शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

शंभर वर्षानंतरही रणगाड्यांचे युद्धभूमीत महत्व कायम : मेजर जनरल एस. झा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 17:24 IST

पाकिस्तानपेक्षा भारतीय सैन्यदले सक्षम

ठळक मुद्देअहमदनगर येथील के के रेंज याठिकाणी सोमवारी रणगाड्यांच्या युद्धसरावचे आयोजन मोहीम यशस्वी करण्यासाठी सैनिकांचे मनोधैर्य आणि कौशल्य सर्वोच्च दर्जाचे असणे महत्वाचे तोफांचा मारा, संरक्षण आणि गतिशीलता या तीन बाबतीत रणगाड्यांची महत्वाची भूमिका

निनाद देशमुख- अहमदनगर : पहिल्या महायुद्धापासूनयुद्धभूमीवर रणगाड्यांचा वापर होतो, आज शंभर वर्षांनंतर ही त्यांचे महत्व कमी झालेले नाही. दहशतवादी कारवायांचा बिमोड करताना, तसेच शत्रुराष्ट्रांच्या सीमारेषेवर रणगाड्यांचा चांगल्या प्रकारे वापर होऊ शकतो, त्याद्वारे सैन्याला अधिक सुरक्षा मिळू शकते. तसेच आणीबाणीच्या परिस्थितीवर मात करणे शक्य होते, असे मत आर्मड कोर अँड स्कुल अँड मॅकेनाइज्ड इन्फन्टरी रेजिमेंटल सेंटरचे प्रमुख मेजर जनरल एस. झा यांनी सोमवारी व्यक्त केले.अहमदनगर येथील के के रेंज याठिकाणी सोमवारी रणगाड्यांच्या युद्धसरावाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. झा म्हणाले, भारतीय लष्कराची मारक क्षमता वाढविणारे रणगाडे आणि इतर लष्करी साधनसामग्री बाबत भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचे संख्याबळसारखे आहे. मात्र, भारतीय लष्कराला मिळणारे प्रशिक्षण पाकिस्तानच्या तुलनेत दर्जेदार आणि अद्ययावत आहे. आपल्या सैनिकांचे मनोबल उच्च दर्जाचे असल्याने भारतीय सैन्यदले सक्षम ठरतात.   युद्धभूमीवर रणगाड्यांचा वापर करून लष्करी मोहीम यशस्वी करण्यासाठी सैनिकांचे मनोधैर्य आणि कौशल्य  सर्वोच्च दर्जाचे असणे महत्वाचे आहे. त्यादृष्टीने भारतीय लष्कराकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. पहिल्या महायुद्धा पासून रणगाड्यांचा वापर लष्करी मोहीमसाठी केला जात आहे. बदलत्या काळात येणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानचा वापर लष्करी मोहिमांसाठी केला जातो आहे. त्यामुळे रणगाड्यांनी आपले मह्त्व आणि उपयुक्तता सिध्द केली आहे. तोफांचा मारा करण्याची क्षमता, संरक्षण आणि गतीशीलता या तीन बाबतीत रणगाडे युद्धात महत्वाची भूमिका निभावतात, असे ही त्यांनी स्पष्ट केले.चौकटजमीन अधिग्रहणासाठी प्रयत्नशील! आर्मड कोर अँड स्कुल अँड मॅकेनिआजड इंफंटरी रेजिमेंटल सेंटरच्या विस्तारासाठीअहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, राहुरी आणि नगर या तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात मिळाव्यात यासाठी संरक्षण खात्याने हालचाली सुरू केल्या आहेत. के के रेंज परिसराचे विस्तारीकरण व्हावे यासाठी या जमिनी महत्वाच्या आहेत. परंतू विस्तारीकरणामुळे २७ गावांतील शेतकरी बाधित होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा या जमिन अधिग्रहणाला विरोध आहे. याबाबत मेजर जनरल झा यांना विचारणा केली असता ते म्हणाले, संरक्षण विभागाला जमीन अधिग्रहणाबाबत प्रस्ताव दिला आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. आमच्या दृष्टीने जमीन मिळवण्याबाबत प्रयत्न करत आहोत.

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवानwarयुद्धPakistanपाकिस्तान