शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Independence Day 2020: स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा मास्क घालण्याचा विचार करत असाल तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 15:31 IST

गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनी लोक तिरंगा बँड, तिरंगा ब्रेसलेट आणि तिरंगा कॅप अशा बर्‍याच वस्तू विकत घेत असत पण यावेळी त्यांच्या जागी तिरंगा मास्कची विक्री होत आहे

पणजी – १५ ऑगस्ट रोजी भारत ७४ वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. कोविड १९ च्या संकटामुळे सध्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बाजारात गर्दी कमी असली तर देशवासियांच्या मनात उत्साह कायम आहे. स्वातंत्र्य दिनावेळी लोक छोट्या रंगाचे तिरंगा बॅच, तिरंगा असणाऱ्या वस्तू विकत घेताना दिसतात. मात्र कोरोनामुळे सध्या मार्केटमध्ये तिरंगा मास्कची प्रचंड विक्री सुरु आहे.

गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनी लोक तिरंगा बँड, तिरंगा ब्रेसलेट आणि तिरंगा कॅप अशा बर्‍याच वस्तू विकत घेत असत पण यावेळी त्यांच्या जागी तिरंगा मास्कची विक्री होत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या थीमने सुशोभित केलेले हे तिरंगा मुखवटे बनवण्यासाठी त्यावर देशभक्ती दर्शविणार्‍या वेगवेगळ्या गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत. म्हणजे काही मास्कवर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा लिहून दिल्या आहेत आणि या बरोबरच भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, महात्मा गांधी, बाळ गंगाधर टिळक सारख्या देशभक्तांसह इतर स्वातंत्र्यसैनिकांची छायाचित्रे बनविली गेली आहेत.

मात्र गोव्यातील काँग्रेस नेते दिगंबर कामत यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिरंगा मास्कवर बंदी घालण्याचे आवाहन केले. खरं तर, आजकाल बऱ्याच प्रकारचे मास्क बाजारात उपलब्ध आहेत, स्वातंत्र्य दिन लक्षात घेऊन बाजारात तिरंगा मास्कदेखील विकले जात आहेत. हे मास्क भारताच्या राष्ट्रीय ध्वजाच्या तीन रंगांनी मध्यभागी अशोक चक्र अशाप्रकारे बनवले आहेत. या मास्कवर कॉंग्रेस नेते दिगंबर कामत यांनी आक्षेप घेतला आहे.

दिगंबर कामत यांनी पीएमओला टॅग करत एक ट्विट केले त्यात म्हटलं आहे की, सर्व राज्यात अशा मास्कवर बंदी घालण्यात यावी, हा फोटो पाहून मला फार वाईट वाटतं. पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांना सूचना द्याव्यात आणि तिरंगा व अशोक चक्रांवरील मास्कवर बंदी घालावी अशी विनंती आहे, आपण सर्वांनी आपल्या राष्ट्रध्वजाचा आदर केला पाहिजे. जय हिंद. वंदे मातरम्. भारत माता की जय असं म्हटलं आहे.

झारखंडमध्ये 'तिरंगा मास्क' विक्रीवर बंदी

यापूर्वी झारखंडच्या रांची जिल्हा प्रशासनाने तिरंगा मास्क विक्रीवर बंदी घातली आहे. कायदा सुव्यवस्थेचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अखिलेश सिन्हा यांनी तिरंगा मास्क विक्रीवर बंदी घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे, कोणी बंदी असूनही तिरंगा मास्क विकल्यास त्याविरूद्ध कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. अखिलेश सिन्हा यांनी जिल्ह्यातील सर्व बीडीओ / सीओ, पोलिस प्रभारी आणि प्रतिनियुक्त दंडाधिकाऱ्यांना तिरंगा मास्क विक्री थांबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी