शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
6
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
7
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
8
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
9
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
10
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
11
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
12
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
13
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
14
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
15
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
16
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
17
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
18
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
19
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
20
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई

'भाजपासोबत समझोता केला असता तर आज मुख्यमंत्री असतो'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 17:09 IST

'2016 मध्ये भाजपाने जदयूच्याआधी राजदला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले होते.'

पटना : बिहार मध्ये 2016 साली भाजपासोबत समझोता केला असता तर आज बिहारचा मुख्यमंत्री असतो आणि सुशील कुमार मोदी आमच्यासोबत सध्या ज्या पदावर आहेत, त्याच पदावर विराजमान असते. मात्र, आम्ही कधीही धोरण आणि तत्त्वांशी समझोता केला नाही आणि करणारही नाही, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी सांगितले. बिहार विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनचा आजचा दुसरा दिवस आहे. यावेळी तेजस्वी यादव यांनी पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी ते बोलत होते. 

2016 मध्ये भाजपाने जदयूच्याआधी राजदला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले होते. त्यावेळी जर राजदने तत्त्वांशी समझोता केला असता तर बिहारमधील राजकीय समीकरण वेगळेच असते, असे तेजस्वी यादव म्हणाले. तसेच, राजद व भाजपाचे सरकार बनावे आणि मुख्यमंत्रीपद राजदच्या कोणताही नेत्याला द्यावे, अशी भाजपाकडून ऑफर देण्यात आली होती. तसेच, या ऑफरमध्ये उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना बनवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, धोरण आणि तत्वांवर चालणाऱ्या राजदने ही ऑफर धुडकावली, असे तेजस्वी यादव यांनी सांगितले. 

याचबरोबर, जे लोक सत्तेसाठी उत्सुक होते, त्यांनी धोरण आणि तत्व बाजूला सारून बिहारमध्ये सरकार स्थापन केले. महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती बिहारसारखीच आहे. हे सर्वांना माहीत आहे. आम्ही कधीही धोरण आणि तत्त्वांशी समझोता केला नाही, असे तेजस्वी यादव यांनी सांगितले. याशिवाय, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर तेजस्वी यादव यांनी हल्लाबोल केला. बिहारच्या वाईट स्थितीला नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी पूर्णपणे जबाबदार आहेत, असेही तेजस्वी यादव यांनी सांगितले.  

टॅग्स :BJPभाजपाBiharबिहारNitish Kumarनितीश कुमार