शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वाढता मानवी हस्तक्षेप सारिस्का-रणथंबोरच्या मुळावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 05:34 IST

वाढती लोकसंख्या आणि देवीची जत्रा यामुळे सारिस्का व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या वाढविण्यात अडचणी येत आहेत. रणथंबोर अभयारण्यातली व्याघ्रसंख्या झपाट्याने वाढली असून तेथील वाघांना स्थलांतरित करावे लागणार आहे.

- राजू नायकसारिस्का (राजस्थान) : वाढती लोकसंख्या आणि देवीची जत्रा यामुळे सारिस्का व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या वाढविण्यात अडचणी येत आहेत. रणथंबोर अभयारण्यातली व्याघ्रसंख्या झपाट्याने वाढली असून तेथील वाघांना स्थलांतरित करावे लागणार आहे. मात्र, पर्यटन लॉबीच्या दबावामुळे हे स्थलांतर अडले आहे.‘सारिस्का व रणथंबोर ही दोन्ही अभयारण्ये एकमेकांना निकट असल्यामुळे वाघांचे स्थलांतर करण्यात नैसर्गिक अडचणी नाहीत,’ अशी माहिती डेहराडून येथील ‘भारतीय वन्यजीव संस्थान’च्याप्राणी पर्यावरण आणि संवर्धन जीवशास्त्र विभागाचे प्रमुख यादवेंद्र झाला यांनी ‘लोकमत’लादिली.हा प्रकल्प आता ६ बछड्यांसह १९ वाघांचे निवासस्थान बनला आहे. २००५ मध्ये सारिस्का अभयारण्यातून ४ वाघ नाहीसे झाल्यानंतर भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली होती. मात्र, त्यानंतर २००८ साली रणथंबोरमधून वाघांच्या दोन जोड्या स्थलांतरित करण्यात आल्या. आणखी दोन वर्षांनतर वाघांच्या २ मादी येथे सोडण्यात आल्या. सध्या येथील वाघांची संख्या १९ आहे. तरीही गेल्या वर्षभरात येथे ३ वाघांचा झालेला मृत्यू ही वनाधिकाऱ्यांच्या चिंतेची बाब बनली आहे.यादवेंद्र झाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, सारिस्कामध्ये दर मंगळवारी व शनिवारी उत्सवासाठी १००हून अधिक वाहने येत असतात. धार्मिक कारणांमुळे त्यांच्या संख्येवर निर्बंध लादणे शक्य होत नाही. शिवाय दररोज पर्यटकांच्या किमान ३० जीप्स येथे येत असतात.मात्र, स्थानिकांचा हस्तक्षेप, भाविकांच्या भोजनावळी आणि वाढत चाललेल्या मानवी वस्त्या या अभयारण्याच्या प्रमुख समस्याबनल्या आहेत. सारिस्कातून याआधी दोन वेळा मानवी वस्त्या हटविण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्यावर होणारा खर्च ही योजना आणखीन वेगाने राबविण्यात अडचणी निर्माण करतो.अपुरे सुरक्षा कर्मचारीसारिस्काचे क्षेत्रफळ पाहाता, येथे किमान ४०० सुरक्षाकर्मींची आवश्यकता आहे. परंतु, प्रत्यक्षात येथे १४० सुरक्षा रक्षकांना मंजुरी मिळाली असून त्यातील जेमतेम १००जण कामावर असतात. वाघांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्या गळ्यात जी कॉलर बसविण्यात येते ती जर्मनीतून साडेतीन लाख रुपये मूल्य देऊन आयात करावी लागते. ती चार वर्षे चालते. देशभरात एकूण ३० वाघांना अशा प्रकारची कॉलर बसविण्यात आली आहे. रणथंबोरमध्ये वाघांच्या वाढलेल्या संख्येने समस्या निर्माण केल्या आहेत. या उद्यानाचा विस्तार ३९२ चौ. किमी.मध्ये असून त्याचे बफर क्षेत्र १३४२ चौ. किमी. आहे. मात्र, प्रत्यक्षात इथल्या वाघांचा वावर ६०० चौ. किमी. क्षेत्रात असतो. १९८२ साली येथे ४४ वाघ होते. २०१९ मध्ये ती संख्या ७४वर गेलेली आहे. वाढत्या संख्येमुळे वाघ मानवी वस्तीत शिरकाव करीत आहेत.

टॅग्स :Tigerवाघ