शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

आयआयटी बाबा अभय सिंह : शेवटच्या पानांवर असतात स्वप्ने अन् सुप्त इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 11:23 IST

मला आश्रम सोडून जाण्यास सांगितल्याचा दावा आयआयटी बाबांनी केला आहे.

महाकुंभ नगर : महाकुंभ मेळ्यात आयआयटी बाबा अभय सिंह यांचा खूप बोलबाला आहे. आयआयटी मुंबईतून एअरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी ‘दी लास्ट पेज ऑफ दी नोटबुक’ असा एक प्रकल्प केला. कोटा येथे कोचिंग क्लासमध्ये शिकणारे, हॉस्टेलमध्ये राहात असलेल्या विद्यार्थ्यांनी शेवटच्या पानावर काय लिहिले जाते याचा अभ्यास करून त्याचे मानसशास्त्रीय विश्लेषण केले होते.

२०१४ साली त्यांनी या प्रकल्पाच्या निष्कर्षांत अभय सिंह यांनी म्हटले होते की, विद्यार्थ्यांच्या मनात अनेक सुप्त इच्छा असतात. त्यांची पूर्तता होत नसल्यास त्याबद्दल मनात आलेले विचार शेरेबाजीतून आपल्या वह्यांच्या शेवटच्या पानावर लिहितात. मनातले विचार या पानांवर चित्र काढून व्यक्त करतात. त्यांनी केलेले हे भावनांचे विरेचन असते. अभय सिंह यांना असे आढळले की, वहीची सुरुवातीची पाने संबंधित विषयाच्या नोट्स लिहिण्यासाठी वापरलेली असतात, पण सर्वांत मागच्या पानावरचा मजकूर हा बहुतांश वेळा त्या विषयाशी संबंधित नसतो. (वृत्तसंस्था) 

‘मला निघून जाण्यास सांगितले’आयआयटी बाबा अभय सिंह हे महाकुंभ मेळ्यातून जुन्या आखाड्यातील आश्रमातून बेपत्ता झाले अशा आशयाच्या बातम्यांचा त्यांनी इन्कार केला आहे. प्रसारमाध्यमांशी सातत्याने संवाद साधणाऱ्या या बाबांची मानसिक स्थिती नीट नाही, असा दावा काही साधूंनी केला होता. तो त्यांनी खोडून काढला आहे. मला आश्रम सोडून जाण्यास सांगितल्याचा दावा आयआयटी बाबांनी केला आहे. मी प्रसिद्ध झालो,  हा आमची गुपिते फोडेल अशी आश्रम संचालकांना भीती वाटली, असेही त्यांनी सांगितले.  

एअरोस्पेस इंजिनीअरमध्ये उच्चशिक्षणकोटा येथे विद्यार्थी त्यांच्या वहीच्या शेवटच्या पानांवर नेमके काय लिहितात या विषयावर अभय सिंह यांनी वर्षभर अभ्यास केला. आयआयटी इंजिनिअर ते संन्यासी असा प्रवास करणारे अभय सिंह हरयाणातील झज्जर जिल्ह्याचे मूळ रहिवासी आहेत. कोटा येथील कोचिंग क्लासमध्ये शिकावे, अशी त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती. मात्र, ते दिल्लीमध्ये आले. जेईईमध्ये ७३१वी रँक मिळवून त्यांनी आयआयटी मुंबईत एअरोस्पेस इंजिनिअरिंगमधून पदवी शिक्षण घेतले. ते पहिल्याच फटक्यात जेईई परीक्षा उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर त्यांनी डिझाईनिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळा