शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Independence Day 2020: स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा मास्क घालण्याचा विचार करत असाल तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 15:31 IST

गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनी लोक तिरंगा बँड, तिरंगा ब्रेसलेट आणि तिरंगा कॅप अशा बर्‍याच वस्तू विकत घेत असत पण यावेळी त्यांच्या जागी तिरंगा मास्कची विक्री होत आहे

पणजी – १५ ऑगस्ट रोजी भारत ७४ वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. कोविड १९ च्या संकटामुळे सध्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बाजारात गर्दी कमी असली तर देशवासियांच्या मनात उत्साह कायम आहे. स्वातंत्र्य दिनावेळी लोक छोट्या रंगाचे तिरंगा बॅच, तिरंगा असणाऱ्या वस्तू विकत घेताना दिसतात. मात्र कोरोनामुळे सध्या मार्केटमध्ये तिरंगा मास्कची प्रचंड विक्री सुरु आहे.

गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनी लोक तिरंगा बँड, तिरंगा ब्रेसलेट आणि तिरंगा कॅप अशा बर्‍याच वस्तू विकत घेत असत पण यावेळी त्यांच्या जागी तिरंगा मास्कची विक्री होत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या थीमने सुशोभित केलेले हे तिरंगा मुखवटे बनवण्यासाठी त्यावर देशभक्ती दर्शविणार्‍या वेगवेगळ्या गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत. म्हणजे काही मास्कवर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा लिहून दिल्या आहेत आणि या बरोबरच भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, महात्मा गांधी, बाळ गंगाधर टिळक सारख्या देशभक्तांसह इतर स्वातंत्र्यसैनिकांची छायाचित्रे बनविली गेली आहेत.

मात्र गोव्यातील काँग्रेस नेते दिगंबर कामत यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिरंगा मास्कवर बंदी घालण्याचे आवाहन केले. खरं तर, आजकाल बऱ्याच प्रकारचे मास्क बाजारात उपलब्ध आहेत, स्वातंत्र्य दिन लक्षात घेऊन बाजारात तिरंगा मास्कदेखील विकले जात आहेत. हे मास्क भारताच्या राष्ट्रीय ध्वजाच्या तीन रंगांनी मध्यभागी अशोक चक्र अशाप्रकारे बनवले आहेत. या मास्कवर कॉंग्रेस नेते दिगंबर कामत यांनी आक्षेप घेतला आहे.

दिगंबर कामत यांनी पीएमओला टॅग करत एक ट्विट केले त्यात म्हटलं आहे की, सर्व राज्यात अशा मास्कवर बंदी घालण्यात यावी, हा फोटो पाहून मला फार वाईट वाटतं. पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांना सूचना द्याव्यात आणि तिरंगा व अशोक चक्रांवरील मास्कवर बंदी घालावी अशी विनंती आहे, आपण सर्वांनी आपल्या राष्ट्रध्वजाचा आदर केला पाहिजे. जय हिंद. वंदे मातरम्. भारत माता की जय असं म्हटलं आहे.

झारखंडमध्ये 'तिरंगा मास्क' विक्रीवर बंदी

यापूर्वी झारखंडच्या रांची जिल्हा प्रशासनाने तिरंगा मास्क विक्रीवर बंदी घातली आहे. कायदा सुव्यवस्थेचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अखिलेश सिन्हा यांनी तिरंगा मास्क विक्रीवर बंदी घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे, कोणी बंदी असूनही तिरंगा मास्क विकल्यास त्याविरूद्ध कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. अखिलेश सिन्हा यांनी जिल्ह्यातील सर्व बीडीओ / सीओ, पोलिस प्रभारी आणि प्रतिनियुक्त दंडाधिकाऱ्यांना तिरंगा मास्क विक्री थांबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी