शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

शहीद झालेल्या CRPF जवानांच्या कुटुंबीयांस मिळणाऱ्या निधीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 17:29 IST

केंद्रीय राखीव दलातील पोलीस जवानांना कर्तव्यावर असताना वीरमरण प्राप्त झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांस देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्यात आली आहे

नवी दिल्ली - पोलीस खाते, सैन्य दल किंवा अर्धसैन्य दलात नोकरी करताना जीव मुठीत धरुन, जीवावर उदार होऊनच अनेकदा कर्तव्य बजावावे लागते. त्यातच, केंद्रीय राखीव दलातील कर्मचाऱ्यांनाही दंगल, जाळपोळ, नक्षलग्रस्त भाग किंवा कधी कधी सीमारेषेवरही कर्तव्य बजावावे लागते. यावेळी, अनेकदा शत्रूशी दोनहात करताना वीरमरणही प्राप्त होते. त्यानंतर, जवानांच्या कुटुंबीयांना सरकारकडून मदतनिधी देण्यात येतो. या मदतनिधीत आता वाढ करण्यात आली आहे. 

केंद्रीय राखीव दलातील पोलीस जवानांना कर्तव्यावर असताना वीरमरण प्राप्त झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांस देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. या निधीत 20 लाखांहून वाढवत 30 लाख असा सानुग्रह निधी देण्यात येणार आहे. सीआरपीएफचे महासंचालक कुलदीपसिंह यांनी गुरूवारी यासंदर्भातील घोषणा केली. कर्तव्यावर असताना शहीदगती प्राप्त झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबीयांस मिळणाऱ्या निधीत वाढ करण्यात आली असून यापुढे हा निधी 30 लाख रुपये केल्याचे कुलदीपसिंह यांनी सांगितले.

370 हटवल्यानंतर दगडफेकीच्या घटना कमी

दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर सातत्याने होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांमध्ये कमी आली आहे. तसेच, केंद्रशासित प्रदेशातील सुरक्षेसंदर्भात बोलताना कुलदीपसिंह म्हणाले की, आर्टीकल 370 हटविल्यानंतर येथील दगडफेकीच्या घटना बहुतांश शुन्यावर येऊन पोहचल्या आहेत. तर, विदेशी दहशतवादी आणि घुसकोरीच्या घटनाही कमी झाल्या आहेत. नुकतेच पार पडलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांदरम्यान, सीआरपीएफने 41 व्हीआयपींना सुरक्षा पुरवली होती. निवडणुकीनंतर 27 सुरक्षाप्राप्त लोकांकडून ही सुरक्षा काढून घेण्यात आल्याचेही कुलदीपसिंह यांनी सांगितले. 

टॅग्स :Policeपोलिसdelhiदिल्लीSoldierसैनिक