शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

लातूर प्रकरणात सुप्रीम कोर्टाने अटकेपासून संरक्षण देऊनही कोठडीत रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 08:28 IST

न्यायालयाने व्यक्त केली गंभीर चिंता, आता सुप्रीम कोर्ट उद्या, ७ जुलै रोजी या प्रकरणावर सुनावणी करणार आहे.

डॉ. खुशालचंद बाहेतीनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून अंतरिम संरक्षण दिलेल्या व्यक्तीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट निघण्याच्या व त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याच्या लातूरच्या न्यायदंडाधिकाऱ्यांच्या निर्णयाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली आहे.सन २०२०मध्ये एमआयडीसी लातूर पोलीस ठाण्यात शिवराम पंडित यांच्या विरुद्ध फसवणूक आणि बनावट दस्तऐवजाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जमिनीच्या वादाशी संबंधित हे प्रकरण आहे. पंडित यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

७ मे २०२१ रोजी सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली व ६ आठवड्यात बाजू मांडण्याचे आदेश सरकारला दिले. दरम्यान, पंडितला अटक करु नये, असेही आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास पुर्ण करुन पंडीत यांना अटक न करता चार्ज शिट दाखल केले. ४ जुलै, २०२२ रोजी पंडित यांच्यातर्फे सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करुन त्यांना २४ जून २०२२ रोजी अटक करण्यात आली आणि ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची सुटका करावी, अशी विनंती करण्यात आली.

न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि कृष्णा मुरारी यांच्या सुट्टीतील खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की, ७ मे २०२१च्या विशिष्ट अंतरिम आदेशानंतरही अभियोग पक्षाने पंडित यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट मिळवले आणि जेव्हा ते न्यायालयात हजर झाले तेव्हा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी क्रमांक २, लातूर यांनी २४ जून २०२२च्या आदेशाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले. ७ मे २०२१ रोजीचे सर्वोच्च न्यायालयाचे अटकेपासूनचे अंतरिम संरक्षण सहा आठवड्यांनंतर संपुष्टात आल्याचे निरीक्षण मॅजिस्ट्रेट कोर्टाने न्यायालयीन कोठडी देताना केले. सुप्रीम कोर्टाने पंडित यांना त्याच दिवशी सोडावे आणि त्याच दिवशी याचा अनुपालन अहवाल  न चुकतासादर करण्याचे आदेश दिले. आता सुप्रीम कोर्ट उद्या, ७ जुलै रोजी या प्रकरणावर सुनावणी करणार आहे.

न्यायदंडाधिकाऱ्यांनी याचिकाकर्त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे कारण पाहता अभियोग पक्षाचा प्रामाणिकपणा आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे न्यायदंडाधिकाऱ्यांनी केलेले आकलन हे गंभीर चिंतेचे विषय बनतात.- दिनेश माहेश्वरी आणि कृष्णा मुरारी, न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालय

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय