शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

'भाजपासोबत समझोता केला असता तर आज मुख्यमंत्री असतो'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 17:09 IST

'2016 मध्ये भाजपाने जदयूच्याआधी राजदला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले होते.'

पटना : बिहार मध्ये 2016 साली भाजपासोबत समझोता केला असता तर आज बिहारचा मुख्यमंत्री असतो आणि सुशील कुमार मोदी आमच्यासोबत सध्या ज्या पदावर आहेत, त्याच पदावर विराजमान असते. मात्र, आम्ही कधीही धोरण आणि तत्त्वांशी समझोता केला नाही आणि करणारही नाही, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी सांगितले. बिहार विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनचा आजचा दुसरा दिवस आहे. यावेळी तेजस्वी यादव यांनी पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी ते बोलत होते. 

2016 मध्ये भाजपाने जदयूच्याआधी राजदला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले होते. त्यावेळी जर राजदने तत्त्वांशी समझोता केला असता तर बिहारमधील राजकीय समीकरण वेगळेच असते, असे तेजस्वी यादव म्हणाले. तसेच, राजद व भाजपाचे सरकार बनावे आणि मुख्यमंत्रीपद राजदच्या कोणताही नेत्याला द्यावे, अशी भाजपाकडून ऑफर देण्यात आली होती. तसेच, या ऑफरमध्ये उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना बनवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, धोरण आणि तत्वांवर चालणाऱ्या राजदने ही ऑफर धुडकावली, असे तेजस्वी यादव यांनी सांगितले. 

याचबरोबर, जे लोक सत्तेसाठी उत्सुक होते, त्यांनी धोरण आणि तत्व बाजूला सारून बिहारमध्ये सरकार स्थापन केले. महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती बिहारसारखीच आहे. हे सर्वांना माहीत आहे. आम्ही कधीही धोरण आणि तत्त्वांशी समझोता केला नाही, असे तेजस्वी यादव यांनी सांगितले. याशिवाय, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर तेजस्वी यादव यांनी हल्लाबोल केला. बिहारच्या वाईट स्थितीला नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी पूर्णपणे जबाबदार आहेत, असेही तेजस्वी यादव यांनी सांगितले.  

टॅग्स :BJPभाजपाBiharबिहारNitish Kumarनितीश कुमार