शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

...तर कितीतरी मजूर भुकेने मेले असते! पंतप्रधानांच्या विधानावर अभिनेता सोनू सूद यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 06:49 IST

"कोरोना एका राज्याचा नव्हता, पूर्ण देशालाच कोरोनाने घेरलेले होते. तो महाराष्ट्रातून पसरला असे कसे म्हणता असा सवालही सोनू सूद यांनी केला."

यदु जोशी -मोगा (पंजाब) : कोरोनाच्या पहिल्या भीषण टप्प्यात मुंबईतील हजारो उत्तर प्रदेश, बिहारसह परप्रांतीय मजुरांना वेळीच त्यांच्या राज्यांमध्ये पाठविले नसते तर शेकडो जणांचा भुकेने  मृत्यू झाला असता, असे रोखठोक मत अभिनेते सोनू सोदू यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. कोरोना एका राज्याचा नव्हता, पूर्ण देशालाच कोरोनाने घेरलेले होते. तो महाराष्ट्रातून पसरला असे कसे म्हणता असा सवालही सोनू सूद यांनी केला.

सोनू यांच्या भगिनी मालविका सूद काँग्रेसतर्फे लढताहेत. मालविका यांना ‘मोगाच्या सोनू सूद’ म्हटले जाते. इथे त्यांचे अतिशय मोठे सामाजिक कार्य आहे. पंतप्रधानांच्या वक्तव्याबाबत सोनू सूद म्हणाले की, मला कुणाच्या विधानावर टीका करायची नाही. मजूर तेव्हा असहाय होते. रात्रीबेरात्री मला फोन करायचे. रडायचे. त्यांचा आक्रोश बघवत नव्हता. चारपाच महिन्याची बाळे घेऊन महिला यायच्या, आम्हाला गावी जाऊ द्या अशी विनवणी करायच्या. भयंकर स्थिती होती. तीन हजार लोकांना स्थलांतरित करण्याची परवानगी मिळाली तर सहा-सहा हजार लोक येऊन उभे राहायचे. त्यांना तेव्हा पाठविले नसते तर ते अन् त्यांची मुलं रस्त्यावर मरून पडली असती. 

मजुरांच्या वेदना सांगताना ते म्हणाले की, त्यांच्याकडे खायला पैसे नव्हते, घरभाड्यासाठी पैसे नव्हते. मग प्रवासासाठी कुठून पैसे येतील? त्यांना त्यांच्या माणसांजवळ परत पाठविणे हे भावनिकदृष्ट्याही त्यांना मोठा धीर देणारे ठरले. कोरोना पसरवायला ते गेले असे नाही म्हणता येणार. ते संकट इतके भीषण होते की त्या धक्क्यातून लोक आजही सावरलेले नाहीत.

मंत्रिपदाच्या ऑफर नाकारल्या -राजकारणात जाणारच नाही असे अजिबात नाही पण ती वेळ अजून आलेली नाही. अजून काही वर्षे मी सामाजिक कार्यच करणार. मुंबईनजीक हॉस्पिटल उभारतो आहे. आणखी बरेच काही करायचे आहे. यावेळी अगदी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वा कॅबिनेट मंत्रिपदाच्या ऑफर वेगवेगळ्या पक्षांकडून आल्या पण मी त्या नम्रपणे नाकारल्या.

टॅग्स :Sonu Soodसोनू सूदNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस