शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

'मी माझा फोन द्यायला तयार, मला टॅप करण्याची भीती वाटत नाही'; अ‍ॅपलच्या अलर्टवर राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 16:26 IST

फोन टॅपिंगच्या आरोपांदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर आरोप केले आहेत.

अ‍ॅपलचा आयफोन वापरणारे खासदार असदुद्दीन ओवेसी, महुआ मोईत्रा, शशी थरूर आणि राघव चढ्ढा यांच्यासह अनेक नेत्यांनी मंगळवारी एक अलर्ट संदेश शेअर केला आणि आरोप केला की ते टॅप केले जात आहेत. ओवेसीसह अनेक नेत्यांनी अ‍ॅपलचा चेतावणी संदेश शेअर केला होता, ज्यात लिहिले होते - अ‍ॅपलला वाटते की राज्य प्रायोजित हल्लेखोरांकडून तुम्हाला लक्ष्य केले जात आहे. कदाचित हल्लेखोर तुमच्यावर वैयक्तिक हल्ला करत असतील. तुमचे कामही याला कारण असू शकते. मात्र, आता याबाबत अ‍ॅपलचे वक्तव्य समोर आले असून, हे खोटे इशारे असून सरकारने असे काहीही केले नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही यावरुन आता सरकारवर आरोप केले आहेत. गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. फोन टॅपिंगला मी घाबरत नाही, असे ते म्हणाले. राहुल गांधी म्हणाले की, केसी वेणुगोपाल, पवन खेडा, सीताराम येचुरी यांच्यासह अनेक नेत्यांना असे अलर्ट आले आहेत. 'भाजप आणि अदानी यांच्याविरोधात फार कमी लोक लढत आहेत. तुम्हाला पाहिजे तेवढा फोन तुम्ही टॅप करू शकता. मला त्याची पर्वा नाही. तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला माझा फोन देऊ शकतो. आम्ही घाबरत नाही आणि लढायला तयार आहोत, असंही राहुल गांधी म्हणाले. 

'नरेंद्र मोदी सरकारचा आत्मा अदानी समूहासोबत असल्याचा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला. अदानींवर प्रश्न उपस्थित होताच ईडी आणि सीबीआय सक्रिय होतात.  संपूर्ण देशाचे आणि संपूर्ण विरोधकांचे डोळे अदानींकडे लागले असून सरकार जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही गांधी यांनी केला. 'मोदी सरकारमध्ये अदानी पहिल्या क्रमांकावर आणि नरेंद्र मोदी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मोदींचा आत्मा अदानींमध्ये आहे, म्हणूनच त्यांनी अदानींसाठी कृषी कायदा केला. विमानतळ, बंदरे, सिमेंट कारखाने आणि इतर पायाभूत सुविधा अदानींकडे सोपवण्यात आल्या आहेत, असंही गांधी म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले, अदानी यांची मक्तेदारी झाली असून त्यामुळे देशातील तरुणांचे नुकसान होत आहे. देशातील जनतेचा पैसा हिसकावून अदानींना दिला जात आहे. जात जनगणनेशिवाय देशात काहीही होऊ शकत नाही,देशातील जनता अदानींकडून वीज विकत घेते, कोळशापासून वीज निर्माण होते आणि कोळसा अदानींकडे दिला जातो. जनतेवर मनमानी कर लादून अदानी मोदी सरकारकडून पैसे उकळत असून देशातील दलित-आदिवासींचा पैसा लुटला जात आहे, असंही राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी