शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

'मी माझा फोन द्यायला तयार, मला टॅप करण्याची भीती वाटत नाही'; अ‍ॅपलच्या अलर्टवर राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 16:26 IST

फोन टॅपिंगच्या आरोपांदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर आरोप केले आहेत.

अ‍ॅपलचा आयफोन वापरणारे खासदार असदुद्दीन ओवेसी, महुआ मोईत्रा, शशी थरूर आणि राघव चढ्ढा यांच्यासह अनेक नेत्यांनी मंगळवारी एक अलर्ट संदेश शेअर केला आणि आरोप केला की ते टॅप केले जात आहेत. ओवेसीसह अनेक नेत्यांनी अ‍ॅपलचा चेतावणी संदेश शेअर केला होता, ज्यात लिहिले होते - अ‍ॅपलला वाटते की राज्य प्रायोजित हल्लेखोरांकडून तुम्हाला लक्ष्य केले जात आहे. कदाचित हल्लेखोर तुमच्यावर वैयक्तिक हल्ला करत असतील. तुमचे कामही याला कारण असू शकते. मात्र, आता याबाबत अ‍ॅपलचे वक्तव्य समोर आले असून, हे खोटे इशारे असून सरकारने असे काहीही केले नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही यावरुन आता सरकारवर आरोप केले आहेत. गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. फोन टॅपिंगला मी घाबरत नाही, असे ते म्हणाले. राहुल गांधी म्हणाले की, केसी वेणुगोपाल, पवन खेडा, सीताराम येचुरी यांच्यासह अनेक नेत्यांना असे अलर्ट आले आहेत. 'भाजप आणि अदानी यांच्याविरोधात फार कमी लोक लढत आहेत. तुम्हाला पाहिजे तेवढा फोन तुम्ही टॅप करू शकता. मला त्याची पर्वा नाही. तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला माझा फोन देऊ शकतो. आम्ही घाबरत नाही आणि लढायला तयार आहोत, असंही राहुल गांधी म्हणाले. 

'नरेंद्र मोदी सरकारचा आत्मा अदानी समूहासोबत असल्याचा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला. अदानींवर प्रश्न उपस्थित होताच ईडी आणि सीबीआय सक्रिय होतात.  संपूर्ण देशाचे आणि संपूर्ण विरोधकांचे डोळे अदानींकडे लागले असून सरकार जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही गांधी यांनी केला. 'मोदी सरकारमध्ये अदानी पहिल्या क्रमांकावर आणि नरेंद्र मोदी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मोदींचा आत्मा अदानींमध्ये आहे, म्हणूनच त्यांनी अदानींसाठी कृषी कायदा केला. विमानतळ, बंदरे, सिमेंट कारखाने आणि इतर पायाभूत सुविधा अदानींकडे सोपवण्यात आल्या आहेत, असंही गांधी म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले, अदानी यांची मक्तेदारी झाली असून त्यामुळे देशातील तरुणांचे नुकसान होत आहे. देशातील जनतेचा पैसा हिसकावून अदानींना दिला जात आहे. जात जनगणनेशिवाय देशात काहीही होऊ शकत नाही,देशातील जनता अदानींकडून वीज विकत घेते, कोळशापासून वीज निर्माण होते आणि कोळसा अदानींकडे दिला जातो. जनतेवर मनमानी कर लादून अदानी मोदी सरकारकडून पैसे उकळत असून देशातील दलित-आदिवासींचा पैसा लुटला जात आहे, असंही राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी