शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Independence Day 2021 : मी शेकडो अनावश्यक कायदे रद्द केले : पंतप्रधान नरेंद्र माेदी; ७५वा स्वातंत्र्यदिन देशभर उत्साहात साजरा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 06:11 IST

Independence Day 2021 : ‘सर्जिकल आणि हवाई हल्ले करून भारताने शत्रूंना इशारा दिला आहे की, ' हम किसी से कम नहीं'. ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मोदींनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित केले. त्यांनी ८८ मिनिटांचे भाषण दिले.

- विकास झाडे

नवी दिल्ली : जे जुने अनावश्यक कायदे होते, ते आधीच्या सरकारला रद्द करण्यात जराही रस नव्हता. मी मात्र असे शेकडो कायदे रद्द केलेत, याकडे लक्ष वेधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास यांना 'सबका प्रयास' ची जोड दिली. ‘सर्जिकल आणि हवाई हल्ले करून भारताने शत्रूंना इशारा दिला आहे की, ' हम किसी से कम नहीं'.७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मोदींनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित केले. त्यांनी ८८ मिनिटांचे भाषण दिले.

ते म्हणाले, 'हीच योग्य वेळ आहे, ही भारतासाठी मौल्यवान वेळ आहे.  आपल्याकडे शक्ती आहे, उठा आणि तिरंगा लहरवा'. सर्वांच्या क्षमतेला योग्य संधी देणे, हीच लोकशाहीची खरी भावना आहे.  आज सरकारी योजनांची गती वाढली आहे. आपण निर्धारित लक्ष्य साध्य करत आहोत. आता आपल्याला पूर्णत्वाकडे जायचे आहे. त्यासाठी आम्हाला आता सुरुवात करावी लागेल. आमच्याकडे गमावण्यासाठी एकही क्षण नाही. ही योग्य वेळ. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास, याच श्रद्धेने आपण सगळे जमलो आहोत.

सुरक्षेचा उपाय म्हणून लाल किल्ल्याच्या आजूबाजूला शिपिंग कंटेनरच्या इमारती उभारण्यात आल्या होत्या. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य ड्रोनहल्ला लक्षात घेता या शिपिंग कंटेनरच्या इमारती उभारण्यात आल्या आहेत, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. दिल्लीमध्ये नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. गणतंत्रदिनी शेतकरी आणि पोलिसांमध्ये जी हिंसा झाली, त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सुरक्षेचा उपाय म्हणून लाल किल्ल्याकडे जाणा-या रस्त्यांवर शिपिंग कंटेनरच्या भिंती उभारल्याचे सांगण्यात आले. 

१०० लाख कोटींची योजना!मोदी यांनी 'प्रधानमंत्री गति-शक्ति-योजने'ची घोषणा केली. या योजनेचे पॅकेज १०० लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक असणार आहे. यामुळे लाखो लोकांना रोजगार दिला जाईल, असा त्यांना विश्वास आहे. पायाभूत सुविधा आणि दळणवळणासाठी ही योजना खास असेल. सामान्य माणसांच्या प्रवासाचा वेळ वाचेल. त्यामुळे लोकांची आणि उद्योगांची कार्यक्षमता वाढेल. या सगळ्यामुळे भारतीय उद्योजकांना जागतिक पातळीवरील स्पर्धेत उतरता येईल.

खेळाडूूंसाठी टाळ्यांचा वर्षाव!मोदींनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय तुकड्यांची भेट घेतली. मोदींनी त्यांचा विशेष उल्लेख करून त्यांच्यासाठी टाळ्यांचा गजर करा, असे आवाहन केले. प्रथमच कार्यक्रमस्थळी हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव करण्यात आला.

काश्मिरात विकासाचा समतोल!जम्मू असो किंवा काश्मीर तिथे आता विकासाचा समतोल दिसत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये निर्बंध आयोगाची स्थापना करण्यात आली आहे आणि भविष्यातील विधानसभा निवडणुकांचीही तयारी सुरू आहे.

पंडित नेहरूंचा उल्लेख! मोदी हे त्यांच्या भाषणातून नेहमी पंडित नेहरूंना टाळतात, तर सरदार पटेलांचा उल्लेख करतात. परंतु आज त्यांनी महात्मा गांधी, सरदार पटेल, भगतसिंग यासोबतच पंडित नेहरूंच्या नावाचाही उल्लेख केला.  ते म्हणाले, स्वातंत्र्याच्या आंदोलनात सर्वस्व त्यागणारे सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, बिस्मिल अश्फाक उल्लाह खान, राणी लक्ष्मीबाई, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांचे देश आज स्मरण करतो आहे. आम्ही सगळे त्यांचे कर्जदार आहोत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndependence Dayस्वातंत्र्य दिन