शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

"भारतात शांतता हिंदुंमुळे टिकून आहे, संविधानामुळे नव्हे"; सुप्रीम कोर्टाच्या वकिलांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 17:57 IST

सर्वोच्च न्यायालयाचे वकिल उपाध्याय यांचे विधान

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच PFI आणि त्याच्याशी संबंधित इतर अनेक संघटनांवर केंद्र सरकारने बुधवारी (28 सप्टेंबर) बंदी घातली. या मुद्द्यावर अनेक ठिकाणी चर्चासत्रे आयोजित करण्यात आली. यातील एका वृत्तवाहिन्यांच्या चर्चासत्रादरम्यान, सुप्रीम कोर्टाचे वकील अश्विनी उपाध्याय यांनी पीएफआयवर जोरदार निशाणा साधला. तसेच काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवत, भारत देशात शांतता संविधानामुळे नाही तर हिंदूंमुळे आहे, असेही विधान केले.

सर्वोच्च न्यायालयाचे वकील अश्विनी उपाध्याय म्हणाले, "आजच पीएफआयवर बंदी घालण्यात आली आणि आज काँग्रेसने दिग्विजय सिंह यांचे नाव काँग्रेस अध्यक्षपदासाठी पुढे केले यामागे काय कारण असू शकते? कदाचित उद्या ते काँग्रेसचे अध्यक्षही होतील. हे तेच दिग्विजय सिंह आहेत, जे पीएफआयसोबत स्टेजवर कार्यक्रमांना उपस्थित राहतात. ते या संघटनेचे सर्वात मोठे समर्थक आहेत. तेच दिग्विजय सिंह बाटला हाऊसला देखील थ्रो-इन एन्काउंटर असल्याचे सांगतात. ते ते ओसामा आणि दाऊद सारख्या अतिरेक्यांनाही जी असं संबोधित करतात. या साऱ्याचे काय कारण असेल याचा विचार करा."

"मला आता तरी असे दिसत आहेकी पीएफआय संपला आहे, परंतु त्याचा सर्वात मोठा समर्थक काँग्रेस पश्राचा अध्यक्ष होऊ शकतो. त्यामुळे यात नक्की काय संबंध ते तुम्ही ओळखू शकता? लोक अनेक गोष्टींच्या गप्पा मारतात पण मी म्हणतो की या देशात सुख-शांती, धर्मनिरपेक्षता ही केवळ संविधानामुळे नाही, भारतातील धर्मनिरपेक्षता आणि शांतता ही हिंदूंमुळेच प्रस्थापित झाली आहे. आधी हे हिंदू ९० टक्के होते, पण ते ७८ टक्क्यांवर आले आहेत", असे सूचक विधान त्यांनी केले.

"जिथे हिंदूंचा नाश झाला तिथे धर्मनिरपेक्षता चालत नाही. काश्मीर, लडाख आणि लक्षद्वीपमध्ये धर्मनिरपेक्षता चालत नाही. ज्या नऊ राज्यांत हिंदूंवर अन्याय झाला आहे तेथे धर्मनिरपेक्षता चालत नाही. या देशात जो बंधुभाव टिकून आहे तो हिंदूंमुळेच", असे त्यांनी ठणकावले. "पीएफआय दहशत पसरवते, लव्ह जिहादला समर्थन देते, धर्मांतर घडवून आणते. परदेशी निधी घेते. मदरसा चालवते, विविध पुस्तकांना समर्थन देते. त्यात इस्लामला न मानणारे काफिर असल्याचे सांगितले जात आहे", असे आरोपही त्यांनी केले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयHinduहिंदूadvocateवकिलIndiaभारत