महिलांवरील वाढते अत्याचार थांबविणार

By Admin | Updated: August 11, 2015 22:11 IST2015-08-11T22:11:40+5:302015-08-11T22:11:40+5:30

महिलांवरील वाढते अत्याचार थांबविणार

Increasing atrocities on women will stop | महिलांवरील वाढते अत्याचार थांबविणार

महिलांवरील वाढते अत्याचार थांबविणार

िलांवरील वाढते अत्याचार थांबविणार
शासनाचा उपक्रम : पोलीस अधीक्षक कार्यालयात आढावा सभा
नागपूर : महिलांवर होणारे रस्त्यावरील अत्याचार थांबविण्यासाठी व त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मूलभूत उपाययोजना आखणीबाबत राज्य शासनाने एका परिपत्रकान्वये उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार महिला सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली. या समितीचा आढावा घेण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या अध्यक्षतेत आढावा सभा पार पडली.
पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित बैठकीला महावितरण विभागाचे अधीक्षक अभियंता भादीकर, कळमेश्वर व कन्हान-पिपरी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी व्ही. के. अंधारे, रामटेक पालिकेच्या मुख्याधिकारी गीता वंजारी, मोहपा येथील मुख्याधिकारी शिला बोरकर, सावनेरचे मिलिंद साठवणे तसेच इतर नगर परिषदेचे मुख्याधिकारी, जिल्हा परिषद प्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. महिलांच्या सुरक्षिततेबाबत सार्वजनिक स्थळांच्या सुरक्षेचा महिला सुरक्षा समितीच्या अध्यक्ष पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी माहिती जाणून घेतली. शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असून त्याबाबतच्या शासन निर्णयाची माहिती उपस्थित पदाधिकाऱ्यांना डॉ. सिंह यांनी दिली. बैठकीत निर्जनस्थळांची यादी बनविण्यात यावी, तसेच याबाबत व्यापक सुरक्षा व्यवस्था कशी करावी, यावर सखोल चर्चा करण्यात आली. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजनांच्या माहितीबाबत समितीच्या पदाधिकाऱ्यांना अवगत करण्यात आले. महिलांवरील अत्याचाराविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी बजाविणाऱ्या नागरिकांना शासनातर्फे निर्भय पुरस्कार दिला जाईल. याबाबतची माहिती सर्वसामान्यांपर्यत पोहोचवून पुरस्काराबाबत अधिकाधिक माहिती होईल, या संदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे मार्गदर्शन त्यांनी बैठकीत केले. (प्रतिनिधी)

Web Title: Increasing atrocities on women will stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.