शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 17:55 IST

आमच्या सर्व मतदारांना गुन्हेगार ठरवणं आणि निवडणूक आयोग गप्प बसेल हे शक्य नाही. प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल किंवा देशाची माफी मागावी लागेल, इतर तिसरा पर्याय नाही असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं.

नवी दिल्ली - निवडणूक आयोग आणि मतदार यादीवरून जे आरोप लावण्यात आलेत, ते निराधार आणि खोटे आहेत. जर त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ७ दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करावे अन्यथा संपूर्ण देशाची माफी मागावी असं आव्हान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधी यांचं नाव न घेता केले आहे. गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत आरोपांचे खंडन केले. 

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, मतदार याद्यांमधील सुधारणा ही एक सामूहिक जबाबदारी आहे. बिहारमध्ये आमच्या बूथ लेवल अधिकाऱ्यांनी बूथ लेवल एजेंट आणि राजकीय पक्षांसोबत मिळून काम केले आहे. एक पीपीटी दाखवून ज्यात निवडणूक आयोगाचे आकडे नाहीत. चुकीच्या पद्धतीने विश्लेषण करणे आणि त्यात एखाद्या महिलेने २ वेळा मतदान केल्याचे सांगणे हे खूप गंभीर आरोप आहेत. विना प्रतिज्ञापत्र अशा गंभीर आरोपांवर निवडणूक आयोग कारवाई करू शकत नाही, कारण ते संविधान आणि निवडणूक आयोग दोघांच्याही विरोधात होईल असं त्यांनी सांगितले. 

तसेच आमच्या सर्व मतदारांना गुन्हेगार ठरवणं आणि निवडणूक आयोग गप्प बसेल हे शक्य नाही. प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल किंवा देशाची माफी मागावी लागेल, इतर तिसरा पर्याय नाही. जर ७ दिवसांत प्रतिज्ञापत्र दिले नाही तर त्याचा अर्थ हे सर्व आरोप निराधार होते. जे मतदारांना बोगस म्हणत आहेत, त्यांनी माफी मागायला हवी असंही मुख्य निवडणूक आयुक्तांनी राहुल गांधी यांचं नाव न घेता म्हटलं. 

दरम्यान, भारतात ६० टक्क्यांहून अधिक मतदान होते, ज्याचा जगातील मोठमोठे लोकशाही देश विचारही करू शकत नाही. जगातील सर्वात मोठी मतदार यादी आपल्याकडे आहे. जवळपास ९० ते १०० कोटी मतदार आहेत. सर्वात मोठी मतदार यादी, सर्वात मोठी निवडणूक कर्मचाऱ्यांची फौज, सर्वात जास्त मतदान करणाऱ्या लोकांची संख्या आणि या सर्वांच्या समक्ष सर्व मीडियासमोर हे सांगणे, मतदार यादीत आणखी एकदा तुमचं नाव आहे त्यामुळे तुम्ही दोनदा मतदान केले आणि गुन्हा केला आहे, मतदारांना गुन्हेगार ठरवणे आणि निवडणूक आयोगाने शांत राहणे हे शक्य नाही असंही ज्ञानेश कुमार यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसElectionनिवडणूक 2024Votingमतदान