शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

अमर प्रेम! पतीचे पार्थिव पाहून पत्नीनेही सोडले प्राण, एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 21:24 IST

Love Story News: राजस्थानमधील नारौर जिल्ह्यातील रूण गावामध्ये एक अजब घटना घडली आहे. येथे सुमारे ५८ वर्षे एकत्र राहिलेल्या पती-पत्नीने एकत्रच जगाचा निरोप घेतला. रूण गावामध्ये या जोडप्याच्या प्रेमाचे उदाहरण दिले जात असे.

जयपूर - राजस्थानमधील नारौर जिल्ह्यातील रूण गावामध्ये एक अजब घटना घडली आहे. येथे सुमारे ५८ वर्षे एकत्र राहिलेल्या पती-पत्नीने एकत्रच जगाचा निरोप घेतला. रूण गावामध्ये या जोडप्याच्या प्रेमाचे उदाहरण दिले जात असे. आता सोबत जगणाऱ्या या जोडीने एकत्रच जगाचा निरोप घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यानंतर या दोघांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच अंत्यसंस्काराचे सर्व विधी हे त्यांच्या दोन्ही मुलींनी पूर्ण केले.

रूण गावातील राहणारे ७८ वर्षांचे राणाराम सेन यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना उपचारांसाठी आधी नागौर आणि नंतर जोधपूर येथे नेण्यात आले. मात्र रविवारी सकाळी जोधपूरमध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सकाळी आठ वाजता राणाराम यांचा मृतदेह गावात आणण्यात आला. मात्र पत्नी भंवरी देवी यांनी जेव्हा त्यांचा मृतदेह पाहिला तेव्हा त्यांना हा धक्का सहन झाला नाही. त्यांनीही त्याच ठिकाणी प्राण त्यागून जगाचा निरोप घेतला.

रूण गावातील लोक या जोड्याला नशीबवान समजत आहेत. तसेच त्यांच्या अखेरच्या निरोपाची चर्चाही गावात सगळीकडे होत आहे. प्रत्येकजण सांगत आहे की, एवढं प्रदीर्घ दाम्पत्य जीवन जगल्यानंतर एकत्रच जगाचा निरोप घेणारे लोक हे भाग्यवानच म्हटले पाहिजे. राणाराम सेन गावातील शनिदेव मंदिरामध्ये पूजापाठ करत असत. ते धार्मिक प्रवृत्तीचे होते. पती आणि पत्नीमध्ये खूप प्रेम होते. राणाराम आणि भंवरी देवी गेल्या ५८ वर्षांपासून एकत्र राहत होते.   

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टRajasthanराजस्थान