शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

आयात होणाऱ्या डाळी विषारी; अन्नसुरक्षा प्राधिकरणाचे तपासणीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 06:28 IST

कमी पावसामुळे यंदा पाऊस देशातील डाळींचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून डाळींची आयात वाढण्याची शक्यता आहे, पण या आयातीत डाळी विषारी असल्याचे समोर आले.

- चिन्मय काळेमुंबई : कमी पावसामुळे यंदा पाऊस देशातील डाळींचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून डाळींची आयात वाढण्याची शक्यता आहे, पण या आयातीत डाळी विषारी असल्याचे समोर आले. केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणानेच (एफएसएसएआय) यासंबंधी सखोल तपासणीचे आदेश दिले आहेत.देशी डाळींचे पीक कमी असले की, केंद्र सरकार म्यानमार, कॅनडा व आॅस्ट्रेलिया येथून डाळ आयात करते. एफएसएसएआयनुसार, प्रामुख्याने कॅनडा व आॅस्ट्रेलिया येथून आयात होणाºया डाळींत ‘ग्लायफोसेट’ हे विषारी रसायन असण्याची भीती आहे. त्यामुळे जिथे-जिथे या डाळींची आयात होते, तेथील अन्न व औषधे प्रशासनाने या डाळींची तपासणी करावी. सर्व प्रादेशिक प्रयोगशाळांनी नमुन्यांची तपासणीचा अहवाल दर १५ दिवसांनी दिल्ली मुख्यालयाला पाठवावा, असे निर्देश प्राधिकरणाने दिले आहेत.केंद्र सरकारने डाळींची आयात ३ लाख टन इतकी निश्चित केली आहे, पण विदेशी डाळी मोठ्या प्रमाणात बाजारात आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारने डाळींच्या आयातीवर पूर्णपणे बंदी आणावी, अशी मागणी ग्रेन मर्चंट्स असोसिएशनचे प्रताप मोटवानी यांनी केली आहे.लठ्ठपणाला कारणीभूत ‘ग्लायफोसेट’‘ग्लायफोसेट’ या विषारी द्रव्यामुळे लठ्ठपणा, अल्झायमर, भ्रमिष्टपणा, लकवा यासारख्या आजारांची भीतीही असते. आजकाल लठ्ठपणाच्या तक्रारी वाढल्या आहेत.लठ्ठपणा वाढला की, विदेशी औषधांचा वापर वाढतो. त्यासाठीच ‘ग्लायफोसेट’युक्त डाळी भारतात पाठविल्या जात आहेत, असा आरोप आयातदारांनी केला आहे.मात्रा निश्चितच नाही ‘ग्लायफोसेट’ची मात्रा किती असावी, हे अन्न सुरक्षा व मानके कायद्यात आजवर निश्चितच नसल्याचे वास्तव समोर आले आहे. आता घातक रसायन आढळल्यामुळे प्राधिकरणाला जाग आली आहे. त्यामुळे तूर्तास अमेरिकन ‘कोडेक्स’नुसार मात्रा ग्राह्य धरण्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. यामुळे आजवर असे लाखो लीटर घातक रसायन भारतीयांच्या पोटात गेले असण्याची भीती आहे. 

टॅग्स :Healthआरोग्य