शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
4
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
5
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
7
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
8
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
9
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
10
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
11
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
12
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
13
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
14
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
15
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
16
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
17
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
18
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
19
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
20
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
Daily Top 2Weekly Top 5

Independence Day: भारताचे तीन तुकडे करणाऱ्या रॅडक्लिफ लाइनबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 14:21 IST

भारत आणि पाकिस्तान असे दोन देश फाळणीनंतर तयार झाले, भारताच्या पूर्वेस पूर्व पाकिस्तान व पश्चिमेस पश्चिम पाकिस्तान तयार झाला.

मुंबई- 1947 साली भारताची फाळणी झाली आणि भारतपाकिस्तान असे दोन देश निर्माण झाले एवढे आपल्याला माहिती असते. मात्र या फाळणीमुळे भारताचे कसे तुकडे पडले, कोणी ते पाडले, कसे पाडले याबद्दल फारशी माहिती नसते. आज भारतीय उपखंडाची राजकीय स्थिती पाहिली की भारताची फाळणी अत्यंत घाई-घाईत करण्यात आल्याचे दिसून येते. त्याचे परिणाम आजही दोन्ही देश भोगत आहेत. 

17 ऑगस्ट 1947 रोजी दोन्ही देशांमध्ये रॅडक्लिफ लाइन आखून दोन वेगळे देश निर्माण करण्यात आले. सर सिरील रॅडक्लिफ यांनी भारत व पाकिस्तान यांच्यामधील सीमारेषा निश्चित केली. ते सीमा आयोगाचे अध्यक्ष होते. त्यांनी आखलेल्या रेषेमुळे पश्चिम पाकिस्तान, पूर्व पाकिस्तान आणि भारत असे तीन भाग करण्यात आले. नंतर पश्चिम पाकिस्तानच्या जुलमी राजवटीला आणि अत्याचारांना कंटाळून पूर्व पाकिस्तानने लढा देऊन 1971 साली स्वतंत्र बांगलादेश मिळवला. 

रॅडक्लिफ यांनी फाळणीची रेषा आखण्यासाठी भारतात येण्यापूर्वी कधीही भारत पाहिलेला नव्हता. येथील सामाजिक घटकांची त्यांना काहीही माहिती नव्हती. भारताच्या समाजरचनेचा, भौगोलिक स्थितीचा, लोकसंख्येचा कोणताही अभ्यास त्यांनी केला नव्हता. इंग्लंडमधील एक उत्तम वकील म्हणून ते ओळखले जात. त्यांचा जन्म 30 मार्च 1899 रोजी वेल्स या प्रांतात झाला. भारताची फाळणीरेषा आखल्याबद्दल त्यांना लॉ लॉर्ड आणि नाइट ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर या सन्मानाने गौरविण्यात आले होते.

 8 जुलै 1947 साली ते पहिल्यांदा भारतात आले. रॅडक्लिफ यांना अशी घाई-गडबडीत सीमारेषा आखण्याची कल्पना आवडलेली नव्हती. त्यामध्ये अनेक त्रूटी असल्याचे त्यांनी मान्य केले होते. मात्र तत्कालीन परिस्थितीत काम पूर्ण करण्यापलिकडे त्यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. रॅडक्लिफ यांनी रेषा आखल्यापोटी सरकारने देऊ केलेली 3000 पौंडाची रक्कमही नाकारल्याचे सांगण्यात येते. आपल्या फाळणीरेषेची अंमलबजावणी होण्यापूर्वीच रॅडक्लिफ यांनी भारत सोडून इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला आणि 15 ऑगस्ट रोजीच ते निघून गेले. 16 ऑगस्ट रोजी फाळणीच्या रेषेचा अहवाल वाचण्यासाठी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींना केवळ दोन तास देण्यात आले आणि 

 तर लाहोर भारतात आले असते-रॅडक्लिफ यांना लाहोर शहर भारतामध्ये देण्याची इच्छा होती. मात्र तसे करण्याने पाकिस्तानला कोणतेही मोठे शहर मिळाले नसते. भारताच्या वाट्याला कोलकाता शहर गेल्यामुळे त्यांनी लाहोर शहर पाकिस्तानच्या बाजूला देण्याचे निश्चित केले.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसIndiaभारतPakistanपाकिस्तान