शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या! रेल्वेत आता जास्तीचे सामान न्याल तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 21:07 IST

प्रवास करताना किती सामान सोबत बाळगावे, याबाबत भारतीय रेल्वेने मर्यादा घालून दिली आहे

रत्नागिरी : रेल्वेने प्रवास करीत असताना सामान बाळगण्यासाठी आता विमानाप्रमाणे मर्यादा घालून देण्यात आली आहे. सोबत जास्त सामान न्यायचे असल्यास त्याचे शुल्क भरून रितसर पावती घ्यावी लागते. अन्यथा जादा सामान बाळगल्याचे निदर्शनास आल्यास सहापट दंड आकारण्यात येतो.

प्रवास करताना किती सामान सोबत बाळगावे, याबाबत भारतीय रेल्वेने मर्यादा घालून दिली आहे. त्यानुसार वेगवेगळ्या श्रेणीसाठी मर्यादा घालून देण्यात आल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ट्रीट करून, लोकांना प्रवासादरम्यान जास्त सामान घेऊन प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. सामानविषयक नियमांची रेल्वे विभागाकडून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

जास्तीच्या सामानासाठी...

विविध श्रेणीच्या डब्यातून प्रवास करताना किती सामान सोबत न्यावे, याबाबत रेल्वे मंत्रालयाने मर्यादा निश्चित केल्या आहेत.

निश्चित केलेल्या वजनापेक्षा अधिक वजन असेल आणि त्याचे शुल्क न भरल्यास सहा पट दंड भरावा लागणार आहे.

वजनानुसार शुल्क

रेल्वेतून प्रवास करताना सामानाची मर्यादा घालून देण्यात आली आहे, ती पूर्वीपासूनच आहे. विविध श्रेणीतील डब्यांसाठी सामानाचे वजन निश्चित करण्यात आले असून त्यानुसार शुल्क भरावे लागते - गिरीश करंदीकर, उप महाव्यवस्थापक, कोकण रेल्वे

४० किलो स्लीपर क्लाससाठी...

रेल्वेचा प्रवास स्लीपरमधून करताना ४० किलोपर्यंत सामान सोबत नेता येईल. अधिक सामानाकरिता निश्चित केलेले शुल्क भरावे लागेल. तशी पावती सोबत ठेवावी लागेल.

५० किलो टू टायर एसीसाठी

टू टायर एसीमधून प्रवास करताना जास्तीत जास्त ५० किलो इतके सामान आपल्यासोबत नेता येईल. अधिक सामानासाठी जादा सामानाचे शुल्क भरावे लागते.

७० किलो फर्स्ट क्लास एसीसाठी

फर्स्ट क्लास एसीमधून प्रवास करतानाही सामानाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार या श्रेणीच्या डब्यातून प्रवास करताना ७० किलो वजनाचे सामान सोबत नेता येते.

...अन्यथा भरावा लागेल दंड

विविध श्रेणीच्या डब्यातून प्रवास करताना किती सामान सोबत न्यावे, याबाबत रेल्वे मंत्रालयाने मर्यादा निश्चित केल्या आहेत.

निश्चित केलेल्या वजनापेक्षा अधिक वजन असेल आणि त्याचे शुल्क न भरल्यास सहा पट दंड भरावा लागणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वे