शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
16
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
17
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
18
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
19
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
20
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'

पटेलांचा पुतळा उभारता येतो, मग राम मंदिरासाठी कायदा का करता येत नाही?- संघ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 17:00 IST

राम मंदिराच्या मुद्यावरुन संघ आक्रमक

मुंबई: वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारला जाऊ शकतो, मग राम मंदिरासाठी कायदा का केला जाऊ शकत नाही?, असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून विचारण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सभेत संघाचे सह-सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी हा प्रश्न विचारला. गेल्या काही दिवसांपासून राम मंदिरासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद यांच्यासह अनेक हिंदुत्त्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या तटावर सरदार पटेल यांचा पुतळा उभारला जाऊ शकतो, तर मग भव्य राम मंदिरासाठी कायदा संमत का केला जात नाही?, असा प्रश्न होसबळे यांनी सभेला संबोधित करताना विचारला. याआधी संघाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनीही हाच मुद्दा उपस्थित केला होता. अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्यासाठी कायदा करण्याची मागणी भागवत यांनी केली होती. आता होसबळे यांनी संघाच्या याच भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. दत्तात्रय होसबळे यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करताना पी. व्ही. नरसिंह राव यांच्या विधानाचा संदर्भ दिला. 'वादग्रस्त जमिनीखाली मंदिराचे अवशेष सापडल्यास ती जमीन मंदिराच्या उभारणीसाठी दिली जाईल, अशी माहिती पी. व्ही. नरसिंह राव यांनी पंतप्रधान असताना सर्वोच्च न्यायालयाला दिली होती. त्यानंतर उत्खननात मंदिराचे अवशेषदेखील सापडले. मात्र आता या प्रकरणी निकाल देण्यास न्यायालय टाळाटाळ करत आहे. या सुनावणीला प्राधान्य द्यावं, असं न्यायालयाला वाटत नाही. यासाठी सर्वोच्च न्यायालयानं स्वतंत्र घटनापीठाची स्थापना केली आहे. मात्र प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या प्रकरणावर अद्याप कोणताही निर्णय आलेला नाही,' असं म्हणत होसबळे यांनी न्यायालयाकडून होणाऱ्या विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदीAyodhyaअयोध्याBJPभाजपा