शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमंतांनी देश सोडल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम; हा मनमानी कराचा परिणाम : काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 08:17 IST

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, भारत सोडणारे अनेक भारतीय उच्च कुशल आणि शिक्षित आहेत...

नवी दिल्ली : श्रीमंत भारतीय नागरिकांनी त्यांचे नागरिकत्व सोडल्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली असून, हा सरकारच्या अपारदर्शक कर धोरणांचा आणि मनमानी कराचापरिणाम असू शकतो, असे काँग्रेसने म्हटले आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, भारत सोडणारे अनेक भारतीय उच्च कुशल आणि शिक्षित आहेत. देशात कुशल कामगार गरजेचे असताना भारतीयांनी देश सोडल्याने अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल. राज्यसभेत सरकारने स्वत: दिलेल्या आकडेवारीनुसार २०२३ मध्ये २.१६ लाख भारतीयांनी भारतीय नागरिकत्व सोडले आहे. २०११ मध्ये हे प्रमाण १,२३,००० होते. पारदर्शक कर धोरणे आणि मनमानी कर प्रशासनाचा हा परिणाम असू शकतो, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

कोणत्या वर्षी किती भारतीय परदेशात गेले?

तरुण जाताहेत कुठे? : तरुण, उद्योजक मोठ्या प्रमाणात सिंगापूर, दुबई, ब्रिटन आणि इतर देशांमध्ये जात आहेत. गेल्या तीन वर्षांत दहा लाख डॉलर्सपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या भारतीयांनी देश सोडला.

मंत्री म्हणाले... : नागरिकत्व सोडण्याची किंवा घेण्याची कारणे वैयक्तिक आहेत. एक यशस्वी, संपन्न आणि प्रभावशाली प्रवासी ही भारतीय समुदायाची संपत्ती आहे, असे परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग म्हणाले. 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाEconomyअर्थव्यवस्था