शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
5
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
6
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
7
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
8
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
9
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
10
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
11
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
12
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
13
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
14
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
15
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
16
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
17
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
18
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
19
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
20
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत

Independence Day 2020: स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा मास्क घालण्याचा विचार करत असाल तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 15:31 IST

गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनी लोक तिरंगा बँड, तिरंगा ब्रेसलेट आणि तिरंगा कॅप अशा बर्‍याच वस्तू विकत घेत असत पण यावेळी त्यांच्या जागी तिरंगा मास्कची विक्री होत आहे

पणजी – १५ ऑगस्ट रोजी भारत ७४ वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. कोविड १९ च्या संकटामुळे सध्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बाजारात गर्दी कमी असली तर देशवासियांच्या मनात उत्साह कायम आहे. स्वातंत्र्य दिनावेळी लोक छोट्या रंगाचे तिरंगा बॅच, तिरंगा असणाऱ्या वस्तू विकत घेताना दिसतात. मात्र कोरोनामुळे सध्या मार्केटमध्ये तिरंगा मास्कची प्रचंड विक्री सुरु आहे.

गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनी लोक तिरंगा बँड, तिरंगा ब्रेसलेट आणि तिरंगा कॅप अशा बर्‍याच वस्तू विकत घेत असत पण यावेळी त्यांच्या जागी तिरंगा मास्कची विक्री होत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या थीमने सुशोभित केलेले हे तिरंगा मुखवटे बनवण्यासाठी त्यावर देशभक्ती दर्शविणार्‍या वेगवेगळ्या गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत. म्हणजे काही मास्कवर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा लिहून दिल्या आहेत आणि या बरोबरच भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, महात्मा गांधी, बाळ गंगाधर टिळक सारख्या देशभक्तांसह इतर स्वातंत्र्यसैनिकांची छायाचित्रे बनविली गेली आहेत.

मात्र गोव्यातील काँग्रेस नेते दिगंबर कामत यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिरंगा मास्कवर बंदी घालण्याचे आवाहन केले. खरं तर, आजकाल बऱ्याच प्रकारचे मास्क बाजारात उपलब्ध आहेत, स्वातंत्र्य दिन लक्षात घेऊन बाजारात तिरंगा मास्कदेखील विकले जात आहेत. हे मास्क भारताच्या राष्ट्रीय ध्वजाच्या तीन रंगांनी मध्यभागी अशोक चक्र अशाप्रकारे बनवले आहेत. या मास्कवर कॉंग्रेस नेते दिगंबर कामत यांनी आक्षेप घेतला आहे.

दिगंबर कामत यांनी पीएमओला टॅग करत एक ट्विट केले त्यात म्हटलं आहे की, सर्व राज्यात अशा मास्कवर बंदी घालण्यात यावी, हा फोटो पाहून मला फार वाईट वाटतं. पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांना सूचना द्याव्यात आणि तिरंगा व अशोक चक्रांवरील मास्कवर बंदी घालावी अशी विनंती आहे, आपण सर्वांनी आपल्या राष्ट्रध्वजाचा आदर केला पाहिजे. जय हिंद. वंदे मातरम्. भारत माता की जय असं म्हटलं आहे.

झारखंडमध्ये 'तिरंगा मास्क' विक्रीवर बंदी

यापूर्वी झारखंडच्या रांची जिल्हा प्रशासनाने तिरंगा मास्क विक्रीवर बंदी घातली आहे. कायदा सुव्यवस्थेचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अखिलेश सिन्हा यांनी तिरंगा मास्क विक्रीवर बंदी घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे, कोणी बंदी असूनही तिरंगा मास्क विकल्यास त्याविरूद्ध कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. अखिलेश सिन्हा यांनी जिल्ह्यातील सर्व बीडीओ / सीओ, पोलिस प्रभारी आणि प्रतिनियुक्त दंडाधिकाऱ्यांना तिरंगा मास्क विक्री थांबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी