सुधारित एनआयएकडून आसाम हिंसाचाराची चौकशी राजनाथसिंग यांची घोषणा: बळीसंख्या ७८
By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:09+5:302014-12-25T22:41:09+5:30
गुवाहाटी/सोनितपूर :आसामच्या कोकराझार, सोनितपूर आणि चिरांग जिल्ांत नॅशनल डेमॉक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलॅण्ड (एनडीएफबी-एस) बंडखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची ग्वाही केंद्र सरकारने दिली असून राष्ट्रीय तपास संस्था(एनआयए) या बंडखोरांनी घडवून आणलेल्या निघृर्ण हत्याकांड व हिंसाचाराची चौकशी करणार आहे़ उल्फाविरुद्धच्या मोहिमेच्या धर्तीवर एनडीएफबी-एसविरुद्ध मोहीम छेडण्यासाठी भूतान सरकारशी संपर्क करण्याचा विचारही सरकारने चालवला आहे़

सुधारित एनआयएकडून आसाम हिंसाचाराची चौकशी राजनाथसिंग यांची घोषणा: बळीसंख्या ७८
ग वाहाटी/सोनितपूर :आसामच्या कोकराझार, सोनितपूर आणि चिरांग जिल्ह्यांत नॅशनल डेमॉक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलॅण्ड (एनडीएफबी-एस) बंडखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची ग्वाही केंद्र सरकारने दिली असून राष्ट्रीय तपास संस्था(एनआयए) या बंडखोरांनी घडवून आणलेल्या निघृर्ण हत्याकांड व हिंसाचाराची चौकशी करणार आहे़ उल्फाविरुद्धच्या मोहिमेच्या धर्तीवर एनडीएफबी-एसविरुद्ध मोहीम छेडण्यासाठी भूतान सरकारशी संपर्क करण्याचा विचारही सरकारने चालवला आहे़एनडीएफबी-एस बंडखोरांनी आसामच्या दुर्गम भागातील तीन जिल्ह्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सोनितपूर जिल्ह्यातील ३७, कोकराझर येथील २५ आणि चिरांग जिल्ह्यात तीन जण ठार झाले होते. या हत्याकांडाविरुद्ध आदिवासींनी सुरूकेलेले आंदोलन सोनितपूर जिल्ह्याच्या धेकियाजुलीमध्ये हिंसाचारझाल्यानंतर पोलिसांना काल बुधवारी गोळीबार करावा लागला होता़ त्यात तिघे ठार झाले होते़ आज गुरुवारी कोकराझारच्या गोसाईगावा येथे आदिवासींनी बोडो सुमदायाच्या घरांना आगी लावल्या़ आणखी सहा मृतदेह सापडल्यानंतर या हिंसाचारातील बळींची संख्या आता ७८ वर पोहोचली आहे़ केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी गुरुवारी हिंसाचारप्रभावित सोनितपूरचा दौरा केल़ा़ या दौऱ्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत, या हिंसाचाराची चौकशी एनआयएकडे सोपविण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली़ मी याबाबत आसामच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली़ या संपूर्ण हिंसाचाराची एनआयएकडून चौकशी केली जाईल़ बोडो बंडखोरांना शह देणाऱ्यांबाबत कळायला हवे़ हा केवळ हिंसाचार नाही तर अतिरेकी कृत्य आहे़ हा दहशतवाद सरकार कदापि सहन करणार नाही़ एनडीएफबी(एस)विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले़ एनडीएफबी(एस) निश्चितपणे मोहीम छेडली जाईल़ मात्र कधी हे तूर्तास सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले़ कोटआसामातील हिंसाचार सरकारने अत्यंत गंभीरपणे घेतला आहे़ त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल़- राजनाथसिंग, केंद्रीय गृहमंत्रीबॉक्सहवी भूतानची मदत!गुवाहाटी: डेमॉक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलॅण्ड(एनडीएफबी-एस) बंडखोरांवर अंकुश आणण्यासाठी भूतानची मदत घेण्याचा विचार सरकारने चालवला आहे़ याप्रकरणी तात्काळ भूतानच्या अधिकाऱ्यांची मदत घ्यावी, असे विनंतीवजा आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना केल्याचे कळते़गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, काल बुधवारी रात्री राजनाथसिंग यांनी स्वराज यांच्याशी या मुद्यावर चर्चा केली व तात्काळ भूतानची मदत घेण्याचे आवाहन केले़ एनडीएफबीने भारत-भूतान सीमेवरील घनदाट जंगलात आपली काही ठिकाणे तयार केल्याचे मानले जाते़ भारतीय सुरक्षा दलांनी मोहीम उघडताच, एनडीएफबी बंडखोर पळून भूतान भागात दडून बसतात़ यामुळे त्यांच्यासोबत लढा देणे कठीण होते़ सन २००३-०४ मध्ये भूतानने उल्फाविरुद्ध मोहीम चालवून त्यांना आपल्या देशातून हाकलले होते व त्यांची सारी ठिकाणे नष्ट केली होती़