शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी करण्यात येत आहेत सुधारणा; पीयूष गोयल यांचे लोकसभेत प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 04:12 IST

पीयूष गोयल यांनी प्रश्नोत्तरांच्या तासात विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना ही माहिती दिली.

नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकारकडून विविध क्षेत्रांत सातत्याने आर्थिक सुधारणा करण्यात येत आहेत, असे प्रतिपादन वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी बुधवारी लोकसभेत केले. अर्थव्यवस्थेत सुधारणा ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याचेही गोयल यांनी सभागृहात सांगितले.

पीयूष गोयल यांनी प्रश्नोत्तरांच्या तासात विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, काही सुधारणा विविध कायद्यांत बदल करून करण्यात येत आहेत. वित्त (सुधारणा) विधेयक, विशेष आर्थिक क्षेत्रे (सुधारणा) विधेयक, वस्तू व सेवाकर कायद्यातील सुधारणा आणि नादारी व दिवाळखोरी संहिता या कायद्यांचा त्यात समावेश करण्यात आला आहे.

पीयूष गोयल यांनी म्हणाले की, केंद्र सरकारने अनेक क्षेत्रांत विविध प्रकारच्या सुधारणा यापूर्वीच यशस्वीरीत्या घडवून आणल्या आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल घडविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सुधारणा ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. अलीकडेकेंद्र सरकारने कॉर्पोरेट करात केलेली कपात ही महत्त्वाची सुधारणा आहे.

कर कायदा (सुधारणा) अध्यादेशाद्वारे केंद्र सरकारने कॉर्पोरेट कर कमी करून २२ टक्क्यांवर आणला. इतर कर सवलती न घेणाºया उद्योगांसाठी तो लागू करण्यात आळा आहे. याशिवाय १ आॅक्टोबर २0१९ नंतर स्थापन झालेल्या देशांतर्गत वस्तू उत्पादक कंपन्यांना सरकारने १५ टक्के कॉर्पोरेट कर लावण्याचा पर्याय दिला आहे. यावर अधिभार व उपकर लागू असेल, अशीही माहिती गोयल यांनी यावेळी दिली.

मार्चपूर्वी उत्पादन आवश्यक

या कायद्यातील कलम ११५ बीएबीचे उपकलम (२) नुसार देण्यात येणारी वजावट व प्रोत्साहन सवलतीवर दावा करणाºया नव्या कंपन्यांनाच सवलतीतील १५ टक्के कॉर्पोरेट कर लागू होणार आहे. या कंपन्यांनी ३१ मार्च, २0२३ पूर्वी आपले उत्पादन सुरू करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाpiyush goyalपीयुष गोयलIndiaभारतNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन