शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

'राजकारण करायचे असेल तर निवडणूक लढवा', मुख्य निवडणूक आयुक्तांवर केजरीवालांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 14:46 IST

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोग आणि आयुक्तांबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

नवी दिल्ली : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी(30 जानेवारी) निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. 'निवडणूक आयोग राजकारण करत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajeev Kumar) हे निवृत्तीनंतर नोकरीच्या शोधात आहेत, त्यामुळे ते राजकारण करत आहेत,' असा आरोप केजरीवालांनी केला.

केजरीवाल पुढे म्हणतात, 'दिल्लीत उघडपणे पैसे वाटले जातात, त्यांना ते दिसत नाही. इतिहास राजीव कुमार यांना कधीही माफ करणार नाही. मुख्य निवडणूक आयुक्तांना राजकारण करायचे असेल तर त्यांनी दिल्लीतील कोणत्याही विधानसभेच्या जागेवरुन निवडणूक लढवावी. निवडणूक आयोग यापूर्वी एवढा बरबाद झाला असेल असे मला वाटत नाही. मला माहीत आहे की, ते मला दोन दिवसात तुरुंगात टाकतील, टाकू द्या. मी घाबरत नाही. देशाने यापूर्वी अशाप्रकारच्या निवडणुका कधीच पाहिल्या नाहीत.'

नेमका वाद काय?अरविंद केजरीवाल यांच्या ‘यमुनेत विष’ या वक्तव्यामुळे राजकारण तापले आहे. निवडणूक आयोगाने याप्रकरणी आप प्रमुखांना 5 प्रश्न विचारले असून, उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.

त्यांना विचारण्यात आलेल्या पाच प्रश्नांपैकी पहिला प्रश्न म्हणजे, हरियाणा सरकारने यमुना नदीत कोणते विष मिसळले? विषाचे प्रमाण, प्रकृती आणि शोधण्याच्या पद्धतीचा कोणता पुरावा आहे? विष कुठे सापडले? दिल्ली जल मंडळाच्या कोणत्या अभियंत्यांनी ते ओळखले, कुठे आणि कसे? विषारी पाणी दिल्लीत येऊ नये म्हणून अभियंत्यांनी कोणती पद्धत अवलंबली? या प्रश्नांची उत्तर केजरीवालांना द्यायची आहेत.

यमुनेचा वाद काय आहे?

27 जानेवारी रोजी एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरियाणाकडून दिल्लीला पुरवल्या जाणाऱ्या पाण्याच्या निकृष्ट दर्जाचा मुद्दा उपस्थित केला होता. केजरीवाल म्हणाले होते, 'लोकांना पाण्यापासून वंचित ठेवण्यापेक्षा मोठे पाप नाही. भाजप आपल्या गलिच्छ राजकारणाने दिल्लीतील जनतेला त्रास देत आहे. हरियाणातून येणाऱ्या यमुनेच्या पाण्यात ते विष मिसळत आहेत. हे प्रदूषित पाणी इतके विषारी आहे की दिल्लीत असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रांच्या मदतीने त्यावर प्रक्रियाही करता येत नाही. भाजपला दिल्लीकरांची सामुहिक हत्या करायची आहे, मात्र आम्ही हे होऊ देणार नाही,' असा आरोप केजरीवालांनी केला होता.

भाजप-काँग्रेसचा आपवर पलटवार

अरविंद केजरीवाल यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आणि काँग्रेसने तिखट प्रतिक्रिया दिल्या होत्या. या दोन्ही पक्षांनी केजरीवालांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यानंतर निवडणूक आयोगाने अरविंद केजरीवाल यांना नोटीस बजावली आणि पुरावे सादर करण्यास सांगितले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपाcongressकाँग्रेस