शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

निवडणुकीत 30 मतांनी पराभव झाला म्हणून महिला उमेदवाराने केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 15:16 IST

गेल्या 10 वर्षांपासून त्या निवडून येत होत्या, पण काव निवडणुकांचे निकाल आल्यावर या महिला उमेदवाराने आत्महत्या केली.

ठळक मुद्देपश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पराभव झाला म्हणून एका अपक्ष महिला उमेदवाराने आत्महत्या केल्याचं वृत्त आहे. तृणमुल कॉंग्रेसच्या बंडखोर नेत्या सुप्रिया डे यांनी आत्महत्या केली आहे. गेल्या 10 वर्षांपासून त्या कूपप्स कॅंप वॉर्डमधून नगरसेविका म्हणून निवडून येत होत्या.पण नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांचा अवघ्या 30 मतांनी पराभव झाला.

कोलकाता, दि. 17 -पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पराभव झाला म्हणून एका अपक्ष महिला उमेदवाराने आत्महत्या केल्याचं वृत्त आहे.  तृणमुल कॉंग्रेसच्या बंडखोर नेत्या सुप्रिया डे यांनी आत्महत्या केली आहे. गेल्या 10 वर्षांपासून त्या कूपप्स कॅंप वॉर्डमधून नगरसेविका म्हणून निवडून येत होत्या. पण नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांचा अवघ्या 30 मतांनी पराभव झाला.

13 ऑगस्ट रोजी येथे मतदान झालं होतं, त्यानंतर काल मतमोजणी झाली. निकाल आल्यानंतर थोड्याचवेळात सुप्रिया यांनी वेगवेगळ्या  प्रकारच्या 35 गोळ्या खाऊन आत्महत्या केली.सुप्रिया यांच्या विरोधात उभ्या असलेल्या अशोक सरकार यांच्याकडून सुप्रिया यांचा पराभव झाला. अशोक सरकार हे तृणमुल कॉंग्रेसचे आहेत. अशोक सरकार यांना या निवडणुकीत 350 मतं मिळाली तर सुप्रिया डे यांना 320 मतं मिळाली.      

बंगालमध्ये ममताच नंबर 1, पण भविष्यात भाजपाचे चॅलेंज-

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला असला तरी, भाजपा मुख्य विरोधी पक्ष म्हणून समोर आला आहे. सर्वच्या सर्व सात महापालिकांमध्ये तृणमुलने काँग्रेसने विजय मिळवला आहे. भाजपा या निवडणुकीत दुस-या स्थानावर असून, डावे थेट तिस-या क्रमांकावर फेकले गेले आहेत. तीन महापालिकांमध्ये भाजपाने सहा जागा जिंकल्या आहेत. 

उत्तर बंगालमधील धुपगुरी येथे चार, बुनियादपूर आणि पानस्कुरामध्ये प्रत्येकी एक जागा जिंकली आहे. तृणमुलने बर्दवान जिल्ह्यातील दुर्गापूर महापालिकेत सर्वच्या सर्व 43 वॉर्डमध्ये विजय मिळवला. हलदीया महापालिकेत तृणमुलने सर्वच्या सर्व 29 जागा जिंकल्या. महापालिका क्षेत्रात भाजपाला मिळालेले यश हे आगामी काळात तृणमुलसमोर भाजपाचे आव्हान उभे राहणार असल्याचे संकेत आहेत असे निवडणूक विश्लेषकांनी सांगितले. 

या निवडणुकीत काँग्रेसला एक जागाही जिंकता आली नाही. हल्दीया महापालिका डाव्यांचा गड होता. पण तृणमुलने इथे सर्वच्या सर्व 29 जागा जिंकल्या. धुपगुरीमध्ये तृणमुलने 12 तर, भाजपाने चार जागा जिंकल्या. या निवडणुकीत तृणमुलची मते कमी न होता उलटी वाढली आहेत.  डाव्यांचा जो जनाधार होता तो भाजपाकडे झुकतोय हे या निवडणूकीतून दिसले असे तृणमुलचे नेते गौतम देब यांनी सांगितले. तृणमुलने ही निवडणूक जिंकण्यासाठी धन आणि मसल पावरचा उपयोग केला असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला. 

निवडणुकीच्या या निकालातून भाजपाचा पश्चिम बंगालमध्ये जनाधार तयार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारच्या कट्टर विरोधक आहेत.  त्यांनी अऩेक मुद्यांवर मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.