शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला मिळालेला नोबेल पुरस्कार मी ट्रम्प यांना समर्पित करते', मारिया कोरिना मचाडो यांचं विधान   
2
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना नो एंट्री, तालिबानी फर्मानविरोधात संताप  
3
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी फडणवीसांची तुलना नथुरामसी केल्याने भाजपा संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर
4
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
5
पांड्याच्या प्रेमाचा स्वॅग! क्रिकेटरनं शेअर केली 'त्या' ब्युटीसोबतची रोमँटिक फोटो स्टोरी
6
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
7
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार; मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सांगितली आठवण
8
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
9
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
10
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
11
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
12
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
13
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
14
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

शंभर वर्षानंतरही रणगाड्यांचे युद्धभूमीत महत्व कायम : मेजर जनरल एस. झा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 17:24 IST

पाकिस्तानपेक्षा भारतीय सैन्यदले सक्षम

ठळक मुद्देअहमदनगर येथील के के रेंज याठिकाणी सोमवारी रणगाड्यांच्या युद्धसरावचे आयोजन मोहीम यशस्वी करण्यासाठी सैनिकांचे मनोधैर्य आणि कौशल्य सर्वोच्च दर्जाचे असणे महत्वाचे तोफांचा मारा, संरक्षण आणि गतिशीलता या तीन बाबतीत रणगाड्यांची महत्वाची भूमिका

निनाद देशमुख- अहमदनगर : पहिल्या महायुद्धापासूनयुद्धभूमीवर रणगाड्यांचा वापर होतो, आज शंभर वर्षांनंतर ही त्यांचे महत्व कमी झालेले नाही. दहशतवादी कारवायांचा बिमोड करताना, तसेच शत्रुराष्ट्रांच्या सीमारेषेवर रणगाड्यांचा चांगल्या प्रकारे वापर होऊ शकतो, त्याद्वारे सैन्याला अधिक सुरक्षा मिळू शकते. तसेच आणीबाणीच्या परिस्थितीवर मात करणे शक्य होते, असे मत आर्मड कोर अँड स्कुल अँड मॅकेनाइज्ड इन्फन्टरी रेजिमेंटल सेंटरचे प्रमुख मेजर जनरल एस. झा यांनी सोमवारी व्यक्त केले.अहमदनगर येथील के के रेंज याठिकाणी सोमवारी रणगाड्यांच्या युद्धसरावाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. झा म्हणाले, भारतीय लष्कराची मारक क्षमता वाढविणारे रणगाडे आणि इतर लष्करी साधनसामग्री बाबत भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचे संख्याबळसारखे आहे. मात्र, भारतीय लष्कराला मिळणारे प्रशिक्षण पाकिस्तानच्या तुलनेत दर्जेदार आणि अद्ययावत आहे. आपल्या सैनिकांचे मनोबल उच्च दर्जाचे असल्याने भारतीय सैन्यदले सक्षम ठरतात.   युद्धभूमीवर रणगाड्यांचा वापर करून लष्करी मोहीम यशस्वी करण्यासाठी सैनिकांचे मनोधैर्य आणि कौशल्य  सर्वोच्च दर्जाचे असणे महत्वाचे आहे. त्यादृष्टीने भारतीय लष्कराकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. पहिल्या महायुद्धा पासून रणगाड्यांचा वापर लष्करी मोहीमसाठी केला जात आहे. बदलत्या काळात येणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानचा वापर लष्करी मोहिमांसाठी केला जातो आहे. त्यामुळे रणगाड्यांनी आपले मह्त्व आणि उपयुक्तता सिध्द केली आहे. तोफांचा मारा करण्याची क्षमता, संरक्षण आणि गतीशीलता या तीन बाबतीत रणगाडे युद्धात महत्वाची भूमिका निभावतात, असे ही त्यांनी स्पष्ट केले.चौकटजमीन अधिग्रहणासाठी प्रयत्नशील! आर्मड कोर अँड स्कुल अँड मॅकेनिआजड इंफंटरी रेजिमेंटल सेंटरच्या विस्तारासाठीअहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, राहुरी आणि नगर या तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात मिळाव्यात यासाठी संरक्षण खात्याने हालचाली सुरू केल्या आहेत. के के रेंज परिसराचे विस्तारीकरण व्हावे यासाठी या जमिनी महत्वाच्या आहेत. परंतू विस्तारीकरणामुळे २७ गावांतील शेतकरी बाधित होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा या जमिन अधिग्रहणाला विरोध आहे. याबाबत मेजर जनरल झा यांना विचारणा केली असता ते म्हणाले, संरक्षण विभागाला जमीन अधिग्रहणाबाबत प्रस्ताव दिला आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. आमच्या दृष्टीने जमीन मिळवण्याबाबत प्रयत्न करत आहोत.

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवानwarयुद्धPakistanपाकिस्तान