शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमंतांनी देश सोडल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम; हा मनमानी कराचा परिणाम : काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 08:17 IST

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, भारत सोडणारे अनेक भारतीय उच्च कुशल आणि शिक्षित आहेत...

नवी दिल्ली : श्रीमंत भारतीय नागरिकांनी त्यांचे नागरिकत्व सोडल्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली असून, हा सरकारच्या अपारदर्शक कर धोरणांचा आणि मनमानी कराचापरिणाम असू शकतो, असे काँग्रेसने म्हटले आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, भारत सोडणारे अनेक भारतीय उच्च कुशल आणि शिक्षित आहेत. देशात कुशल कामगार गरजेचे असताना भारतीयांनी देश सोडल्याने अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल. राज्यसभेत सरकारने स्वत: दिलेल्या आकडेवारीनुसार २०२३ मध्ये २.१६ लाख भारतीयांनी भारतीय नागरिकत्व सोडले आहे. २०११ मध्ये हे प्रमाण १,२३,००० होते. पारदर्शक कर धोरणे आणि मनमानी कर प्रशासनाचा हा परिणाम असू शकतो, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

कोणत्या वर्षी किती भारतीय परदेशात गेले?

तरुण जाताहेत कुठे? : तरुण, उद्योजक मोठ्या प्रमाणात सिंगापूर, दुबई, ब्रिटन आणि इतर देशांमध्ये जात आहेत. गेल्या तीन वर्षांत दहा लाख डॉलर्सपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या भारतीयांनी देश सोडला.

मंत्री म्हणाले... : नागरिकत्व सोडण्याची किंवा घेण्याची कारणे वैयक्तिक आहेत. एक यशस्वी, संपन्न आणि प्रभावशाली प्रवासी ही भारतीय समुदायाची संपत्ती आहे, असे परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग म्हणाले. 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाEconomyअर्थव्यवस्था