शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक: "कोरोनाच्या संसर्गात वाढ; मात्र नव्या लाटेची चिन्हे नाहीत!" अशी आहे महाराष्ट्राची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 06:59 IST

कोरोना प्रतिबंधक लसीच्या माध्यमातून व अंतरनियम पाळून कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा विश्वासही परिषदेने व्यक्त केला आहे.  कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारामुळे देशात सध्या या साथीचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत आहे की, अन्य काही कारणे त्यामागे आहेत, याचा शोध आम्ही घेत आहोत.

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढत चाललेला असतानाच एक दिलासादायक बातमी शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर) दिली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी या महासाथीची दुसरी लाट येण्याची शक्यता तूर्तास दिसत नाही, असा निर्वाळा ‘सीएसआयआर’ने दिला आहे. (Increased corona infection; But there are no signs of a new wave)कोरोना प्रतिबंधक लसीच्या माध्यमातून व अंतरनियम पाळून कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा विश्वासही परिषदेने व्यक्त केला आहे. कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारामुळे देशात सध्या या साथीचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत आहे की, अन्य काही कारणे त्यामागे आहेत, याचा शोध आम्ही घेत आहोत. मात्र, तूर्तास तरी कोरोनाची नवी लाट येण्याची शक्यता दिसत नाही, असे सीएसआयरचे संचालक अनुराग अग्रवाल यांनी शनिवारी स्पष्ट केले. दरम्यान, इतर देशांइतके रुग्णवाढीचे प्रमाण भारतात नसल्याचेही तज्ज्ञांनी निदर्शनास आणून दिले. तसेच सुरक्षेच्या नियमांचे पालन केले आणि मास्कच्या वापराबाबत जनजागृती केली तर रुग्णसंख्या आटाेक्यात येऊ शकते, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.एका दिवसात २० लाख लोकांना लसदेशात २० लाखांहून अधिक लोकांना कोरोना लस देण्यात आली. तर देशात शनिवारी कोरोनाचे २४,८८२ नवे रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या १ कोटी १३ लाखांवर पोहोचली. महाराष्ट्राची स्थिती - 

महाराष्ट्रात शनिवारी १५ हजार ६०२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून, ८८ मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २२,९७,७९३ झाली असून, बळींचा आकडा ५२ हजार ८११ झाला आहे. राज्यात १ लाख १८ हजार ५२५ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. शनिवारी दिवसभरात ७,४६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत एकूण २१,२५,२११ रुग्ण काेराेनामुक्त झाले. 

उत्तर प्रदेश आघाडीवर -देशात लसीकरण मोहिमेत उत्तर प्रदेश हे राज्य आघाडीवर असून, तिथे शनिवारी एका दिवसात ३ लाख ३० हजार लोकांना लस देण्यात आली. 

आणखी सहा लसी... -- आणखी सहापेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधक लसी भारतात येणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी शनिवारी दिली.- भारताने कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड या दोन लसी विकसित केल्या असून त्यांचा जगभरातील ७१ देशांना पुरवठा केला आहे.- लोकांच्या निष्काळजीपणामुळे महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे लोकांनी शारीरिक अंतर राखणे तसेच मास्क परिधान करणे, यापुढे ही सुरू ठेवावे, असा सल्लाही आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टर