शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

आईने शाळेत मोबाईल नेण्यास दिला नकार; नववीतील मुलाने केली आत्महत्या, 4 दिवसांनी सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 16:27 IST

आईने शाळेत मोबाईल नेण्यास नकार दिल्याने नववीतील मुलाने आत्महत्या केली.

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील खरगोन येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे इयत्ता नववीतील मुलाला आईने शाळेत मोबाईल नेण्यास नकार दिल्याने त्याने आत्महत्या केली. खरगोन जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 80 किमी अंतरावर असलेल्या बारवाह पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या भृत्य शर्मा यांचा 13 वर्षांचा मुलगा प्रकाश 4 दिवसांपूर्वी परीक्षेसाठी निघाला होता. मात्र तो वेळेत शाळेत पोहचला नाही आणि 4 दिवस घरीही परतला नाही. 

दरम्यान, प्रकाश परीक्षा देण्यासाठी घरातून गेला होता मात्र तो शाळेत पोहचलाच नव्हता. चार दिवसांनंतर त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आला. प्रकाश याच्या नातेवाईकांना याची माहिती मिळताच कुटुंबात एकच खळबळ माजली. पीडब्यूडी विभागात कार्यरत असलेल्या भृत्य शर्मा यांचा मुलगा 4 दिवसांपूर्वी परीक्षेसाठी घरातून निघाला होता. मात्र तेव्हा त्याच्या आईने त्याला मोबाईल नेण्यास विरोध केला. त्यानंतर तो रागात घरातून बाहेर पडला आणि त्याने आत्महत्या केली. 

4 दिवसांनी सापडला मृतदेह  आपला मुलगा सापडत नसल्याने प्रकाशच्या वडिलांनी बारवाह पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. तब्बल चार दिवसांनी रेल्वे पुलाजवळ मृतदेह आढळून आल्याने नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली. प्रकाशचे मामा यांनी मृतदेहाची स्थिती पाहून धास्तीच घेतली. पोलिसांनी प्रकाशच्या वडिलांना बोलावले असता कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळाली. मुलाचा मृतदेह पाहून प्रकाशचे वडील मोठ्याने रडू लागले. "त्याच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या पण मोबाईल न दिल्याने एवढी मोठी शिक्षा दिली", असे म्हणत भृत्य शर्मा यांना अश्रू अनावर झाले. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसMobileमोबाइलDeathमृत्यू