शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

आईने शाळेत मोबाईल नेण्यास दिला नकार; नववीतील मुलाने केली आत्महत्या, 4 दिवसांनी सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 16:27 IST

आईने शाळेत मोबाईल नेण्यास नकार दिल्याने नववीतील मुलाने आत्महत्या केली.

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील खरगोन येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे इयत्ता नववीतील मुलाला आईने शाळेत मोबाईल नेण्यास नकार दिल्याने त्याने आत्महत्या केली. खरगोन जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 80 किमी अंतरावर असलेल्या बारवाह पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या भृत्य शर्मा यांचा 13 वर्षांचा मुलगा प्रकाश 4 दिवसांपूर्वी परीक्षेसाठी निघाला होता. मात्र तो वेळेत शाळेत पोहचला नाही आणि 4 दिवस घरीही परतला नाही. 

दरम्यान, प्रकाश परीक्षा देण्यासाठी घरातून गेला होता मात्र तो शाळेत पोहचलाच नव्हता. चार दिवसांनंतर त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आला. प्रकाश याच्या नातेवाईकांना याची माहिती मिळताच कुटुंबात एकच खळबळ माजली. पीडब्यूडी विभागात कार्यरत असलेल्या भृत्य शर्मा यांचा मुलगा 4 दिवसांपूर्वी परीक्षेसाठी घरातून निघाला होता. मात्र तेव्हा त्याच्या आईने त्याला मोबाईल नेण्यास विरोध केला. त्यानंतर तो रागात घरातून बाहेर पडला आणि त्याने आत्महत्या केली. 

4 दिवसांनी सापडला मृतदेह  आपला मुलगा सापडत नसल्याने प्रकाशच्या वडिलांनी बारवाह पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. तब्बल चार दिवसांनी रेल्वे पुलाजवळ मृतदेह आढळून आल्याने नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली. प्रकाशचे मामा यांनी मृतदेहाची स्थिती पाहून धास्तीच घेतली. पोलिसांनी प्रकाशच्या वडिलांना बोलावले असता कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळाली. मुलाचा मृतदेह पाहून प्रकाशचे वडील मोठ्याने रडू लागले. "त्याच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या पण मोबाईल न दिल्याने एवढी मोठी शिक्षा दिली", असे म्हणत भृत्य शर्मा यांना अश्रू अनावर झाले. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसMobileमोबाइलDeathमृत्यू