शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
4
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
5
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
6
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
7
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
8
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
9
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
10
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
11
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
12
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
13
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
14
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
15
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
16
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
17
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
18
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
19
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
20
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत हे तीन पक्ष ठरणार किंगमेकर, ज्याला देतील पाठिंबा त्याचा होईल विजय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 13:07 IST

President Election 2022: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या उमेदवारांच्या जय-पराजयाचं भवितव्य हे सध्य तटस्थ असलेल्या बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस आणि तेलंगाणा राष्ट्र समिती या तीन पक्षांच्या हातात आहे. हे तीन पक्ष ज्या उमेदवाराच्या पारड्यात आपली मतं टाकतील तो उमेदवार राष्ट्रपतीपदी विराजमान होणार आहे.

नवी दिल्ली - देशाच्या पुढील राष्ट्रपतींच्या निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी १८ जुलै रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपा तसेच विरोधी पक्षांकडून उमेदवाराचा शोध सुरू झाला आहे. दरम्यान, भाजपाकडून राष्ट्रपतीपदासाठी देण्यात येणाऱ्या उमेदवाराविरोधात सर्वसहमतीने उमेदवार देण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी विरोधी पक्षांनी दिल्लीमध्ये बैठक बोलावली आहे. तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधी पक्षांमध्ये एकमत करण्याची जबाबदारी सोपवली आहे. मात्र या संपूर्ण निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या उमेदवारांच्या जय-पराजयाचं भवितव्य हे सध्य तटस्थ असलेल्या बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस आणि तेलंगाणा राष्ट्र समिती या तीन पक्षांच्या हातात आहे. हे तीन पक्ष ज्या उमेदवाराच्या पारड्यात आपली मतं टाकतील तो उमेदवार राष्ट्रपतीपदी विराजमान होणार आहे. त्यामुळे आता या पक्षांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी या तिन्ही पक्षांना निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीला  इतर विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र बिजू जनता दल आणि वायएसआर काँग्रेस यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. राष्ट्रपती निवडणुकीमध्ये लोकसभा, राज्यसभा तसेच विधानसभांचे सदस्य मतदान करतात. राज्यसभेच्या २३३, लोकसभेच्या ५४३ आणि सर्व राज्यांच्या विधानसभांचे मिळून ४१२० सदस्य आहेत. त्यांची एकूण संख्या ४८९६ एवढी होते. आमदार आणि खासदारांच्या मतांचं मूल्य हे वेगवेगळं असतं. राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदारंच्या मतांचं एकूण मूल्य हे १० लाख ८६ हजार ४३१ एवढं आहे. तसेच विजयासाठी अर्ध्याहून एक अधिक मताची आवश्यका असेल. त्यामुळे ५ लाख ४३ हजार २१६ मतं मिळवणारा उमेदवार विजयी ठरेल.

राष्ट्रपती निवडणुकीसाठी सध्या भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचं पारडं जड आहे. मात्र भाजपाला इतर पक्षांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. सध्या भाजपा आणि त्याच्या मित्रांकडे ४८ टक्के मतं आहेत. एकूण १० लाख ८६ हजार मतांपैकी भाजपाकडे ५ लाख २६ हजार मतं आहेत. तर बहुमताचा आकडा ५ लाख ४३ हजार एवढा आहे. दरम्यान सर्व विरोधी पक्षांकडे मिळून ५१ टक्के मतं आहेत. त्यामुळे सर्व विरोधा पक्षांच्या मतांची गोळाबेरीज केली तर ती एनडीएपेक्षा २ ते ३ टक्के अधिक आहे. त्यामुळे विरोधी पक्षांकडून संयुक्त उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात टीआरएस, बीजेडी आणि वायएसआर काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरेल.

२०१७ मध्ये या तिन्ही पक्षांनी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. मात्र यावेळी टीआरएस विरोधी पक्षांची आघाडी उभी करण्याच्या प्रयत्नात असल्याने ते भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता कमी आहे. तर बीजेडी आणि वायएसआर काँग्रेसने आपले पत्ते अजून खुले केलेले नाहीत.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी एनडीएला सुमारे १३ हजार मतांची गरज आहे. जर वायएसआर काँग्रेस आणि बीजेडीने पाठिंबा दिला तर एनडीएच्या उमेदवाराच्या विजयाचा मार्ग मोकळा होईल. काही दिवसांपूर्वी वाएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी आणि ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी मोदींची भेट घेतली होती. मात्र त्यात नेमकी काय चर्चा झाली हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही.

नवीन पटनाईक, जगनमोहन रेड्डी आणि केसीआर यांनी सुरुवातीपासूनच काँग्रेसविरोधी भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी त्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात केसीआर हे ममतांच्या बाजूने जाण्याची शक्यता दिसत आहे. मात्र बीजेडी आणि वायएसआर काँग्रेसने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. 

टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षElectionनिवडणूकPoliticsराजकारण