस्तीसाठी लागणारा वेळ कमी होणार असून पैशांची बचतही होणार आहे़ शिवाय ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा उपलब्ध होईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे़