शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

"भारतात शांतता हिंदुंमुळे टिकून आहे, संविधानामुळे नव्हे"; सुप्रीम कोर्टाच्या वकिलांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 17:57 IST

सर्वोच्च न्यायालयाचे वकिल उपाध्याय यांचे विधान

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच PFI आणि त्याच्याशी संबंधित इतर अनेक संघटनांवर केंद्र सरकारने बुधवारी (28 सप्टेंबर) बंदी घातली. या मुद्द्यावर अनेक ठिकाणी चर्चासत्रे आयोजित करण्यात आली. यातील एका वृत्तवाहिन्यांच्या चर्चासत्रादरम्यान, सुप्रीम कोर्टाचे वकील अश्विनी उपाध्याय यांनी पीएफआयवर जोरदार निशाणा साधला. तसेच काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवत, भारत देशात शांतता संविधानामुळे नाही तर हिंदूंमुळे आहे, असेही विधान केले.

सर्वोच्च न्यायालयाचे वकील अश्विनी उपाध्याय म्हणाले, "आजच पीएफआयवर बंदी घालण्यात आली आणि आज काँग्रेसने दिग्विजय सिंह यांचे नाव काँग्रेस अध्यक्षपदासाठी पुढे केले यामागे काय कारण असू शकते? कदाचित उद्या ते काँग्रेसचे अध्यक्षही होतील. हे तेच दिग्विजय सिंह आहेत, जे पीएफआयसोबत स्टेजवर कार्यक्रमांना उपस्थित राहतात. ते या संघटनेचे सर्वात मोठे समर्थक आहेत. तेच दिग्विजय सिंह बाटला हाऊसला देखील थ्रो-इन एन्काउंटर असल्याचे सांगतात. ते ते ओसामा आणि दाऊद सारख्या अतिरेक्यांनाही जी असं संबोधित करतात. या साऱ्याचे काय कारण असेल याचा विचार करा."

"मला आता तरी असे दिसत आहेकी पीएफआय संपला आहे, परंतु त्याचा सर्वात मोठा समर्थक काँग्रेस पश्राचा अध्यक्ष होऊ शकतो. त्यामुळे यात नक्की काय संबंध ते तुम्ही ओळखू शकता? लोक अनेक गोष्टींच्या गप्पा मारतात पण मी म्हणतो की या देशात सुख-शांती, धर्मनिरपेक्षता ही केवळ संविधानामुळे नाही, भारतातील धर्मनिरपेक्षता आणि शांतता ही हिंदूंमुळेच प्रस्थापित झाली आहे. आधी हे हिंदू ९० टक्के होते, पण ते ७८ टक्क्यांवर आले आहेत", असे सूचक विधान त्यांनी केले.

"जिथे हिंदूंचा नाश झाला तिथे धर्मनिरपेक्षता चालत नाही. काश्मीर, लडाख आणि लक्षद्वीपमध्ये धर्मनिरपेक्षता चालत नाही. ज्या नऊ राज्यांत हिंदूंवर अन्याय झाला आहे तेथे धर्मनिरपेक्षता चालत नाही. या देशात जो बंधुभाव टिकून आहे तो हिंदूंमुळेच", असे त्यांनी ठणकावले. "पीएफआय दहशत पसरवते, लव्ह जिहादला समर्थन देते, धर्मांतर घडवून आणते. परदेशी निधी घेते. मदरसा चालवते, विविध पुस्तकांना समर्थन देते. त्यात इस्लामला न मानणारे काफिर असल्याचे सांगितले जात आहे", असे आरोपही त्यांनी केले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयHinduहिंदूadvocateवकिलIndiaभारत