शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आईने शाळेत मोबाईल नेण्यास दिला नकार; नववीतील मुलाने केली आत्महत्या, 4 दिवसांनी सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 16:27 IST

आईने शाळेत मोबाईल नेण्यास नकार दिल्याने नववीतील मुलाने आत्महत्या केली.

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील खरगोन येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे इयत्ता नववीतील मुलाला आईने शाळेत मोबाईल नेण्यास नकार दिल्याने त्याने आत्महत्या केली. खरगोन जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 80 किमी अंतरावर असलेल्या बारवाह पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या भृत्य शर्मा यांचा 13 वर्षांचा मुलगा प्रकाश 4 दिवसांपूर्वी परीक्षेसाठी निघाला होता. मात्र तो वेळेत शाळेत पोहचला नाही आणि 4 दिवस घरीही परतला नाही. 

दरम्यान, प्रकाश परीक्षा देण्यासाठी घरातून गेला होता मात्र तो शाळेत पोहचलाच नव्हता. चार दिवसांनंतर त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आला. प्रकाश याच्या नातेवाईकांना याची माहिती मिळताच कुटुंबात एकच खळबळ माजली. पीडब्यूडी विभागात कार्यरत असलेल्या भृत्य शर्मा यांचा मुलगा 4 दिवसांपूर्वी परीक्षेसाठी घरातून निघाला होता. मात्र तेव्हा त्याच्या आईने त्याला मोबाईल नेण्यास विरोध केला. त्यानंतर तो रागात घरातून बाहेर पडला आणि त्याने आत्महत्या केली. 

4 दिवसांनी सापडला मृतदेह  आपला मुलगा सापडत नसल्याने प्रकाशच्या वडिलांनी बारवाह पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. तब्बल चार दिवसांनी रेल्वे पुलाजवळ मृतदेह आढळून आल्याने नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली. प्रकाशचे मामा यांनी मृतदेहाची स्थिती पाहून धास्तीच घेतली. पोलिसांनी प्रकाशच्या वडिलांना बोलावले असता कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळाली. मुलाचा मृतदेह पाहून प्रकाशचे वडील मोठ्याने रडू लागले. "त्याच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या पण मोबाईल न दिल्याने एवढी मोठी शिक्षा दिली", असे म्हणत भृत्य शर्मा यांना अश्रू अनावर झाले. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसMobileमोबाइलDeathमृत्यू