शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी करण्यात येत आहेत सुधारणा; पीयूष गोयल यांचे लोकसभेत प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 04:12 IST

पीयूष गोयल यांनी प्रश्नोत्तरांच्या तासात विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना ही माहिती दिली.

नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकारकडून विविध क्षेत्रांत सातत्याने आर्थिक सुधारणा करण्यात येत आहेत, असे प्रतिपादन वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी बुधवारी लोकसभेत केले. अर्थव्यवस्थेत सुधारणा ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याचेही गोयल यांनी सभागृहात सांगितले.

पीयूष गोयल यांनी प्रश्नोत्तरांच्या तासात विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, काही सुधारणा विविध कायद्यांत बदल करून करण्यात येत आहेत. वित्त (सुधारणा) विधेयक, विशेष आर्थिक क्षेत्रे (सुधारणा) विधेयक, वस्तू व सेवाकर कायद्यातील सुधारणा आणि नादारी व दिवाळखोरी संहिता या कायद्यांचा त्यात समावेश करण्यात आला आहे.

पीयूष गोयल यांनी म्हणाले की, केंद्र सरकारने अनेक क्षेत्रांत विविध प्रकारच्या सुधारणा यापूर्वीच यशस्वीरीत्या घडवून आणल्या आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल घडविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सुधारणा ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. अलीकडेकेंद्र सरकारने कॉर्पोरेट करात केलेली कपात ही महत्त्वाची सुधारणा आहे.

कर कायदा (सुधारणा) अध्यादेशाद्वारे केंद्र सरकारने कॉर्पोरेट कर कमी करून २२ टक्क्यांवर आणला. इतर कर सवलती न घेणाºया उद्योगांसाठी तो लागू करण्यात आळा आहे. याशिवाय १ आॅक्टोबर २0१९ नंतर स्थापन झालेल्या देशांतर्गत वस्तू उत्पादक कंपन्यांना सरकारने १५ टक्के कॉर्पोरेट कर लावण्याचा पर्याय दिला आहे. यावर अधिभार व उपकर लागू असेल, अशीही माहिती गोयल यांनी यावेळी दिली.

मार्चपूर्वी उत्पादन आवश्यक

या कायद्यातील कलम ११५ बीएबीचे उपकलम (२) नुसार देण्यात येणारी वजावट व प्रोत्साहन सवलतीवर दावा करणाºया नव्या कंपन्यांनाच सवलतीतील १५ टक्के कॉर्पोरेट कर लागू होणार आहे. या कंपन्यांनी ३१ मार्च, २0२३ पूर्वी आपले उत्पादन सुरू करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाpiyush goyalपीयुष गोयलIndiaभारतNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन