शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

शंभर वर्षानंतरही रणगाड्यांचे युद्धभूमीत महत्व कायम : मेजर जनरल एस. झा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 17:24 IST

पाकिस्तानपेक्षा भारतीय सैन्यदले सक्षम

ठळक मुद्देअहमदनगर येथील के के रेंज याठिकाणी सोमवारी रणगाड्यांच्या युद्धसरावचे आयोजन मोहीम यशस्वी करण्यासाठी सैनिकांचे मनोधैर्य आणि कौशल्य सर्वोच्च दर्जाचे असणे महत्वाचे तोफांचा मारा, संरक्षण आणि गतिशीलता या तीन बाबतीत रणगाड्यांची महत्वाची भूमिका

निनाद देशमुख- अहमदनगर : पहिल्या महायुद्धापासूनयुद्धभूमीवर रणगाड्यांचा वापर होतो, आज शंभर वर्षांनंतर ही त्यांचे महत्व कमी झालेले नाही. दहशतवादी कारवायांचा बिमोड करताना, तसेच शत्रुराष्ट्रांच्या सीमारेषेवर रणगाड्यांचा चांगल्या प्रकारे वापर होऊ शकतो, त्याद्वारे सैन्याला अधिक सुरक्षा मिळू शकते. तसेच आणीबाणीच्या परिस्थितीवर मात करणे शक्य होते, असे मत आर्मड कोर अँड स्कुल अँड मॅकेनाइज्ड इन्फन्टरी रेजिमेंटल सेंटरचे प्रमुख मेजर जनरल एस. झा यांनी सोमवारी व्यक्त केले.अहमदनगर येथील के के रेंज याठिकाणी सोमवारी रणगाड्यांच्या युद्धसरावाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. झा म्हणाले, भारतीय लष्कराची मारक क्षमता वाढविणारे रणगाडे आणि इतर लष्करी साधनसामग्री बाबत भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचे संख्याबळसारखे आहे. मात्र, भारतीय लष्कराला मिळणारे प्रशिक्षण पाकिस्तानच्या तुलनेत दर्जेदार आणि अद्ययावत आहे. आपल्या सैनिकांचे मनोबल उच्च दर्जाचे असल्याने भारतीय सैन्यदले सक्षम ठरतात.   युद्धभूमीवर रणगाड्यांचा वापर करून लष्करी मोहीम यशस्वी करण्यासाठी सैनिकांचे मनोधैर्य आणि कौशल्य  सर्वोच्च दर्जाचे असणे महत्वाचे आहे. त्यादृष्टीने भारतीय लष्कराकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. पहिल्या महायुद्धा पासून रणगाड्यांचा वापर लष्करी मोहीमसाठी केला जात आहे. बदलत्या काळात येणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानचा वापर लष्करी मोहिमांसाठी केला जातो आहे. त्यामुळे रणगाड्यांनी आपले मह्त्व आणि उपयुक्तता सिध्द केली आहे. तोफांचा मारा करण्याची क्षमता, संरक्षण आणि गतीशीलता या तीन बाबतीत रणगाडे युद्धात महत्वाची भूमिका निभावतात, असे ही त्यांनी स्पष्ट केले.चौकटजमीन अधिग्रहणासाठी प्रयत्नशील! आर्मड कोर अँड स्कुल अँड मॅकेनिआजड इंफंटरी रेजिमेंटल सेंटरच्या विस्तारासाठीअहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, राहुरी आणि नगर या तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात मिळाव्यात यासाठी संरक्षण खात्याने हालचाली सुरू केल्या आहेत. के के रेंज परिसराचे विस्तारीकरण व्हावे यासाठी या जमिनी महत्वाच्या आहेत. परंतू विस्तारीकरणामुळे २७ गावांतील शेतकरी बाधित होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा या जमिन अधिग्रहणाला विरोध आहे. याबाबत मेजर जनरल झा यांना विचारणा केली असता ते म्हणाले, संरक्षण विभागाला जमीन अधिग्रहणाबाबत प्रस्ताव दिला आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. आमच्या दृष्टीने जमीन मिळवण्याबाबत प्रयत्न करत आहोत.

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवानwarयुद्धPakistanपाकिस्तान