शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

शहीद झालेल्या CRPF जवानांच्या कुटुंबीयांस मिळणाऱ्या निधीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 17:29 IST

केंद्रीय राखीव दलातील पोलीस जवानांना कर्तव्यावर असताना वीरमरण प्राप्त झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांस देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्यात आली आहे

नवी दिल्ली - पोलीस खाते, सैन्य दल किंवा अर्धसैन्य दलात नोकरी करताना जीव मुठीत धरुन, जीवावर उदार होऊनच अनेकदा कर्तव्य बजावावे लागते. त्यातच, केंद्रीय राखीव दलातील कर्मचाऱ्यांनाही दंगल, जाळपोळ, नक्षलग्रस्त भाग किंवा कधी कधी सीमारेषेवरही कर्तव्य बजावावे लागते. यावेळी, अनेकदा शत्रूशी दोनहात करताना वीरमरणही प्राप्त होते. त्यानंतर, जवानांच्या कुटुंबीयांना सरकारकडून मदतनिधी देण्यात येतो. या मदतनिधीत आता वाढ करण्यात आली आहे. 

केंद्रीय राखीव दलातील पोलीस जवानांना कर्तव्यावर असताना वीरमरण प्राप्त झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांस देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. या निधीत 20 लाखांहून वाढवत 30 लाख असा सानुग्रह निधी देण्यात येणार आहे. सीआरपीएफचे महासंचालक कुलदीपसिंह यांनी गुरूवारी यासंदर्भातील घोषणा केली. कर्तव्यावर असताना शहीदगती प्राप्त झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबीयांस मिळणाऱ्या निधीत वाढ करण्यात आली असून यापुढे हा निधी 30 लाख रुपये केल्याचे कुलदीपसिंह यांनी सांगितले.

370 हटवल्यानंतर दगडफेकीच्या घटना कमी

दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर सातत्याने होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांमध्ये कमी आली आहे. तसेच, केंद्रशासित प्रदेशातील सुरक्षेसंदर्भात बोलताना कुलदीपसिंह म्हणाले की, आर्टीकल 370 हटविल्यानंतर येथील दगडफेकीच्या घटना बहुतांश शुन्यावर येऊन पोहचल्या आहेत. तर, विदेशी दहशतवादी आणि घुसकोरीच्या घटनाही कमी झाल्या आहेत. नुकतेच पार पडलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांदरम्यान, सीआरपीएफने 41 व्हीआयपींना सुरक्षा पुरवली होती. निवडणुकीनंतर 27 सुरक्षाप्राप्त लोकांकडून ही सुरक्षा काढून घेण्यात आल्याचेही कुलदीपसिंह यांनी सांगितले. 

टॅग्स :Policeपोलिसdelhiदिल्लीSoldierसैनिक