पाण्याअभावी उसाचा पालापाचोळा ऊस उत्पादनावर परिणाम : उद्योगावर मंदीचे सावट
By Admin | Updated: January 3, 2016 00:05 IST2016-01-03T00:05:03+5:302016-01-03T00:05:03+5:30
शंभूलिंग अकतनाळ - चपळगाव : अक्कलकोट तालुक्यासाठी वरदायिनी ठरणार्या कुरनूर धरणातील पाणीसाठा पूर्णपणे आटल्याने शेतकर्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आह़े हिरवी असणारी पिके पाण्याअभावी डोळ्यादेखत जळून जात आहेत़ उसाचा तर पालापाचोळा झाला आह़े शिवाय तीव्र पाणीटंचाईमुळे जनावरांचे पिण्याच्या पाण्यामुळे हाल होत आहेत़ विशेषत: उद्योगावर मंदीचे सावट निर्माण झाले आह़े

पाण्याअभावी उसाचा पालापाचोळा ऊस उत्पादनावर परिणाम : उद्योगावर मंदीचे सावट
श भूलिंग अकतनाळ - चपळगाव : अक्कलकोट तालुक्यासाठी वरदायिनी ठरणार्या कुरनूर धरणातील पाणीसाठा पूर्णपणे आटल्याने शेतकर्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आह़े हिरवी असणारी पिके पाण्याअभावी डोळ्यादेखत जळून जात आहेत़ उसाचा तर पालापाचोळा झाला आह़े शिवाय तीव्र पाणीटंचाईमुळे जनावरांचे पिण्याच्या पाण्यामुळे हाल होत आहेत़ विशेषत: उद्योगावर मंदीचे सावट निर्माण झाले आह़ेअक्कलकोट तालुक्यात दहिटणे येथे स्वामी सर्मथ सहकारी साखर कारखाना आणि रुद्देवाडी येथील मातोर्शी लक्ष्मीबाई शुगर हे दोन कारखाने आहेत़ शिवाय शेजारील तालुक्यात नव्याने उभारण्यात येणार्या कारखान्यांची भिस्त कुरनूर धरणाजवळील ऊस क्षेत्रावर अवलंबून आह़े ऊस उत्पादनासाठी तालुक्यात कुरनूर धरणाशेजारील कुरनूर, बावकरवाडी, चपळगाव, सिंदखेड, मोट्याळ, बर्हाणपूर, दहिटणे या गावात बहुतांश शेतकरी ऊस उत्पादनावर भर देत आले आहेत, परंतु धरणच कोरडे पडल्याने उसाची उभी पिके जळताना दिसत आहेत़ ऊस लागवड आणि तो सांभाळण्यासाठी केलेला खर्चही निघेल की नाही याची शंका आह़े त्यामुळे शेतकरी कर्जाबाजारात बुडत आह़े शिवाय मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि लग्नांसह अन्य समारंभ करणे मुश्कील झाल्याचे शेतकरी शिवानंद दुलंगे यांनी सांगितल़े इन्फो बॉक्सयंदाचा हंगाम कारखानदारांसाठी खडतरकुरनूर धरणातील पाणीसाठा संपल्याने ऊस उत्पादनावर साहजिकच त्याचा यंदा फार मोठा परिणाम होत आह़े सर्वत्र पाण्याअभावी बागायतीचे क्षेत्र घटले आह़े त्यामुळे उसाचे क्षेत्रदेखील कमी झाले आह़े नेमक्या याच कारणामुळे यंदाचा हंगाम कारखानदारांसाठी खडतर असेल़ त्यातच काही पशुपालकांनी जनावरांसाठी चारा म्हणून उसाला प्राधान्य दिले आह़े धरण क्षेत्रातील मातोर्शी, कंचेश्वर, लोकमंगल, सिद्धेश्वर कारखान्याच्या टोळ्या दाखल झाल्या आहेत, पण दरवर्षीप्रमाणे तोडण्यायोग्य ऊस नसल्याने कामगारही नाराज आहेत़ ऊस उत्पादन कमी झाल्याने गाळप हंगामही लवकर आटोपण्याची शक्यता असल्याचे लोकमंगलचे सरव्यवस्थापक रविकांत पाटील यांनी सांगितल़े कोटपावसाअभावी खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आह़े त्यांचा आर्थिक भार कशाने भागवावा याची चिंता आह़े त्यामुळेच सोमवारचा आठवडा बाजार सुनासुना होत चालला आह़े शेतकर्यांचा खिसा रिकामा असल्याने तो बाजारपेठेत जाण्याचे धाडस करीत नाही, परिणामी व्यापार्यांवरही संक्रांत ओढवली आह़े- अभिजित पाटील,व्यापारी, अक्कलकोटफोटो आह़े