शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 15:02 IST

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत आतापर्यंत १९.१७ कोटी रेशनकार्ड जारी करण्यात आले आहेत. देशभरात या योजनेअंतर्गत एकूण ७६.१० कोटी लाभार्थी येतात.

रेशनकार्ड धारकांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. केंद्र सरकारने कार्ड धारकांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपासून पात्र नसलेल्या लाभार्थ्यांविरोधात कारवाई सुरू आहे.  या लाभार्थ्यांमध्ये आयकरदाते, चारचाकी वाहनांचे मालक आणि कंपन्यांचे संचालक यांचा समावेश आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने रेशनकार्डधारकांच्या तपशीलांची आयकर विभाग, रस्ते वाहतूक मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यासारख्या सरकारी संस्थांच्या डेटाबेसशी जुळवून ही यादी तयार केली. यामुळे आता याचा अनेकांना फटका बसणार आहे. 

अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार

९४.७१ लाख रेशनकार्डधारक करदाते आहेत, १७.५१ लाख चारचाकी वाहनांचे मालक आहेत आणि ५.३१ लाख कंपनी संचालक आहेत. एकूण १.१७ कोटी कार्डधारक अपात्र श्रेणीत येतात. आता केंद्राने राज्यांना पडताळणी करून ३० सप्टेंबरपर्यंत या अपात्र कार्डधारकांना यादीतून काढून टाकण्यास सांगितले आहे.

केंद्र सरकारने राज्य सरकारला यादी पाठवली

स्थानिक पातळीवर ब्लॉक मुख्यालयांना यादी देण्यात आली आहे. पीडीएसचा लाभ घेणारे लोक तिथून यादी घेऊन त्यांची माहिती तपासू शकतात.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "केंद्राने राज्यांना मदत करण्यासाठी हा डेटा शेअर केला आहे. यावरुन अपात्र लाभार्थींना काढून वेटींग यादीमध्ये समावेश असलेल्या खऱ्या गरजू लोकांना लाभ मिळेल. रेशन कार्डांची पुनरावलोकन करणे आणि अपात्र/डुप्लिकेट कार्ड काढून पात्र लाभार्थींचा समावेश करणे ही राज्यांची जबाबदारी आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत आतापर्यंत १९.१७ कोटी रेशनकार्ड जारी करण्यात आले आहेत. देशभरात या योजनेअंतर्गत एकूण ७६.१० कोटी लाभार्थी येतात. नियमांनुसार, सरकारी कर्मचारी, १ लाख रुपये किंवा त्याहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेले कुटुंबे, चारचाकी वाहन मालक आणि करदाते मोफत रेशनसाठी पात्र नाहीत.

लाभार्थ्यांची अशी माहिती मिळवली

८ जुलै २०२५ रोजी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवलेल्या पत्रात अन्न सचिव संजीव चोप्रा म्हणाले की, योग्य लोकांपर्यंत रेशन पोहोचवण्यासाठी ही प्रक्रिया केली जात आहे. मंत्रालयाने CBDT, CBIC, MCA, MoRTH आणि PM-Kisan सारख्या अनेक एजन्सींच्या डेटाबेसमधून माहिती एकत्रित करून अपात्र लाभार्थींची माहिती मिळवली आहे.

चोप्रा म्हणाले, "डेटाबेसच्या अचूकतेमुळे खऱ्या वंचित कुटुंबांना फायदा होईल आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेची पारदर्शकता सुनिश्चित होईल. हे काम ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करावे लागणार आहे.