शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भारतामध्ये ६५ वर्षांत हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली, अहवालावरून खळबळ, भाजपा-कांग्रेसचे आरोप प्रत्यारोप   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 15:16 IST

Lok Sabha Election 2024: भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर काळात हिंदूंची लोकसंख्या घटल्याची आणि मु्स्लिमांची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याची आकडेवारी एका अहवालातून समोर आली आहे. हा अहवाल प्रसिद्ध होताच भाजपा आणि काँग्रेसने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. 

भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर काळात हिंदूंची लोकसंख्या घटल्याची आणि मु्स्लिमांची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याची आकडेवारी एका अहवालातून समोर आली आहे. या अहवालानुसार १९५० ते २०१५ या काळात भारतातीलहिंदूंची संख्या ७.८ टक्क्यांनी घटल्याचे तर मुस्लिमांची लोकसंख्या ४३ टक्क्यांनी वाढल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. हा अहवाल प्रसिद्ध होताच भाजपा आणि काँग्रेसने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. 

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने हा अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार भारतातील हिंदूंच्या लोकसंख्येमध्ये १९५० ते २०१५ या काळात ७.८ टक्क्यांनी घट झाली आहे. याउलट भारताच्या शेजारील देशांमध्ये बहुसंख्याक समाजाच्या लोकसंख्येत वेगाने वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने आपल्या अहवालामध्ये जगभरातील १६७ देशांमधील परिस्थितीचा अभ्यास करून माहिती देण्यात आली आहे. मे २०२४ मध्ये हा अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार भारतात बहुसंख्याक हिंदूंची लोकसंख्येमधील हिस्सेदारी कमी झाली आहे. दुसरीकडे मुस्लिम, ख्रिश्चन, बुद्ध आणि शीखांची इतर अल्पसंख्याकांची लोकसंख्येमधील भागिदारी वाढली आहे. मात्र जैन, पारशी धर्मांच्या लोकसंख्येत घट झाली आहे. १९५० ते २०१५ या काळात भारतामध्ये मुस्लिम लोकसंख्या ४३.१५ टक्क्यांनी वाढली आहे. तर ख्रिश्चनांच्या लोकसंख्येत ५.३८ टक्के शिखांच्या संख्येत ६.५८ टक्के आणि बुद्धांच्या संख्येत किरकोळ वाढ दिसून आली.

दरम्यान, हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. देशाची दिशाभूल करण्याचा काही लोकांचा प्रयत्न होता. मात्र सत्य लपून राहत नाही. १९४७ मध्ये हिंदूंची लोकसंख्या सुमारे ९० टक्के होती. मात्र आज ती ७० टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. पूर्वी ८ टक्के असलेले मुस्लिम २० टक्के झालेली आहे. काँग्रेसने देशाला धर्मशाळा बनवले आहे. देशात बांगलादेशी घुसखोर आले आहेत. रोहिंग्या आले आहेत. आता हे मुस्लिमांना आरक्षण देण्याची तयारी करत आहेत. ते भारताला इस्लामिक स्टेट बनवण्याच्या तयारीत आहेत, असा आरोप गिरिराज सिंह यांनी केला.

भाजपाच्या आरोपांना काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. लोकांच्या जीवनाशी संबंधित मुद्द्यांवर बोललं पाहिजे. बेरोजगारी, शेतकरी, महिलांची सुरक्षा या मुद्द्यांवर बोललं गेलं पाहिजे. भाजपावाले आपणच मुद्दे काढतात आणि बोलत राहतात, हे मुद्दे नाही आहेत, असा टोला प्रियंका गांधी यांनी लगावला.  

टॅग्स :IndiaभारतHinduहिंदूMuslimमुस्लीमlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४