शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

बिहारमधील नवादा येथे गावगुंडांचा धुमाकूळ, गोळीबारानंतर दलितांची ८० घरं जाळली, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 09:09 IST

Bihar News: बिहारमधील नवादा जिल्ह्यात जमिनीच्या वादामधून गावगुंडांनी दलितांच्या वस्तीमध्ये जाळपोळ केल्याची घटना घडली आहे. ग्रामस्थांनी केलेल्या दाव्यानुसार या जाळपोळीत सुमारे ८० घरं जळाली आहेत. मात्र पोलिसांनी २० घरं या आगीत जळाल्याची आणि कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती दिली आहे.

बिहारमधील नवादा जिल्ह्यात जमिनीच्या वादामधून गावगुंडांनी दलितांच्या वस्तीमध्ये जाळपोळ केल्याची घटना घडली आहे. ग्रामस्थांनी केलेल्या दाव्यानुसार या जाळपोळीत सुमारे ८० घरं जळाली आहेत. मात्र पोलिसांनी २० घरं या आगीत जळाल्याची आणि कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती दिली आहे. या प्रकरणी आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे. तर या घटनेवरून आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

जाळपोळीची ही घटना नवादा येथील मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ननौरा जवळील कृष्णानगर दलित वस्तीमध्ये घडली आहे. येथे दोन पक्षांमध्ये वाद सुरू होता. त्यावरून बुधवारी संध्याकाळी काही गावगुंडांनी दलित कुटुंबांना मारहाण केली. त्यानंतर गोळीबार करून घरांना आग लावण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार गावातील जमिनीच्या काही भागावर सध्या दलित कुटुंबीयांचा कब्जा आहे. या जमिनीवरील कब्जावरून दुसऱ्या पक्षासोबत वाद सुरू आहे. या प्रकरणाची सुनावणी वरिष्ठ अधिकाऱ्यांजवळ सुरू आहे. गावातील काही गावगुंडांनी बुधवारी संध्याकाळी अचानक हल्ला केला. त्यानंतर मारहाणीसह त्यांच्या घरांना आग लावली, असा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. आग लावल्याची माहिती मिळाल्यानंतर तिथे फायर ब्रिगेडला तातडीने रवाना करण्यात आले.

दरम्यान, एसपी अभिनव धीमान यांनी सांगितले की, काही व्यक्तींकडून घरांना आग लावण्यात आल्याची माहिती आम्हाला संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मिळाली. सुरुवातीला ४० ते ५० घरांची जाळपोळ झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आम्ही रात्री केलेल्या पाहणीमध्ये सुमारे २१ घरांची जाळपोळ झाल्याचं समोर आलं आहे. पुढे सविस्तर सर्व्हे केला जाईल. तसेच या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. त्याबरोबरच इथे गोळीबारासारखाही कुठला प्रकार घडलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी