शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

भाजपच्या रणनीतीवर ओबीसी मुद्द्याचा प्रभाव, काँग्रेसच्या जनगणनेच्या घोषणेनंतर सतर्कता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 08:55 IST

बिहारनंतर मध्यप्रदेश, छत्तीसगढ व राजस्थानमध्येही जातीनिहाय जनगणना करण्याच्या काँग्रेसच्या घोषणेनंतर भाजप सतर्क झाला आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने कोणत्याही नेत्याला भावी मुख्यमंत्री म्हणून घोषित केलेले नाही.

संजय शर्मा -

नवी दिल्ली : जातनिहाय जनगणना व ओबीसी मुद्द्याचा प्रभाव भाजपच्या निवडणूक रणनीतीवर स्पष्टपणे दिसू लागला आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही ओबीसींच्या मुद्द्यावर भाजपचा भर राहणार आहे. 

बिहारनंतर मध्यप्रदेश, छत्तीसगढ व राजस्थानमध्येही जातीनिहाय जनगणना करण्याच्या काँग्रेसच्या घोषणेनंतर भाजप सतर्क झाला आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने कोणत्याही नेत्याला भावी मुख्यमंत्री म्हणून घोषित केलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव पुढे आल्याने स्थानिक नेतृत्वाविरोधातील नाराजी कमी होईल, असा होरा मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढण्याच्या भाजपच्या रणनीतीमागे दिसतो. त्याचबरोबर तेथील नेतृत्वाची लढाई थांबेल व ओबीसी मुद्द्यावर विरोधकांकडून जे राजकारण केले जात आहे, त्याचाही प्रभाव कमी होईल, असे भाजप नेतृत्त्वाला वाटते. कारण स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी आहेत.

मध्यप्रदेशात काय?- मध्यप्रदेशात शिवराज सिंह चौहान यांना बाजूला करण्यात आलेले नाही. कारण ते ओबीसी आहेत. - अन्य समुदायाच्या नेत्याला मुख्यमंत्री केल्यास ओबीसी नाराज होण्याची शक्यता आहे. - छत्तीसगडमध्येही माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांना उतरवणार आहे.

राजस्थानात काय?राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांना पर्याय नाही. त्यासोबतच भाजप खा. दिया कुमारी यांना आणण्याची चर्चा आहे. दलित नेते अर्जुन मेघवाल, जाट समुदायाला आकर्षित करण्यासाठी कैलाश चौधरी व राजपूत नेते गजेंद्र सिंह शेखावत यांनाही बळ दिले जाईल.

तेलंगणात काय?तेलंगणामध्ये केंद्रीय मंत्री किशन रेड्डी व ओबीसी नेते लक्ष्मण यांना महत्त्व देण्यात आले आहे. असे असले तरी या राज्यांमध्ये सरकार आल्यास कोणाकडे नेतृत्व देणार, याबाबत भाजपने आपले पत्ते गुलदस्त्यात ठेवले आहेत. 

टॅग्स :BJPभाजपाOBCअन्य मागासवर्गीय जातीElectionनिवडणूकPoliticsराजकारण