आरक्षण न दिल्यास हिंदू धर्माचा त्याग करणार
By Admin | Updated: April 26, 2016 00:16 IST2016-04-26T00:16:33+5:302016-04-26T00:16:33+5:30
इशारा : बाबासाहेब गोपले यांची पत्रकार परिषद

आरक्षण न दिल्यास हिंदू धर्माचा त्याग करणार
इ ारा : बाबासाहेब गोपले यांची पत्रकार परिषदऔरंगाबाद : आरक्षणापासून मातंग समाज वंचित असून, १०० टक्के अनुशेष भरून काढण्यासाठी ८ टक्के स्वतंत्र आरक्षण द्यावे, अन्यथा हिंदू धर्माचा त्याग सबंध मातंग समाज करणार आहे, असा इशारा अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडीचे नेते बाबासाहेब गोपले यांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराज, लहुजी साळवे, म. फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांचा वारसा असणार्या महाराष्ट्रात अनुसूचित जातीत मातंग समाज सर्वात मोठा घटक आहे; परंतु देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाल्यानंतरही मातंग समाजाच्या अंगणात आरक्षणाची सावली फिरकली नाही. ८ टक्के आरक्षण क्रांतीयात्रा २१ एप्रिल रोजी मुंबईहून निघाली असून, २६ एप्रिल रोजी मांगीरबाबा यात्रा शेंद्रा येथे राज्यव्यापी मातंग समाज मेळाव्यात रूपांतरित होणार आहे. तत्पूर्वी औरंगाबादेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, हिंदू धर्मात राहून हजारो वर्षे अन्यायच होत आलेला आहे. आता विचार करावा लागणार असून, जनआंदोलन पेटविले जाणार आहे. शेंद्रा येथील राज्य मेळाव्यात मातंगवीर भक्तांनी पिवळे वस्त्र परिधान करून सहभागी व्हावे. तेथे दिशा ठरविली जाणार आहे. यावेळी कुसुम गोपले, दशरथ मानवतकर, पवन मुर्शदपुरे, पंडित गाढे, रतन शोन्जर, जितेंद्र गालफाडे, रामभाऊ लोखंडे आदींची उपस्थिती होती. परिस्थितीनुसार बदला... डॉक्टर, इंजिनिअर, आयएस अधिकारी व्हावे, असे नवस बोला. समाज परिवर्तन होणे गरजेचे आहे. काखेत लेकरू हातात बकरू ही प्रथा आता बंद करा. पुरणपोळीच्या प्रसादाने नवस फेडा, कर्जबाजारी होऊन सण, यात्रा साजरी करणे किंवा नवस फेडणे बंद करावे, असेही आवाहन करण्यात आले.