शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

आयआयटी बाबा अभय सिंह : शेवटच्या पानांवर असतात स्वप्ने अन् सुप्त इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 11:23 IST

मला आश्रम सोडून जाण्यास सांगितल्याचा दावा आयआयटी बाबांनी केला आहे.

महाकुंभ नगर : महाकुंभ मेळ्यात आयआयटी बाबा अभय सिंह यांचा खूप बोलबाला आहे. आयआयटी मुंबईतून एअरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी ‘दी लास्ट पेज ऑफ दी नोटबुक’ असा एक प्रकल्प केला. कोटा येथे कोचिंग क्लासमध्ये शिकणारे, हॉस्टेलमध्ये राहात असलेल्या विद्यार्थ्यांनी शेवटच्या पानावर काय लिहिले जाते याचा अभ्यास करून त्याचे मानसशास्त्रीय विश्लेषण केले होते.

२०१४ साली त्यांनी या प्रकल्पाच्या निष्कर्षांत अभय सिंह यांनी म्हटले होते की, विद्यार्थ्यांच्या मनात अनेक सुप्त इच्छा असतात. त्यांची पूर्तता होत नसल्यास त्याबद्दल मनात आलेले विचार शेरेबाजीतून आपल्या वह्यांच्या शेवटच्या पानावर लिहितात. मनातले विचार या पानांवर चित्र काढून व्यक्त करतात. त्यांनी केलेले हे भावनांचे विरेचन असते. अभय सिंह यांना असे आढळले की, वहीची सुरुवातीची पाने संबंधित विषयाच्या नोट्स लिहिण्यासाठी वापरलेली असतात, पण सर्वांत मागच्या पानावरचा मजकूर हा बहुतांश वेळा त्या विषयाशी संबंधित नसतो. (वृत्तसंस्था) 

‘मला निघून जाण्यास सांगितले’आयआयटी बाबा अभय सिंह हे महाकुंभ मेळ्यातून जुन्या आखाड्यातील आश्रमातून बेपत्ता झाले अशा आशयाच्या बातम्यांचा त्यांनी इन्कार केला आहे. प्रसारमाध्यमांशी सातत्याने संवाद साधणाऱ्या या बाबांची मानसिक स्थिती नीट नाही, असा दावा काही साधूंनी केला होता. तो त्यांनी खोडून काढला आहे. मला आश्रम सोडून जाण्यास सांगितल्याचा दावा आयआयटी बाबांनी केला आहे. मी प्रसिद्ध झालो,  हा आमची गुपिते फोडेल अशी आश्रम संचालकांना भीती वाटली, असेही त्यांनी सांगितले.  

एअरोस्पेस इंजिनीअरमध्ये उच्चशिक्षणकोटा येथे विद्यार्थी त्यांच्या वहीच्या शेवटच्या पानांवर नेमके काय लिहितात या विषयावर अभय सिंह यांनी वर्षभर अभ्यास केला. आयआयटी इंजिनिअर ते संन्यासी असा प्रवास करणारे अभय सिंह हरयाणातील झज्जर जिल्ह्याचे मूळ रहिवासी आहेत. कोटा येथील कोचिंग क्लासमध्ये शिकावे, अशी त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती. मात्र, ते दिल्लीमध्ये आले. जेईईमध्ये ७३१वी रँक मिळवून त्यांनी आयआयटी मुंबईत एअरोस्पेस इंजिनिअरिंगमधून पदवी शिक्षण घेतले. ते पहिल्याच फटक्यात जेईई परीक्षा उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर त्यांनी डिझाईनिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळा