शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

"भारतात शांतता हिंदुंमुळे टिकून आहे, संविधानामुळे नव्हे"; सुप्रीम कोर्टाच्या वकिलांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 17:57 IST

सर्वोच्च न्यायालयाचे वकिल उपाध्याय यांचे विधान

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच PFI आणि त्याच्याशी संबंधित इतर अनेक संघटनांवर केंद्र सरकारने बुधवारी (28 सप्टेंबर) बंदी घातली. या मुद्द्यावर अनेक ठिकाणी चर्चासत्रे आयोजित करण्यात आली. यातील एका वृत्तवाहिन्यांच्या चर्चासत्रादरम्यान, सुप्रीम कोर्टाचे वकील अश्विनी उपाध्याय यांनी पीएफआयवर जोरदार निशाणा साधला. तसेच काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवत, भारत देशात शांतता संविधानामुळे नाही तर हिंदूंमुळे आहे, असेही विधान केले.

सर्वोच्च न्यायालयाचे वकील अश्विनी उपाध्याय म्हणाले, "आजच पीएफआयवर बंदी घालण्यात आली आणि आज काँग्रेसने दिग्विजय सिंह यांचे नाव काँग्रेस अध्यक्षपदासाठी पुढे केले यामागे काय कारण असू शकते? कदाचित उद्या ते काँग्रेसचे अध्यक्षही होतील. हे तेच दिग्विजय सिंह आहेत, जे पीएफआयसोबत स्टेजवर कार्यक्रमांना उपस्थित राहतात. ते या संघटनेचे सर्वात मोठे समर्थक आहेत. तेच दिग्विजय सिंह बाटला हाऊसला देखील थ्रो-इन एन्काउंटर असल्याचे सांगतात. ते ते ओसामा आणि दाऊद सारख्या अतिरेक्यांनाही जी असं संबोधित करतात. या साऱ्याचे काय कारण असेल याचा विचार करा."

"मला आता तरी असे दिसत आहेकी पीएफआय संपला आहे, परंतु त्याचा सर्वात मोठा समर्थक काँग्रेस पश्राचा अध्यक्ष होऊ शकतो. त्यामुळे यात नक्की काय संबंध ते तुम्ही ओळखू शकता? लोक अनेक गोष्टींच्या गप्पा मारतात पण मी म्हणतो की या देशात सुख-शांती, धर्मनिरपेक्षता ही केवळ संविधानामुळे नाही, भारतातील धर्मनिरपेक्षता आणि शांतता ही हिंदूंमुळेच प्रस्थापित झाली आहे. आधी हे हिंदू ९० टक्के होते, पण ते ७८ टक्क्यांवर आले आहेत", असे सूचक विधान त्यांनी केले.

"जिथे हिंदूंचा नाश झाला तिथे धर्मनिरपेक्षता चालत नाही. काश्मीर, लडाख आणि लक्षद्वीपमध्ये धर्मनिरपेक्षता चालत नाही. ज्या नऊ राज्यांत हिंदूंवर अन्याय झाला आहे तेथे धर्मनिरपेक्षता चालत नाही. या देशात जो बंधुभाव टिकून आहे तो हिंदूंमुळेच", असे त्यांनी ठणकावले. "पीएफआय दहशत पसरवते, लव्ह जिहादला समर्थन देते, धर्मांतर घडवून आणते. परदेशी निधी घेते. मदरसा चालवते, विविध पुस्तकांना समर्थन देते. त्यात इस्लामला न मानणारे काफिर असल्याचे सांगितले जात आहे", असे आरोपही त्यांनी केले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयHinduहिंदूadvocateवकिलIndiaभारत