महत्वाचे जोड....
By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:01+5:302014-12-25T22:41:01+5:30
अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण वाढले

महत्वाचे जोड....
अ ्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण वाढलेनांद : स्थानिक गावात सतत होणाऱ्या अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी रुग्णालयात हिवताप, मलेरिया व किटाणूजन्य आजारांच्या रुग्णाचे प्रमाण वाढले आहे. गावात स्वच्छता अभियान राबविल्यानंतरही स्वच्छतेकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गावात अस्वच्छता पसरत असून आरोग्यास धोका निर्माण होत आहे. ........वणी फाट्यावर हॅण्डपंपाची मागणीनांद : नजीकच्या वणी फाट्यावर प्रवासी निवारा आहे. या ठिकाणी लोणारा, वणी, आलेसूर आदी गावातील प्रवासी एसटीच्या प्रतीक्षेत थांबतात. प्रवाशांना परिसरात कुठेच पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे येथील प्रवासी निवाऱ्यालगत हॅण्डपंप लावण्यात यावा, अशी असंख्य प्रवाशांची मागणी आहे. .....ताडोबा बसफेरी सुरू करानांद : परिसरातील ग्रामस्थांच्या सेवेसाठी उमरेड आगाराने नांद ते ताडोबा बसफेरी सुरू केली होती. ही बससेवा बंद अवस्थेत आहे. ताडोबाकडे जाणाऱ्या प्रवाशांना या मार्गाने अतिशय सोईचे होत होते. त्यामुळे सदर बसफेरी पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. ....तारसा येथे स्वच्छता अभियानतारसा : स्थानिक ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी साफसफाई केली. यावेळी सरपंच चंद्रकला येळणे, उपसरपंच शेषराव देशमुख, सदस्य लता गिरडकर, ग्रामविकास अधिकारी शिवाजी नागरगोले आदी उपस्थित होते.