शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"भारतात शांतता हिंदुंमुळे टिकून आहे, संविधानामुळे नव्हे"; सुप्रीम कोर्टाच्या वकिलांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 17:57 IST

सर्वोच्च न्यायालयाचे वकिल उपाध्याय यांचे विधान

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच PFI आणि त्याच्याशी संबंधित इतर अनेक संघटनांवर केंद्र सरकारने बुधवारी (28 सप्टेंबर) बंदी घातली. या मुद्द्यावर अनेक ठिकाणी चर्चासत्रे आयोजित करण्यात आली. यातील एका वृत्तवाहिन्यांच्या चर्चासत्रादरम्यान, सुप्रीम कोर्टाचे वकील अश्विनी उपाध्याय यांनी पीएफआयवर जोरदार निशाणा साधला. तसेच काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवत, भारत देशात शांतता संविधानामुळे नाही तर हिंदूंमुळे आहे, असेही विधान केले.

सर्वोच्च न्यायालयाचे वकील अश्विनी उपाध्याय म्हणाले, "आजच पीएफआयवर बंदी घालण्यात आली आणि आज काँग्रेसने दिग्विजय सिंह यांचे नाव काँग्रेस अध्यक्षपदासाठी पुढे केले यामागे काय कारण असू शकते? कदाचित उद्या ते काँग्रेसचे अध्यक्षही होतील. हे तेच दिग्विजय सिंह आहेत, जे पीएफआयसोबत स्टेजवर कार्यक्रमांना उपस्थित राहतात. ते या संघटनेचे सर्वात मोठे समर्थक आहेत. तेच दिग्विजय सिंह बाटला हाऊसला देखील थ्रो-इन एन्काउंटर असल्याचे सांगतात. ते ते ओसामा आणि दाऊद सारख्या अतिरेक्यांनाही जी असं संबोधित करतात. या साऱ्याचे काय कारण असेल याचा विचार करा."

"मला आता तरी असे दिसत आहेकी पीएफआय संपला आहे, परंतु त्याचा सर्वात मोठा समर्थक काँग्रेस पश्राचा अध्यक्ष होऊ शकतो. त्यामुळे यात नक्की काय संबंध ते तुम्ही ओळखू शकता? लोक अनेक गोष्टींच्या गप्पा मारतात पण मी म्हणतो की या देशात सुख-शांती, धर्मनिरपेक्षता ही केवळ संविधानामुळे नाही, भारतातील धर्मनिरपेक्षता आणि शांतता ही हिंदूंमुळेच प्रस्थापित झाली आहे. आधी हे हिंदू ९० टक्के होते, पण ते ७८ टक्क्यांवर आले आहेत", असे सूचक विधान त्यांनी केले.

"जिथे हिंदूंचा नाश झाला तिथे धर्मनिरपेक्षता चालत नाही. काश्मीर, लडाख आणि लक्षद्वीपमध्ये धर्मनिरपेक्षता चालत नाही. ज्या नऊ राज्यांत हिंदूंवर अन्याय झाला आहे तेथे धर्मनिरपेक्षता चालत नाही. या देशात जो बंधुभाव टिकून आहे तो हिंदूंमुळेच", असे त्यांनी ठणकावले. "पीएफआय दहशत पसरवते, लव्ह जिहादला समर्थन देते, धर्मांतर घडवून आणते. परदेशी निधी घेते. मदरसा चालवते, विविध पुस्तकांना समर्थन देते. त्यात इस्लामला न मानणारे काफिर असल्याचे सांगितले जात आहे", असे आरोपही त्यांनी केले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयHinduहिंदूadvocateवकिलIndiaभारत