शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 08:34 IST

PM Narendra Modi Addressed From Red Fort On Independence Day 205: सिंधू जलकरारामुळे गेल्या ७० दशकांपासून भारतातील शेतकऱ्यांचे अकल्पनीय नुकसान झाले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

PM Narendra Modi Addressed From Red Fort On Independence Day 205: भारताने निश्चय केला आहे की, रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. सिंधू जलकारक अन्यायकारक आणि किती एकाच बाजूचा विचार करून केलेला होता, हे संपूर्ण देशवासीयांना समजले आहे. भारतातून वाहत असलेल्या नद्यांचे पाणी शत्रूंची शेती समृद्ध करत आहेत आणि माझ्या देशातील शेतकरी आणि शेतजमीन पाण्यासाठी व्याकूळ होत आहेत. या जलकरारामुळे गेल्या ७० दशकांपासून भारतातील शेतकऱ्यांचे अकल्पनीय नुकसान झाले, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला सुनावले. स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. तत्पूर्वी, एक्सवर पोस्ट करून देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिला.

देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून देशातील काही भागांत नैसर्गिक आपत्ती, भूस्खलन, ढगफुटी, तसेच अनेक आपत्तींना तोंड देत आहोत. बाधित लोकांबद्दल संपूर्ण देशाच्या सहवेदना आहेत. राज्य सरकार आणि केंद्र सरकार बचाव कार्य, मदत कार्य आणि पुनर्वसन कार्यात पूर्ण ताकदीने एकत्र काम करत आहेत. लाल किल्ल्यावरून ‘ऑपरेशन सिंदूर’च्या शूर सैनिकांना अभिवादन करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या शूरवीर सैनिकांनी शत्रूला त्यांनी कल्पनाही केली नसेल, अशी शिक्षा दिली आहे.

पाकिस्तानमध्ये विध्वंस इतका प्रचंड आहे की....

संपूर्ण भारतात संताप होता आणि पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण जग हादरले होते. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही त्या संतापाची अभिव्यक्ती आहे. पाकिस्तानमध्ये विध्वंस इतका प्रचंड आहे की दररोज नवीन खुलासे होत आहेत आणि दररोज नवीन माहिती बाहेर येत आहे. २२ एप्रिल रोजी सीमेपलीकडून दहशतवादी पहलगाममध्ये आले. त्यांचा धर्म विचारून लोकांना मारले. २२ तारखेनंतर भारताच्या सशस्त्र दलांना आम्ही पूर्ण स्वातंत्र्य दिले. तेच रणनीती, लक्ष्य आणि वेळ ठरवतात. आमच्या सैन्याने असे करून दाखवले आहे की, जे अनेक दशकांपासून कधीही केले नव्हते. आम्ही शत्रूच्या भूमीत शेकडो किलोमीटर घुसून त्यांचे दहशतवादी मुख्यालय उद्ध्वस्त केले. 

दरम्यान, भारत प्रत्येक क्षेत्रात एक आधुनिक इकोसिस्टिम निर्माण करत आहे. तरुणांना आणि सरकारच्या प्रत्येक विभागाला आवाहन करतो की, आपण आपल्या लढाऊ विमानांसाठी मेड-इन-इंडिया जेट इंजिन तयार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्याला जगाची फार्मसी म्हणून ओळखले जाते, परंतु संशोधन आणि विकासात अधिक गुंतवणूक करणे ही काळाची गरज नाही का? मानवतेच्या कल्याणासाठी सर्वोत्तम आणि परवडणारी औषधे आपणच पुरवणारे असू नये का? असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केले. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनNarendra Modiनरेंद्र मोदीOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान