शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

सरन्यायाधीशांवरील महाभियोग डॉ. मनमोहन सिंगांमुळे उधळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 01:54 IST

सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांच्यावर राज्यसभेत महाभियोग ठराव आणण्याचे प्रयत्न माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनीच उधळून लावले असल्याचे समजते. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार डॉ. सिंग यांनी सरन्यायाधीशांवर महाभियोग आणणे ही आपली संस्कृती नाही आणि तसे करणे अयोग्य ठरेल, असे म्हणत त्या कल्पनेला विरोध केला.

- हरीश गुप्तानवी दिल्ली - सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांच्यावर राज्यसभेत महाभियोग ठराव आणण्याचे प्रयत्न माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनीच उधळून लावले असल्याचे समजते. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार डॉ. सिंग यांनी सरन्यायाधीशांवर महाभियोग आणणे ही आपली संस्कृती नाही आणि तसे करणे अयोग्य ठरेल, असे म्हणत त्या कल्पनेला विरोध केला.आणखी एका लोकशाही संस्थेची प्रतिमा मलीन करण्यापेक्षा काँग्रेस पक्षाने राजकीय लढाई लढावी, असे सिंग म्हणाले. महाभियोगातून काहीही उपयुक्त हेतू साध्य होणार नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. विरोधी पक्षांतील खासदारांच्या महाभियोगासाठी स्वाक्षऱ्या गोळा करण्याचे काम जोरदारपणे करीत असलेल्याने सांगितले की, राज्यसभेच्या ६० विद्यमान सदस्यांच्या स्वाक्षºया मिळवण्यात आल्या आहेत.न्यायव्यवस्था वाचवण्यासाठी माकपचे सीताराम येचुरी, भाकपचे डी. राजा व इतरांनी आवाहन केल्यानंतर काँग्रेस पक्षाने त्याला पाठिंबा दिला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, भाकप, माकप, राष्ट्रीय जनता दल आणि इतर बहुतेक विरोधी पक्षांच्या खासदारांनी सरन्यायाधीशांवरील महाभियोगाच्या ठरावावर स्वाक्षरी केली होती. हा ठराव सोमवारी सकाळी मांडला जाणार होता.तथापि, विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची नियोजित बैठक लांबणीवर टाकण्यात आली. त्याचे कारणही सांगितले गेले नाही. हे नेते संसद भवनातील गुलाम नबी आझादांच्या चेंबरमध्ये भेटणार होते.महाभियोग ठराव मांडण्यासाठी राज्यसभेच्या ५० खासदारांच्या स्वाक्षºयांची गरज असते. वरिष्ठ नेत्यांची औपचारिक बैठक बोलावण्यात आली होती परंतु ती लांबणीवर टाकली गेली.डॉ. मनमोहन सिंग यांची स्वाक्षरी घेण्याचे काम ज्या नेत्याकडे दिले गेले होते त्याला सिंग यांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यावर धक्काच बसला. फारसे बोलण्यास परिचित नसलेले सिंग यांनी त्या सद्गृहस्थाला हा मार्ग योग्य नाही. यामुळे ना काँग्रेसला मदत होईल ना विरोधकांना, ना देशाला, असे सांगितले. त्यांनी स्वाक्षरीस दिलेला नकार पक्षाला फेरविचार करण्यास पुरेसाआहे. वरिष्ठ विधिज्ञ कपिल सिबल अगदी आघाडीला राहून या ठरावासाठी प्रयत्न करीत होते तरीही पी. चिदंबरम आणि अभिषेक मनु सिंघवी व आणखी दोघांनीही या ठरावाला विरोध करून ठरावावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. ठरावावरील तीव्र मतभेद एकदा ऐकल्यावर ठरावासाठी प्रयत्न करणाºयांना माघार घ्यावी लागली.सबळ कारणच नाही- सरन्यायाधीशांवरील आरोप हे महाभियोगासाठी तेवढे सबळ नव्हते व हा ठराव जेव्हा दोन न्यायमूर्तींकडे व कायदेपंडितांकडे त्यांचा दृष्टीकोन समजून घेण्यासाठी जाईल, तेव्हा त्यांच्या छाननीत तो टिकला नसता, असे काही जणांना वाटले.- दुसरे म्हणजे सत्ताधारी भाजपाने आधीच दोन पावले मागे घेतलेली असताना, विरोधक आणि न्यायपालिका असा संघर्ष कशासाठी निर्माण करायचा? लोकसभेत हा ठराव मांडण्यासाठी विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ कधीही नव्हते. राज्यसभेत तो मांडण्यासाठी घेतला गेलेला पुढाकार आता गुंडाळून ठेवला गेला आहे.

टॅग्स :Deepak Mishraदीपक मिश्राSupreme Courtसर्वोच्च न्यायालयManmohan Singhमनमोहन सिंगcongressकाँग्रेस