शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

मणिपूर हिंसाचाराबात धक्कादायक माहिती समोर, NIAने केला मोठा गौप्यस्फोट  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 16:10 IST

Manipur violence: गेल्या चार महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाहीये. दरम्यान, या हिंसाचाराबाबत आता एनआयएच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गेल्या चार महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाहीये. दरम्यान, या हिंसाचाराबाबत आता एनआयएच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार भडकवण्यामागे म्यानमारमधील काही प्रतिबंधित दहशतवादी संघटनांचा हात असल्याचे एनआयएच्या तपासातून उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मणिपूरमध्ये सुरक्षा दलांवर आणि विरोधी जाती समुहांच्या सदस्यांवर हल्ला करण्यासाठी कार्यकर्त्यांचीही भरती करण्यात येत आहे. गेल्या चार महिन्यांपासून मणिपूरमध्ये गेल्या चार महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचाराच १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो घरे जाळली जात आहेत. हजारो लोक विस्थापित झाले आहेत. शेकडो लोक छावण्यांमध्ये जीव मुठीत धरून जगत आहेत. इंटरनेट सेवा बंद आहे. खूप प्रयत्नांनंतरही हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाही आहे. यादरम्यान NIAने मणिपूर हिंसाचाराबाबत अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत.

एनआयएच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार म्यानमार आणि बांगलादेशमधील उग्रवागी समुहांनी वेगवेगळ्या जातीसमुहांमध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी आणि भारत सरकारविरोधात युद्ध पुकारण्याच्या इराद्याने हिंसक घटनांमध्ये सहभागी होण्यासाठी भारतामध्ये उग्रवादी नेत्यांच्या वर्गासोबत एक कट रचला आहे. म्यानमार आणि बांगलादेशमधील उग्रवादी समूह कुठल्याही परिस्थितीत मणिपूरमध्ये शांतता नांदू देण्यास इच्छूक नाही आहेत. आता एनआयएने चुराचांदपूर येथून एका संशयिताला अटक केली आहे. तो परकीय भूमीवरून भारताविरोधात करण्यात येणाऱ्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता.

म्यानमारमधील दहशतवादी संघटना बेकायदेशीरपणे हत्यारे, दारुगोळा आणि स्फोटके गोळा करतात. मणिपूरमधून झालेली शस्त्रास्त्रांची लूट हा त्यातीलच एक भाग आहे. भारत आणि म्यानमारदरम्यान १६४३ किमी लांबीची सीमा  आहे. भारताच्या मिझोराम, मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांना मणिपूरची सीमा लागलेली आहे. त्यातील शेकडो किमी सीमा ही कुठल्याही कुंपणाविना मोकळी आहे. त्याशिवाय २०१८ मध्ये लागू करण्यात आलेल्या फ्री मुव्हमेंट रिजीममुळे म्यानमारमधील उग्रवाद्यांचा मार्ग सोपा केला आहे. या करारान्वये भारतातील चार राज्यांमध्ये राहणाऱ्या अनेक समुदायांचे लोक म्यानमारमध्ये १६ किमीपर्यंत आत जाऊ शकतात. त्यासाठी व्हिसा लागत नाही. याचाच उग्रवाद्यांकडून गैरफायदा घेतला जात आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा