शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
4
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
5
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
6
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
7
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
8
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
9
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
10
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
11
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
12
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
13
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
14
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
15
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
16
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
17
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
18
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
19
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
20
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?

'मी माझा फोन द्यायला तयार, मला टॅप करण्याची भीती वाटत नाही'; अ‍ॅपलच्या अलर्टवर राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 16:26 IST

फोन टॅपिंगच्या आरोपांदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर आरोप केले आहेत.

अ‍ॅपलचा आयफोन वापरणारे खासदार असदुद्दीन ओवेसी, महुआ मोईत्रा, शशी थरूर आणि राघव चढ्ढा यांच्यासह अनेक नेत्यांनी मंगळवारी एक अलर्ट संदेश शेअर केला आणि आरोप केला की ते टॅप केले जात आहेत. ओवेसीसह अनेक नेत्यांनी अ‍ॅपलचा चेतावणी संदेश शेअर केला होता, ज्यात लिहिले होते - अ‍ॅपलला वाटते की राज्य प्रायोजित हल्लेखोरांकडून तुम्हाला लक्ष्य केले जात आहे. कदाचित हल्लेखोर तुमच्यावर वैयक्तिक हल्ला करत असतील. तुमचे कामही याला कारण असू शकते. मात्र, आता याबाबत अ‍ॅपलचे वक्तव्य समोर आले असून, हे खोटे इशारे असून सरकारने असे काहीही केले नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही यावरुन आता सरकारवर आरोप केले आहेत. गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. फोन टॅपिंगला मी घाबरत नाही, असे ते म्हणाले. राहुल गांधी म्हणाले की, केसी वेणुगोपाल, पवन खेडा, सीताराम येचुरी यांच्यासह अनेक नेत्यांना असे अलर्ट आले आहेत. 'भाजप आणि अदानी यांच्याविरोधात फार कमी लोक लढत आहेत. तुम्हाला पाहिजे तेवढा फोन तुम्ही टॅप करू शकता. मला त्याची पर्वा नाही. तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला माझा फोन देऊ शकतो. आम्ही घाबरत नाही आणि लढायला तयार आहोत, असंही राहुल गांधी म्हणाले. 

'नरेंद्र मोदी सरकारचा आत्मा अदानी समूहासोबत असल्याचा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला. अदानींवर प्रश्न उपस्थित होताच ईडी आणि सीबीआय सक्रिय होतात.  संपूर्ण देशाचे आणि संपूर्ण विरोधकांचे डोळे अदानींकडे लागले असून सरकार जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही गांधी यांनी केला. 'मोदी सरकारमध्ये अदानी पहिल्या क्रमांकावर आणि नरेंद्र मोदी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मोदींचा आत्मा अदानींमध्ये आहे, म्हणूनच त्यांनी अदानींसाठी कृषी कायदा केला. विमानतळ, बंदरे, सिमेंट कारखाने आणि इतर पायाभूत सुविधा अदानींकडे सोपवण्यात आल्या आहेत, असंही गांधी म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले, अदानी यांची मक्तेदारी झाली असून त्यामुळे देशातील तरुणांचे नुकसान होत आहे. देशातील जनतेचा पैसा हिसकावून अदानींना दिला जात आहे. जात जनगणनेशिवाय देशात काहीही होऊ शकत नाही,देशातील जनता अदानींकडून वीज विकत घेते, कोळशापासून वीज निर्माण होते आणि कोळसा अदानींकडे दिला जातो. जनतेवर मनमानी कर लादून अदानी मोदी सरकारकडून पैसे उकळत असून देशातील दलित-आदिवासींचा पैसा लुटला जात आहे, असंही राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी