शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

सत्ता टिकवायची असेल तर सेंगोटेयन यांना बनवा मुख्यमंत्री, बंडखोर आमदारांची अट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 17:14 IST

पलानीस्वामी आण पनीरसेल्वम यांच्यात समेट झाल्यानंतर अण्णा द्रमुक पक्षात पुन्हा फूट पडली आहे. दिनकरन यांच्या समर्थक आमदारांनी बंडाचा झेंडा रोवल्यानंतर आता या आमदारांनी राज्यातील सरकार टिकवायचे असेल तर सेंगोटेयन यांना मुख्यमंत्री बनवा अशी मागणी केली आहे.

चेन्नई, दि. 23 - पलानीस्वामी आण पनीरसेल्वम यांच्यात समेट झाल्यानंतर अण्णा द्रमुक पक्षात पुन्हा फूट पडली आहे. दिनकरन यांच्या समर्थक आमदारांनी बंडाचा झेंडा रोवल्यानंतर आता या आमदारांनी राज्यातील सरकार टिकवायचे असेल तर सेंगोटेयन यांना मुख्यमंत्री बनवा अशी मागणी केली आहे. या बंडाचे नेतृत्व करत असलेले दिनकरन सध्या दुहेरी डिप्लोमसीवर काम करत आहेत. एकीकडे ते पलानीस्वामी यांचे सरकार पाडण्यासाठी डीएमकेच्या नेतृत्वाच्या संपर्कात आहेत तर दुसरीकडे सरकार टिकवायचे असेल तर आमच्या पसंतीचा मुख्यमंत्री बनवा अशी अट त्यांनी अण्णा द्रमुकला घातली आहे. दिनकरन यांच्या या डबल गेममुळे अण्णा द्रमुकमधील नेत्यांची झोप उडाली आहे. तर डीएमकेही संभ्रमित झाली आहे. दिनकरन यांनी के. ए. सेंगोटेयन यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी सूचवले आहे. मात्र दिनकरन यांच्या या प्रस्तावाला सत्ताधारी अण्णा द्रमुकने अद्याप फार महत्त्व दिलेले नाही. यासंदर्भात पलानीस्वामी गटाच्या एका नेत्याने सांगितले की, मुख्यमंत्री बदलल्यास आपण पाठिंबा देण्यास तयार आहोत, असे दिनकरन यांच्या गटाकडून सांगण्यात आले आहे. मात्र नेतृत्वात कोणताही बदल होणार नसल्याचे आम्ही स्पष्ट केले आहे.   एकीकडे सेंगोटेयन यांचे नाव दिनकरन यांच्याकडून पुढे करण्यात येत असतानाच शशिकला यांचे भाऊ व्ही. के. दिवाकरन यांनी विधानसभा अध्यक्ष पी. धनपाल यांना मुख्यमंत्री करण्यात यावे अशी मागणी केली आहे.  अण्णा द्रमुकच्या बंडखोर आमदारांना राज्यपालांना एक पत्र लिहिले असून, आम्ही पाठिंबा काढून घेत आहोत. मात्र अण्णा द्रमुकचे सरकार पाडण्याची आमची इच्छा नाही. असे म्हटले होते. त्यावरून केवळ मुख्यमंत्री बदलणे हाच त्यांचा प्रयत्न असून. सरकार पाडण्याचा त्यांचा इरादा नसल्याचे स्पष्ट होत आहे.   माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूच्या राजकारणात निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतचे रोज नवनवे अंक सादर होत आहेत. माजी मुख्यमंत्री पनिरसेल्वम आणि मुख्यमंत्री पलानीस्वामी यांचे गट  एकत्र आल्यानंतर आता दिनकरन यांचे समर्थक असलेल्या 19 आमदारांनी पलानीस्वामी सरकारला असलेला पाठिंबा काढून घेतला आहे. तसेच या आमदारांच्या गटामधील संभाव्य फूट टाळण्यासाठी त्यांना पुदुच्चेरीमधील रिसॉर्टवर पाठवण्यात आले आहे.  दरम्यान, 19 आमदारांनी पाठिंबा मागे घेतल्याने 234 सदस्य असलेल्या तामिळनाडू विधानसभेत पलानीस्वामी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे.  सध्या एआएडीएमकेच्या सगळ्या गटांचे मिळून 135 आमदार आहेत. मात्र संभाव्य फोडाफोडीमुळे पलानीस्वामी यांची खुर्ची डळमळीत झाली आहे.  

टॅग्स :Indiaभारत