शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

संसदेत कायदा करुन गाईला राष्ट्रीय पशू घोषित करावं, हायकोर्टाची महत्त्वपूर्ण सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 12:39 IST

केंद्र सरकारने गायींना मौलिक अधिकार देण्यासंदर्भात विधेयक पारित करावं. संसदेत विधेयक पास करुन गायींना राष्ट्रीय पशू घोषित करावं, असे न्यायालयाने म्हटले आहे.

ठळक मुद्देगाय ही भारतीय संस्कृतीचा महत्त्वाच भाग आहे. संसदेनं कायदा बनविल्यास सरकारने त्याची कडक अंमलबजावणी करावी, असेही न्यायालयाने सूचवले आहे. 

लखनौ - उत्तर प्रदेशच्या इलाहाबाद उच्च न्यायालयानेगायींबाबत महत्त्वपूर्ण टिपण्णी केली आहे. गोरक्षाला (गायींची रक्षा) कुठल्याही धर्मासोबत जोडता कामा नये. गाईला आता राष्ट्रीय पशू घोषित करायला पाहिजे, केंद्र सरकारने यावर विचार करायला हवा, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला काही सूचना केल्या आहेत. त्यामध्ये, गायींना मौलिक अधिकार देण्याचंही त्यांनी सूचवलं आहे. 

केंद्र सरकारने गायींना मौलिक अधिकार देण्यासंदर्भात विधेयक पारित करावं. संसदेत विधेयक पास करुन गायींना राष्ट्रीय पशू घोषित करावं, असे न्यायालयाने म्हटले आहे. जेव्हा गायींचं कल्याण होईल, तेव्हाच देशाचं कल्याण होईल. गाय ही भारतीय संस्कृतीचा महत्त्वाच भाग आहे. संसदेनं कायदा बनविल्यास सरकारने त्याची कडक अंमलबजावणी करावी, असेही न्यायालयाने सूचवले आहे.

गोरक्षण ही केवळ एका धर्माची जबाबदारी नाही

जावेद नावाच्या व्यक्तीची याचिका फेटाळत उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिपण्णी केली. जावेदवर गोहत्या बंदी कायद्यानुसार कलम 3,5, आणि 8 सह गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोर्टाने याचिकाकर्त्याची याचिका फेटाळत गाईंचे रक्षण केवळ एका धर्माची जबाबदारी नाही. गाय ही या देशाची संस्कृती असून गायींची सुरक्षा ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. मग, तुम्ही कुठल्याही धर्माचे व्यक्ती असाल, असे न्यायालयाने स्पष्टच सांगितलं. 

न्यायालयाची महत्वपूर्ण टिपण्णी

गोमांस खाणाऱ्यांनाच केवळ मौलिक अधिकार नाही. तर, गायींची पूजा करणाऱ्यांना आणि त्यांच्यावर आर्थिकदृष्ट्या निर्भर असलेल्यांनाही मौलिक अधिकार आहेत. 

जगण्याचा अधिकार हा मारण्याच्या अधिकारापेक्षा श्रेष्ठ आहे. त्यामुळे, गोमांस खाण्याच्या अधिकारास कधीही मौलिक अधिकार मानता येणार नाही. 

गाय म्हातारी आणि आजारी झाल्यानंतरही उपयोगी पशू आहे. गाईचे शेण, मुत्र हे शेती आणि औषधे बनविण्यासाठी उपयोगी पडते. 

केवळ हिंदूच गायींचे महत्त्व समजतात असे नाही. मुस्लीम नागरिकही गायींना भारतीय संस्कृतीचा महत्वपूर्ण हिस्सा मानतात. 

पाच मुस्लीम शासकांनी गायींची हत्या करण्यावर बंधनं आणली होती. बाबर, हुमायू आणि अकबर यांनीही आपल्या धार्मिक उत्सवात गायींचा बळी देण्याची प्रथा बंद केली होती. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcowगायParliamentसंसदIndiaभारतHinduहिंदूMuslimमुस्लीम