शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
5
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
6
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
7
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
8
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
9
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
10
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
11
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
12
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
13
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
14
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
15
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
16
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
17
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
18
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
19
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
20
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!

अमर प्रेम! पतीचे पार्थिव पाहून पत्नीनेही सोडले प्राण, एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 21:24 IST

Love Story News: राजस्थानमधील नारौर जिल्ह्यातील रूण गावामध्ये एक अजब घटना घडली आहे. येथे सुमारे ५८ वर्षे एकत्र राहिलेल्या पती-पत्नीने एकत्रच जगाचा निरोप घेतला. रूण गावामध्ये या जोडप्याच्या प्रेमाचे उदाहरण दिले जात असे.

जयपूर - राजस्थानमधील नारौर जिल्ह्यातील रूण गावामध्ये एक अजब घटना घडली आहे. येथे सुमारे ५८ वर्षे एकत्र राहिलेल्या पती-पत्नीने एकत्रच जगाचा निरोप घेतला. रूण गावामध्ये या जोडप्याच्या प्रेमाचे उदाहरण दिले जात असे. आता सोबत जगणाऱ्या या जोडीने एकत्रच जगाचा निरोप घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यानंतर या दोघांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच अंत्यसंस्काराचे सर्व विधी हे त्यांच्या दोन्ही मुलींनी पूर्ण केले.

रूण गावातील राहणारे ७८ वर्षांचे राणाराम सेन यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना उपचारांसाठी आधी नागौर आणि नंतर जोधपूर येथे नेण्यात आले. मात्र रविवारी सकाळी जोधपूरमध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सकाळी आठ वाजता राणाराम यांचा मृतदेह गावात आणण्यात आला. मात्र पत्नी भंवरी देवी यांनी जेव्हा त्यांचा मृतदेह पाहिला तेव्हा त्यांना हा धक्का सहन झाला नाही. त्यांनीही त्याच ठिकाणी प्राण त्यागून जगाचा निरोप घेतला.

रूण गावातील लोक या जोड्याला नशीबवान समजत आहेत. तसेच त्यांच्या अखेरच्या निरोपाची चर्चाही गावात सगळीकडे होत आहे. प्रत्येकजण सांगत आहे की, एवढं प्रदीर्घ दाम्पत्य जीवन जगल्यानंतर एकत्रच जगाचा निरोप घेणारे लोक हे भाग्यवानच म्हटले पाहिजे. राणाराम सेन गावातील शनिदेव मंदिरामध्ये पूजापाठ करत असत. ते धार्मिक प्रवृत्तीचे होते. पती आणि पत्नीमध्ये खूप प्रेम होते. राणाराम आणि भंवरी देवी गेल्या ५८ वर्षांपासून एकत्र राहत होते.   

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टRajasthanराजस्थान