शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 17:55 IST

आमच्या सर्व मतदारांना गुन्हेगार ठरवणं आणि निवडणूक आयोग गप्प बसेल हे शक्य नाही. प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल किंवा देशाची माफी मागावी लागेल, इतर तिसरा पर्याय नाही असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं.

नवी दिल्ली - निवडणूक आयोग आणि मतदार यादीवरून जे आरोप लावण्यात आलेत, ते निराधार आणि खोटे आहेत. जर त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ७ दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करावे अन्यथा संपूर्ण देशाची माफी मागावी असं आव्हान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधी यांचं नाव न घेता केले आहे. गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत आरोपांचे खंडन केले. 

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, मतदार याद्यांमधील सुधारणा ही एक सामूहिक जबाबदारी आहे. बिहारमध्ये आमच्या बूथ लेवल अधिकाऱ्यांनी बूथ लेवल एजेंट आणि राजकीय पक्षांसोबत मिळून काम केले आहे. एक पीपीटी दाखवून ज्यात निवडणूक आयोगाचे आकडे नाहीत. चुकीच्या पद्धतीने विश्लेषण करणे आणि त्यात एखाद्या महिलेने २ वेळा मतदान केल्याचे सांगणे हे खूप गंभीर आरोप आहेत. विना प्रतिज्ञापत्र अशा गंभीर आरोपांवर निवडणूक आयोग कारवाई करू शकत नाही, कारण ते संविधान आणि निवडणूक आयोग दोघांच्याही विरोधात होईल असं त्यांनी सांगितले. 

तसेच आमच्या सर्व मतदारांना गुन्हेगार ठरवणं आणि निवडणूक आयोग गप्प बसेल हे शक्य नाही. प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल किंवा देशाची माफी मागावी लागेल, इतर तिसरा पर्याय नाही. जर ७ दिवसांत प्रतिज्ञापत्र दिले नाही तर त्याचा अर्थ हे सर्व आरोप निराधार होते. जे मतदारांना बोगस म्हणत आहेत, त्यांनी माफी मागायला हवी असंही मुख्य निवडणूक आयुक्तांनी राहुल गांधी यांचं नाव न घेता म्हटलं. 

दरम्यान, भारतात ६० टक्क्यांहून अधिक मतदान होते, ज्याचा जगातील मोठमोठे लोकशाही देश विचारही करू शकत नाही. जगातील सर्वात मोठी मतदार यादी आपल्याकडे आहे. जवळपास ९० ते १०० कोटी मतदार आहेत. सर्वात मोठी मतदार यादी, सर्वात मोठी निवडणूक कर्मचाऱ्यांची फौज, सर्वात जास्त मतदान करणाऱ्या लोकांची संख्या आणि या सर्वांच्या समक्ष सर्व मीडियासमोर हे सांगणे, मतदार यादीत आणखी एकदा तुमचं नाव आहे त्यामुळे तुम्ही दोनदा मतदान केले आणि गुन्हा केला आहे, मतदारांना गुन्हेगार ठरवणे आणि निवडणूक आयोगाने शांत राहणे हे शक्य नाही असंही ज्ञानेश कुमार यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसElectionनिवडणूक 2024Votingमतदान