शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

शंभर वर्षानंतरही रणगाड्यांचे युद्धभूमीत महत्व कायम : मेजर जनरल एस. झा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 17:24 IST

पाकिस्तानपेक्षा भारतीय सैन्यदले सक्षम

ठळक मुद्देअहमदनगर येथील के के रेंज याठिकाणी सोमवारी रणगाड्यांच्या युद्धसरावचे आयोजन मोहीम यशस्वी करण्यासाठी सैनिकांचे मनोधैर्य आणि कौशल्य सर्वोच्च दर्जाचे असणे महत्वाचे तोफांचा मारा, संरक्षण आणि गतिशीलता या तीन बाबतीत रणगाड्यांची महत्वाची भूमिका

निनाद देशमुख- अहमदनगर : पहिल्या महायुद्धापासूनयुद्धभूमीवर रणगाड्यांचा वापर होतो, आज शंभर वर्षांनंतर ही त्यांचे महत्व कमी झालेले नाही. दहशतवादी कारवायांचा बिमोड करताना, तसेच शत्रुराष्ट्रांच्या सीमारेषेवर रणगाड्यांचा चांगल्या प्रकारे वापर होऊ शकतो, त्याद्वारे सैन्याला अधिक सुरक्षा मिळू शकते. तसेच आणीबाणीच्या परिस्थितीवर मात करणे शक्य होते, असे मत आर्मड कोर अँड स्कुल अँड मॅकेनाइज्ड इन्फन्टरी रेजिमेंटल सेंटरचे प्रमुख मेजर जनरल एस. झा यांनी सोमवारी व्यक्त केले.अहमदनगर येथील के के रेंज याठिकाणी सोमवारी रणगाड्यांच्या युद्धसरावाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. झा म्हणाले, भारतीय लष्कराची मारक क्षमता वाढविणारे रणगाडे आणि इतर लष्करी साधनसामग्री बाबत भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचे संख्याबळसारखे आहे. मात्र, भारतीय लष्कराला मिळणारे प्रशिक्षण पाकिस्तानच्या तुलनेत दर्जेदार आणि अद्ययावत आहे. आपल्या सैनिकांचे मनोबल उच्च दर्जाचे असल्याने भारतीय सैन्यदले सक्षम ठरतात.   युद्धभूमीवर रणगाड्यांचा वापर करून लष्करी मोहीम यशस्वी करण्यासाठी सैनिकांचे मनोधैर्य आणि कौशल्य  सर्वोच्च दर्जाचे असणे महत्वाचे आहे. त्यादृष्टीने भारतीय लष्कराकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. पहिल्या महायुद्धा पासून रणगाड्यांचा वापर लष्करी मोहीमसाठी केला जात आहे. बदलत्या काळात येणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानचा वापर लष्करी मोहिमांसाठी केला जातो आहे. त्यामुळे रणगाड्यांनी आपले मह्त्व आणि उपयुक्तता सिध्द केली आहे. तोफांचा मारा करण्याची क्षमता, संरक्षण आणि गतीशीलता या तीन बाबतीत रणगाडे युद्धात महत्वाची भूमिका निभावतात, असे ही त्यांनी स्पष्ट केले.चौकटजमीन अधिग्रहणासाठी प्रयत्नशील! आर्मड कोर अँड स्कुल अँड मॅकेनिआजड इंफंटरी रेजिमेंटल सेंटरच्या विस्तारासाठीअहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, राहुरी आणि नगर या तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात मिळाव्यात यासाठी संरक्षण खात्याने हालचाली सुरू केल्या आहेत. के के रेंज परिसराचे विस्तारीकरण व्हावे यासाठी या जमिनी महत्वाच्या आहेत. परंतू विस्तारीकरणामुळे २७ गावांतील शेतकरी बाधित होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा या जमिन अधिग्रहणाला विरोध आहे. याबाबत मेजर जनरल झा यांना विचारणा केली असता ते म्हणाले, संरक्षण विभागाला जमीन अधिग्रहणाबाबत प्रस्ताव दिला आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. आमच्या दृष्टीने जमीन मिळवण्याबाबत प्रयत्न करत आहोत.

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवानwarयुद्धPakistanपाकिस्तान