शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

मणिपूर हिंसाचाराबात धक्कादायक माहिती समोर, NIAने केला मोठा गौप्यस्फोट  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 16:10 IST

Manipur violence: गेल्या चार महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाहीये. दरम्यान, या हिंसाचाराबाबत आता एनआयएच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गेल्या चार महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाहीये. दरम्यान, या हिंसाचाराबाबत आता एनआयएच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार भडकवण्यामागे म्यानमारमधील काही प्रतिबंधित दहशतवादी संघटनांचा हात असल्याचे एनआयएच्या तपासातून उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मणिपूरमध्ये सुरक्षा दलांवर आणि विरोधी जाती समुहांच्या सदस्यांवर हल्ला करण्यासाठी कार्यकर्त्यांचीही भरती करण्यात येत आहे. गेल्या चार महिन्यांपासून मणिपूरमध्ये गेल्या चार महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचाराच १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो घरे जाळली जात आहेत. हजारो लोक विस्थापित झाले आहेत. शेकडो लोक छावण्यांमध्ये जीव मुठीत धरून जगत आहेत. इंटरनेट सेवा बंद आहे. खूप प्रयत्नांनंतरही हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाही आहे. यादरम्यान NIAने मणिपूर हिंसाचाराबाबत अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत.

एनआयएच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार म्यानमार आणि बांगलादेशमधील उग्रवागी समुहांनी वेगवेगळ्या जातीसमुहांमध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी आणि भारत सरकारविरोधात युद्ध पुकारण्याच्या इराद्याने हिंसक घटनांमध्ये सहभागी होण्यासाठी भारतामध्ये उग्रवादी नेत्यांच्या वर्गासोबत एक कट रचला आहे. म्यानमार आणि बांगलादेशमधील उग्रवादी समूह कुठल्याही परिस्थितीत मणिपूरमध्ये शांतता नांदू देण्यास इच्छूक नाही आहेत. आता एनआयएने चुराचांदपूर येथून एका संशयिताला अटक केली आहे. तो परकीय भूमीवरून भारताविरोधात करण्यात येणाऱ्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता.

म्यानमारमधील दहशतवादी संघटना बेकायदेशीरपणे हत्यारे, दारुगोळा आणि स्फोटके गोळा करतात. मणिपूरमधून झालेली शस्त्रास्त्रांची लूट हा त्यातीलच एक भाग आहे. भारत आणि म्यानमारदरम्यान १६४३ किमी लांबीची सीमा  आहे. भारताच्या मिझोराम, मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांना मणिपूरची सीमा लागलेली आहे. त्यातील शेकडो किमी सीमा ही कुठल्याही कुंपणाविना मोकळी आहे. त्याशिवाय २०१८ मध्ये लागू करण्यात आलेल्या फ्री मुव्हमेंट रिजीममुळे म्यानमारमधील उग्रवाद्यांचा मार्ग सोपा केला आहे. या करारान्वये भारतातील चार राज्यांमध्ये राहणाऱ्या अनेक समुदायांचे लोक म्यानमारमध्ये १६ किमीपर्यंत आत जाऊ शकतात. त्यासाठी व्हिसा लागत नाही. याचाच उग्रवाद्यांकडून गैरफायदा घेतला जात आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा