शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

गेल्या वर्षी तुम्ही रिटर्न्स (आयकर परतावा) भरले नव्हते का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 12:30 IST

काही लोकांना आयकर परतावा भरता आला नाही तर काय करायचे हा प्रश्न उरतोच. तसेच गेल्या वर्षीही काही लोकांना परतावा भरणे अनेक कारणांमुळे शक्य झाले नसावे. त्यांनी काय करावे?

मुंबई- 31 जुलै  तारिख जवळ येते तशी आयकर परतावा (इन्कम टॅक्स रिटर्न्स) भरण्यासाठी सर्वांची लगबग सुरु होते. आयकर परतावा भरण्यासाठी संबंधित आर्थिक वर्षाची साधारणपणे 31 जुलै ही शेवटची तारिख असते. अर्थाच 2017-18 या आर्थिक वर्षाचा परतावा भरण्यासाठी ही मुदत 31 ऑगस्ट 2018 पर्यंत वाढविण्यात आली आहे. परंतु तरिही काही लोकांना आयकर परतावा भरता आला नाही तर काय करायचे हा प्रश्न उरतोच. तसेच गेल्या वर्षीही काही लोकांना परतावा भरणे अनेक कारणांमुळे शक्य झाले नसावे.

वेळेत आयकर परतावा न भरण्याचे अनेक तोटे आहेत त्यामुळे आयकर परतावा वेळेत भरावा असेच आवाहन सर्वांना केले जाते. आयकर परतावा वेळेत न भरल्यास तुमच्यावर व्याजही देण्याची वेळ येऊ शकते, तुम्हाला दंड होऊ शकतो.

सरकारने जाहीर केलेल्या विहित वेळेत जर आयकर परतावा भरता आला नाही तर त्या आर्थिक वर्षाचा शेवट होण्याआधी आपल्याला परतावा भरता येतो. याचाच अर्थ 31 मार्च पर्यंत आयकर परतावा भरता येतो. 2016-17 या आर्थिक वर्षासाठीच्या परताव्यासाठी मात्र त्यासाठी 5000 रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो.2017-18 या आर्थिक वर्षाच्या परताव्यास उशिर झाल्यास5 लाखापर्यंतचे उत्पन्न असणाऱ्यांना 1000 रुपयांचा दंड होईल.5 लाखांहून अधिकचे करयोग्य उत्पन्न असणाऱ्यांना या आर्थिक वर्षात 31 डिसेंबरपर्यंत परतावा भरल्यास 5000 रुपये दंड होईल आणि त्यानंतर भरल्यास 10, 000 रुपये दंडापोटी द्यावे लागतील.

 

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सIndiaभारत