शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

'भाजपासोबत समझोता केला असता तर आज मुख्यमंत्री असतो'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 17:09 IST

'2016 मध्ये भाजपाने जदयूच्याआधी राजदला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले होते.'

पटना : बिहार मध्ये 2016 साली भाजपासोबत समझोता केला असता तर आज बिहारचा मुख्यमंत्री असतो आणि सुशील कुमार मोदी आमच्यासोबत सध्या ज्या पदावर आहेत, त्याच पदावर विराजमान असते. मात्र, आम्ही कधीही धोरण आणि तत्त्वांशी समझोता केला नाही आणि करणारही नाही, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी सांगितले. बिहार विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनचा आजचा दुसरा दिवस आहे. यावेळी तेजस्वी यादव यांनी पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी ते बोलत होते. 

2016 मध्ये भाजपाने जदयूच्याआधी राजदला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले होते. त्यावेळी जर राजदने तत्त्वांशी समझोता केला असता तर बिहारमधील राजकीय समीकरण वेगळेच असते, असे तेजस्वी यादव म्हणाले. तसेच, राजद व भाजपाचे सरकार बनावे आणि मुख्यमंत्रीपद राजदच्या कोणताही नेत्याला द्यावे, अशी भाजपाकडून ऑफर देण्यात आली होती. तसेच, या ऑफरमध्ये उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना बनवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, धोरण आणि तत्वांवर चालणाऱ्या राजदने ही ऑफर धुडकावली, असे तेजस्वी यादव यांनी सांगितले. 

याचबरोबर, जे लोक सत्तेसाठी उत्सुक होते, त्यांनी धोरण आणि तत्व बाजूला सारून बिहारमध्ये सरकार स्थापन केले. महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती बिहारसारखीच आहे. हे सर्वांना माहीत आहे. आम्ही कधीही धोरण आणि तत्त्वांशी समझोता केला नाही, असे तेजस्वी यादव यांनी सांगितले. याशिवाय, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर तेजस्वी यादव यांनी हल्लाबोल केला. बिहारच्या वाईट स्थितीला नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी पूर्णपणे जबाबदार आहेत, असेही तेजस्वी यादव यांनी सांगितले.  

टॅग्स :BJPभाजपाBiharबिहारNitish Kumarनितीश कुमार