शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

मणिपूर हिंसाचाराबात धक्कादायक माहिती समोर, NIAने केला मोठा गौप्यस्फोट  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 16:10 IST

Manipur violence: गेल्या चार महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाहीये. दरम्यान, या हिंसाचाराबाबत आता एनआयएच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गेल्या चार महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाहीये. दरम्यान, या हिंसाचाराबाबत आता एनआयएच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार भडकवण्यामागे म्यानमारमधील काही प्रतिबंधित दहशतवादी संघटनांचा हात असल्याचे एनआयएच्या तपासातून उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मणिपूरमध्ये सुरक्षा दलांवर आणि विरोधी जाती समुहांच्या सदस्यांवर हल्ला करण्यासाठी कार्यकर्त्यांचीही भरती करण्यात येत आहे. गेल्या चार महिन्यांपासून मणिपूरमध्ये गेल्या चार महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचाराच १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो घरे जाळली जात आहेत. हजारो लोक विस्थापित झाले आहेत. शेकडो लोक छावण्यांमध्ये जीव मुठीत धरून जगत आहेत. इंटरनेट सेवा बंद आहे. खूप प्रयत्नांनंतरही हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाही आहे. यादरम्यान NIAने मणिपूर हिंसाचाराबाबत अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत.

एनआयएच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार म्यानमार आणि बांगलादेशमधील उग्रवागी समुहांनी वेगवेगळ्या जातीसमुहांमध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी आणि भारत सरकारविरोधात युद्ध पुकारण्याच्या इराद्याने हिंसक घटनांमध्ये सहभागी होण्यासाठी भारतामध्ये उग्रवादी नेत्यांच्या वर्गासोबत एक कट रचला आहे. म्यानमार आणि बांगलादेशमधील उग्रवादी समूह कुठल्याही परिस्थितीत मणिपूरमध्ये शांतता नांदू देण्यास इच्छूक नाही आहेत. आता एनआयएने चुराचांदपूर येथून एका संशयिताला अटक केली आहे. तो परकीय भूमीवरून भारताविरोधात करण्यात येणाऱ्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता.

म्यानमारमधील दहशतवादी संघटना बेकायदेशीरपणे हत्यारे, दारुगोळा आणि स्फोटके गोळा करतात. मणिपूरमधून झालेली शस्त्रास्त्रांची लूट हा त्यातीलच एक भाग आहे. भारत आणि म्यानमारदरम्यान १६४३ किमी लांबीची सीमा  आहे. भारताच्या मिझोराम, मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांना मणिपूरची सीमा लागलेली आहे. त्यातील शेकडो किमी सीमा ही कुठल्याही कुंपणाविना मोकळी आहे. त्याशिवाय २०१८ मध्ये लागू करण्यात आलेल्या फ्री मुव्हमेंट रिजीममुळे म्यानमारमधील उग्रवाद्यांचा मार्ग सोपा केला आहे. या करारान्वये भारतातील चार राज्यांमध्ये राहणाऱ्या अनेक समुदायांचे लोक म्यानमारमध्ये १६ किमीपर्यंत आत जाऊ शकतात. त्यासाठी व्हिसा लागत नाही. याचाच उग्रवाद्यांकडून गैरफायदा घेतला जात आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा