शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Independence Day 2020: स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा मास्क घालण्याचा विचार करत असाल तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 15:31 IST

गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनी लोक तिरंगा बँड, तिरंगा ब्रेसलेट आणि तिरंगा कॅप अशा बर्‍याच वस्तू विकत घेत असत पण यावेळी त्यांच्या जागी तिरंगा मास्कची विक्री होत आहे

पणजी – १५ ऑगस्ट रोजी भारत ७४ वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. कोविड १९ च्या संकटामुळे सध्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बाजारात गर्दी कमी असली तर देशवासियांच्या मनात उत्साह कायम आहे. स्वातंत्र्य दिनावेळी लोक छोट्या रंगाचे तिरंगा बॅच, तिरंगा असणाऱ्या वस्तू विकत घेताना दिसतात. मात्र कोरोनामुळे सध्या मार्केटमध्ये तिरंगा मास्कची प्रचंड विक्री सुरु आहे.

गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनी लोक तिरंगा बँड, तिरंगा ब्रेसलेट आणि तिरंगा कॅप अशा बर्‍याच वस्तू विकत घेत असत पण यावेळी त्यांच्या जागी तिरंगा मास्कची विक्री होत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या थीमने सुशोभित केलेले हे तिरंगा मुखवटे बनवण्यासाठी त्यावर देशभक्ती दर्शविणार्‍या वेगवेगळ्या गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत. म्हणजे काही मास्कवर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा लिहून दिल्या आहेत आणि या बरोबरच भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, महात्मा गांधी, बाळ गंगाधर टिळक सारख्या देशभक्तांसह इतर स्वातंत्र्यसैनिकांची छायाचित्रे बनविली गेली आहेत.

मात्र गोव्यातील काँग्रेस नेते दिगंबर कामत यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिरंगा मास्कवर बंदी घालण्याचे आवाहन केले. खरं तर, आजकाल बऱ्याच प्रकारचे मास्क बाजारात उपलब्ध आहेत, स्वातंत्र्य दिन लक्षात घेऊन बाजारात तिरंगा मास्कदेखील विकले जात आहेत. हे मास्क भारताच्या राष्ट्रीय ध्वजाच्या तीन रंगांनी मध्यभागी अशोक चक्र अशाप्रकारे बनवले आहेत. या मास्कवर कॉंग्रेस नेते दिगंबर कामत यांनी आक्षेप घेतला आहे.

दिगंबर कामत यांनी पीएमओला टॅग करत एक ट्विट केले त्यात म्हटलं आहे की, सर्व राज्यात अशा मास्कवर बंदी घालण्यात यावी, हा फोटो पाहून मला फार वाईट वाटतं. पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांना सूचना द्याव्यात आणि तिरंगा व अशोक चक्रांवरील मास्कवर बंदी घालावी अशी विनंती आहे, आपण सर्वांनी आपल्या राष्ट्रध्वजाचा आदर केला पाहिजे. जय हिंद. वंदे मातरम्. भारत माता की जय असं म्हटलं आहे.

झारखंडमध्ये 'तिरंगा मास्क' विक्रीवर बंदी

यापूर्वी झारखंडच्या रांची जिल्हा प्रशासनाने तिरंगा मास्क विक्रीवर बंदी घातली आहे. कायदा सुव्यवस्थेचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अखिलेश सिन्हा यांनी तिरंगा मास्क विक्रीवर बंदी घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे, कोणी बंदी असूनही तिरंगा मास्क विकल्यास त्याविरूद्ध कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. अखिलेश सिन्हा यांनी जिल्ह्यातील सर्व बीडीओ / सीओ, पोलिस प्रभारी आणि प्रतिनियुक्त दंडाधिकाऱ्यांना तिरंगा मास्क विक्री थांबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी