शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

अमर प्रेम! पतीचे पार्थिव पाहून पत्नीनेही सोडले प्राण, एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 21:24 IST

Love Story News: राजस्थानमधील नारौर जिल्ह्यातील रूण गावामध्ये एक अजब घटना घडली आहे. येथे सुमारे ५८ वर्षे एकत्र राहिलेल्या पती-पत्नीने एकत्रच जगाचा निरोप घेतला. रूण गावामध्ये या जोडप्याच्या प्रेमाचे उदाहरण दिले जात असे.

जयपूर - राजस्थानमधील नारौर जिल्ह्यातील रूण गावामध्ये एक अजब घटना घडली आहे. येथे सुमारे ५८ वर्षे एकत्र राहिलेल्या पती-पत्नीने एकत्रच जगाचा निरोप घेतला. रूण गावामध्ये या जोडप्याच्या प्रेमाचे उदाहरण दिले जात असे. आता सोबत जगणाऱ्या या जोडीने एकत्रच जगाचा निरोप घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यानंतर या दोघांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच अंत्यसंस्काराचे सर्व विधी हे त्यांच्या दोन्ही मुलींनी पूर्ण केले.

रूण गावातील राहणारे ७८ वर्षांचे राणाराम सेन यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना उपचारांसाठी आधी नागौर आणि नंतर जोधपूर येथे नेण्यात आले. मात्र रविवारी सकाळी जोधपूरमध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सकाळी आठ वाजता राणाराम यांचा मृतदेह गावात आणण्यात आला. मात्र पत्नी भंवरी देवी यांनी जेव्हा त्यांचा मृतदेह पाहिला तेव्हा त्यांना हा धक्का सहन झाला नाही. त्यांनीही त्याच ठिकाणी प्राण त्यागून जगाचा निरोप घेतला.

रूण गावातील लोक या जोड्याला नशीबवान समजत आहेत. तसेच त्यांच्या अखेरच्या निरोपाची चर्चाही गावात सगळीकडे होत आहे. प्रत्येकजण सांगत आहे की, एवढं प्रदीर्घ दाम्पत्य जीवन जगल्यानंतर एकत्रच जगाचा निरोप घेणारे लोक हे भाग्यवानच म्हटले पाहिजे. राणाराम सेन गावातील शनिदेव मंदिरामध्ये पूजापाठ करत असत. ते धार्मिक प्रवृत्तीचे होते. पती आणि पत्नीमध्ये खूप प्रेम होते. राणाराम आणि भंवरी देवी गेल्या ५८ वर्षांपासून एकत्र राहत होते.   

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टRajasthanराजस्थान