शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शेतमजूर, कामगारांच्या किमान वेतनात वाढ; केंद्र सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 05:59 IST

किमान वेतनाची अंमलबजावणी करणे बंधनकारक

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रासह औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्याचा निर्णय गुरुवारी केंद्र सरकारने घेतला. ही वाढ कौशल्ये आणि क्षेत्रानुसार भिन्न आहे.

केंद्रीय श्रम आयुक्तांनी यासंबंधीची अधिसूचना जारी केला असून वाढलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्यात आल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. किमान वेतन कायदा १९४८ अन्वये केंद्र आणि राज्य सरकारे अशा दोघांनाही आपापल्या अखत्यारीतील क्षेत्रातील कामगारांचे किमान वेतन ठरविण्याचा अथवा त्यात सुधारणा करण्याचा अधिकार आहे.

बांधकाम मजूर, मालाची चढ-उतर करणारे कामगार, सुरक्षा रक्षक, चौकीदार, घरगुती कामगार, खाण कामगार आणि शेतमजूर यांना याचा लाभ हाेणार आहे. याआधीची किमान वेतनातील वाढ यंदा एप्रिलमध्ये करण्यात आली होती. किमान वेतनाची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे.

राेज किती मिळावे, महिन्याला किती असावे?

बांधकाम, स्वच्छता, सफाई, माल चढ-उतार क्षेत्रातील अकुशल कामगारांचे किमान वेतन आता ७८३ प्रति दिन अथवा २०,३५८ रुपये प्रतिमहिना (जे अधिक असेल ते). अर्धकुशल कामगारांसाठी ते ८६८ रुपये प्रतिदिन अथवा २२,५६३ रुपये प्रतिमहिना. लिपिक आणि निशस्त्र सुरक्षा रक्षकांसाठी ते ९५४ रुपये प्रतिदिन अथवा २४,८०४ रुपये प्रतिमहिना. सशस्त्र सुरक्षा रक्षकांसाठी किमान वेतन १,०३५ रुपये अथवा २६,९१० रुपये प्रतिमाह निश्चित करण्यात आले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी