शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 08:34 IST

PM Narendra Modi Addressed From Red Fort On Independence Day 205: सिंधू जलकरारामुळे गेल्या ७० दशकांपासून भारतातील शेतकऱ्यांचे अकल्पनीय नुकसान झाले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

PM Narendra Modi Addressed From Red Fort On Independence Day 205: भारताने निश्चय केला आहे की, रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. सिंधू जलकारक अन्यायकारक आणि किती एकाच बाजूचा विचार करून केलेला होता, हे संपूर्ण देशवासीयांना समजले आहे. भारतातून वाहत असलेल्या नद्यांचे पाणी शत्रूंची शेती समृद्ध करत आहेत आणि माझ्या देशातील शेतकरी आणि शेतजमीन पाण्यासाठी व्याकूळ होत आहेत. या जलकरारामुळे गेल्या ७० दशकांपासून भारतातील शेतकऱ्यांचे अकल्पनीय नुकसान झाले, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला सुनावले. स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. तत्पूर्वी, एक्सवर पोस्ट करून देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिला.

देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून देशातील काही भागांत नैसर्गिक आपत्ती, भूस्खलन, ढगफुटी, तसेच अनेक आपत्तींना तोंड देत आहोत. बाधित लोकांबद्दल संपूर्ण देशाच्या सहवेदना आहेत. राज्य सरकार आणि केंद्र सरकार बचाव कार्य, मदत कार्य आणि पुनर्वसन कार्यात पूर्ण ताकदीने एकत्र काम करत आहेत. लाल किल्ल्यावरून ‘ऑपरेशन सिंदूर’च्या शूर सैनिकांना अभिवादन करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या शूरवीर सैनिकांनी शत्रूला त्यांनी कल्पनाही केली नसेल, अशी शिक्षा दिली आहे.

पाकिस्तानमध्ये विध्वंस इतका प्रचंड आहे की....

संपूर्ण भारतात संताप होता आणि पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण जग हादरले होते. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही त्या संतापाची अभिव्यक्ती आहे. पाकिस्तानमध्ये विध्वंस इतका प्रचंड आहे की दररोज नवीन खुलासे होत आहेत आणि दररोज नवीन माहिती बाहेर येत आहे. २२ एप्रिल रोजी सीमेपलीकडून दहशतवादी पहलगाममध्ये आले. त्यांचा धर्म विचारून लोकांना मारले. २२ तारखेनंतर भारताच्या सशस्त्र दलांना आम्ही पूर्ण स्वातंत्र्य दिले. तेच रणनीती, लक्ष्य आणि वेळ ठरवतात. आमच्या सैन्याने असे करून दाखवले आहे की, जे अनेक दशकांपासून कधीही केले नव्हते. आम्ही शत्रूच्या भूमीत शेकडो किलोमीटर घुसून त्यांचे दहशतवादी मुख्यालय उद्ध्वस्त केले. 

दरम्यान, भारत प्रत्येक क्षेत्रात एक आधुनिक इकोसिस्टिम निर्माण करत आहे. तरुणांना आणि सरकारच्या प्रत्येक विभागाला आवाहन करतो की, आपण आपल्या लढाऊ विमानांसाठी मेड-इन-इंडिया जेट इंजिन तयार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्याला जगाची फार्मसी म्हणून ओळखले जाते, परंतु संशोधन आणि विकासात अधिक गुंतवणूक करणे ही काळाची गरज नाही का? मानवतेच्या कल्याणासाठी सर्वोत्तम आणि परवडणारी औषधे आपणच पुरवणारे असू नये का? असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केले. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनNarendra Modiनरेंद्र मोदीOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान