शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

युतीची बोलणी फिस्कटली, 'या' राज्यात भाजपा स्वबळावर निवडणूक लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 17:55 IST

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने राज्यात ४४.८ टक्के मते घेत २१ जागांपैकी २० जागांवर यश मिळवलं होते.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली असून ७ टप्प्यात मतदान पार पडणार आहे. आघाडी आणि जागावाटपांवर चर्चा सुरू आहे. त्यातच ओडिशात मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासोबत भाजपाची बोलणी फिस्कटली आहेत. त्यामुळे आता भाजपा स्वबळावर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची घोषणा केली आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपा आणि बीजू जनता दल यांच्यात आघाडीबाबत चर्चा सुरू होती. यात दोन्ही पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढतील असं बोललं जात होते. मात्र त्यातच काही गोष्टींवर बिनसलं आणि भाजपाने ओडिशात स्वबळावर निवडणूक लढणार अशी घोषणा केली. भाजपा प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल यांनी एक्सवर घोषणा केलीय की, मागील १० वर्षापासून नवीन पटनायक यांच्या नेतृत्वात ओडिशात बीजू जनता दल मोदी सरकारच्या अनेक राष्ट्रीय योजनांमध्ये समर्थन देत आली. त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. परंतु केंद्र सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना प्रत्यक्षात जमिनीवर पोहचल्या नाहीत. त्यामुळे ओडिशातील जनता योजनांपासून वंचित राहिली असं त्यांनी सांगितले. 

तसेच ओडिशा अस्मिता, गौरव आणि ओडिशातील लोकांच्या हितासाठी आम्ही काम करतोय. ओडिशाच्या विकासासाठी भाजपा यंदा लोकसभेच्या २१ जागा आणि विधानसभेच्या १४७ जागांवर स्वबळाने निवडणूक लढणार आहे असं भाजपाकडून घोषित केले आहे. ओडिशातील जागावाटपात भाजपाला सर्वाधिक जागा हव्या होत्या त्यामुळे दोन्ही पक्षातील बोलणी अयशस्वी ठरली. त्यामुळे आता हे पक्ष एकट्याने निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. 

दरम्यान, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने राज्यात ४४.८ टक्के मते घेत २१ जागांपैकी २० जागांवर यश मिळवलं होते. तर बीजू जनता दलाने १ जागेवर विजय मिळवला होता. २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने ८ तर बीजू जनता दलाने ८ जागांवर विजय मिळवला. तर विधानसभा निवडणुकीत बीजू जनता दलाने ११२ आणि भाजपाने २३ जागांवर विजय मिळवला होता. 

टॅग्स :BJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४