शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

संसदेत कायदा करुन गाईला राष्ट्रीय पशू घोषित करावं, हायकोर्टाची महत्त्वपूर्ण सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 12:39 IST

केंद्र सरकारने गायींना मौलिक अधिकार देण्यासंदर्भात विधेयक पारित करावं. संसदेत विधेयक पास करुन गायींना राष्ट्रीय पशू घोषित करावं, असे न्यायालयाने म्हटले आहे.

ठळक मुद्देगाय ही भारतीय संस्कृतीचा महत्त्वाच भाग आहे. संसदेनं कायदा बनविल्यास सरकारने त्याची कडक अंमलबजावणी करावी, असेही न्यायालयाने सूचवले आहे. 

लखनौ - उत्तर प्रदेशच्या इलाहाबाद उच्च न्यायालयानेगायींबाबत महत्त्वपूर्ण टिपण्णी केली आहे. गोरक्षाला (गायींची रक्षा) कुठल्याही धर्मासोबत जोडता कामा नये. गाईला आता राष्ट्रीय पशू घोषित करायला पाहिजे, केंद्र सरकारने यावर विचार करायला हवा, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला काही सूचना केल्या आहेत. त्यामध्ये, गायींना मौलिक अधिकार देण्याचंही त्यांनी सूचवलं आहे. 

केंद्र सरकारने गायींना मौलिक अधिकार देण्यासंदर्भात विधेयक पारित करावं. संसदेत विधेयक पास करुन गायींना राष्ट्रीय पशू घोषित करावं, असे न्यायालयाने म्हटले आहे. जेव्हा गायींचं कल्याण होईल, तेव्हाच देशाचं कल्याण होईल. गाय ही भारतीय संस्कृतीचा महत्त्वाच भाग आहे. संसदेनं कायदा बनविल्यास सरकारने त्याची कडक अंमलबजावणी करावी, असेही न्यायालयाने सूचवले आहे.

गोरक्षण ही केवळ एका धर्माची जबाबदारी नाही

जावेद नावाच्या व्यक्तीची याचिका फेटाळत उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिपण्णी केली. जावेदवर गोहत्या बंदी कायद्यानुसार कलम 3,5, आणि 8 सह गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोर्टाने याचिकाकर्त्याची याचिका फेटाळत गाईंचे रक्षण केवळ एका धर्माची जबाबदारी नाही. गाय ही या देशाची संस्कृती असून गायींची सुरक्षा ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. मग, तुम्ही कुठल्याही धर्माचे व्यक्ती असाल, असे न्यायालयाने स्पष्टच सांगितलं. 

न्यायालयाची महत्वपूर्ण टिपण्णी

गोमांस खाणाऱ्यांनाच केवळ मौलिक अधिकार नाही. तर, गायींची पूजा करणाऱ्यांना आणि त्यांच्यावर आर्थिकदृष्ट्या निर्भर असलेल्यांनाही मौलिक अधिकार आहेत. 

जगण्याचा अधिकार हा मारण्याच्या अधिकारापेक्षा श्रेष्ठ आहे. त्यामुळे, गोमांस खाण्याच्या अधिकारास कधीही मौलिक अधिकार मानता येणार नाही. 

गाय म्हातारी आणि आजारी झाल्यानंतरही उपयोगी पशू आहे. गाईचे शेण, मुत्र हे शेती आणि औषधे बनविण्यासाठी उपयोगी पडते. 

केवळ हिंदूच गायींचे महत्त्व समजतात असे नाही. मुस्लीम नागरिकही गायींना भारतीय संस्कृतीचा महत्वपूर्ण हिस्सा मानतात. 

पाच मुस्लीम शासकांनी गायींची हत्या करण्यावर बंधनं आणली होती. बाबर, हुमायू आणि अकबर यांनीही आपल्या धार्मिक उत्सवात गायींचा बळी देण्याची प्रथा बंद केली होती. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcowगायParliamentसंसदIndiaभारतHinduहिंदूMuslimमुस्लीम