शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

शहीद झालेल्या CRPF जवानांच्या कुटुंबीयांस मिळणाऱ्या निधीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 17:29 IST

केंद्रीय राखीव दलातील पोलीस जवानांना कर्तव्यावर असताना वीरमरण प्राप्त झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांस देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्यात आली आहे

नवी दिल्ली - पोलीस खाते, सैन्य दल किंवा अर्धसैन्य दलात नोकरी करताना जीव मुठीत धरुन, जीवावर उदार होऊनच अनेकदा कर्तव्य बजावावे लागते. त्यातच, केंद्रीय राखीव दलातील कर्मचाऱ्यांनाही दंगल, जाळपोळ, नक्षलग्रस्त भाग किंवा कधी कधी सीमारेषेवरही कर्तव्य बजावावे लागते. यावेळी, अनेकदा शत्रूशी दोनहात करताना वीरमरणही प्राप्त होते. त्यानंतर, जवानांच्या कुटुंबीयांना सरकारकडून मदतनिधी देण्यात येतो. या मदतनिधीत आता वाढ करण्यात आली आहे. 

केंद्रीय राखीव दलातील पोलीस जवानांना कर्तव्यावर असताना वीरमरण प्राप्त झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांस देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. या निधीत 20 लाखांहून वाढवत 30 लाख असा सानुग्रह निधी देण्यात येणार आहे. सीआरपीएफचे महासंचालक कुलदीपसिंह यांनी गुरूवारी यासंदर्भातील घोषणा केली. कर्तव्यावर असताना शहीदगती प्राप्त झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबीयांस मिळणाऱ्या निधीत वाढ करण्यात आली असून यापुढे हा निधी 30 लाख रुपये केल्याचे कुलदीपसिंह यांनी सांगितले.

370 हटवल्यानंतर दगडफेकीच्या घटना कमी

दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर सातत्याने होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांमध्ये कमी आली आहे. तसेच, केंद्रशासित प्रदेशातील सुरक्षेसंदर्भात बोलताना कुलदीपसिंह म्हणाले की, आर्टीकल 370 हटविल्यानंतर येथील दगडफेकीच्या घटना बहुतांश शुन्यावर येऊन पोहचल्या आहेत. तर, विदेशी दहशतवादी आणि घुसकोरीच्या घटनाही कमी झाल्या आहेत. नुकतेच पार पडलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांदरम्यान, सीआरपीएफने 41 व्हीआयपींना सुरक्षा पुरवली होती. निवडणुकीनंतर 27 सुरक्षाप्राप्त लोकांकडून ही सुरक्षा काढून घेण्यात आल्याचेही कुलदीपसिंह यांनी सांगितले. 

टॅग्स :Policeपोलिसdelhiदिल्लीSoldierसैनिक