शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

हिंदू एकवटले नाही तर शहरं पाकिस्तानसारखी होतील, भाजपा आमदाराचं वादग्रस्त विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 14:04 IST

भाजपामधील काही नेतेमंडळी अनेकदा बेताल विधान करुन नवनवीन वाद निर्माण करताना दिसतात. भाजपाच्या वाचाळवीर नेत्यांच्या यादीतील उदयपूरमधील भाजपाचे आमदार गुलाब चंद कटारिया यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे.

ठळक मुद्देBJP MLA गुलाब चंद कटारिया यांचे वादग्रस्त विधान हिंदू एकवटले नाहीतर शहरांचं पाकिस्तानमध्ये रुपांतर होईल - कटारिया

जयपूर - भाजपामधील काही नेतेमंडळी अनेकदा बेताल विधान करुन नवनवीन वादांना आयते निमंत्रण देतात. भाजपाच्या वाचाळवीर नेत्यांच्या यादीतील उदयपूरमधील भाजपाचे आमदार गुलाब चंद कटारिया यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. 'जर हिंदू एकत्र आले नाहीत तर राजस्थानमधील कित्येक शहरांचे पाकिस्तानमध्ये रुपांतर होईल', असे वादग्रस्त विधान गुलाब चंद कटारिया यांनी केले आहे. कटारिया यांच्या विधानामुळे नवीन वादाला फोडणी मिळू शकते. 

उदयपूर येथील वल्लभ नगर ब्लॉकमधील एका गावामध्ये नवीन वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात संबोधित करताना गुलाब चंद कटारिया यांनी हे विवादित विधान केले आहे. याप्रकरणी कटारिया यांच्यावर चौफेर टीकास्त्र सोडले जात आहे. कटारिया यांच्या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

गुलाब चंद कटारिया यांचं वादग्रस्त विधान  'जर हिंदू एकवटले नाहीत तर राजस्थानमधील कित्येक शहरांचे पाकिस्तानमध्ये रुपांतर होईल. संधी मिळाल्यास जुन्या जयपूरला भेट द्या. या परिसरातील मंदिरांमध्ये असणाऱ्या मूर्तींच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले आहेत, कारण येथील मंदिरातील मूर्तींची सेवा होत नाही. कोणत्याही धार्मिक रीतिरिवाजांचे येथे पालन होऊ शकत नाही, कारण येथील लोक मंदिर परिसरात मांस-हाडे फेकतात. या लोकांसोबत प्रत्येक दिवशी कोण वाद घालत बसेल?'

'पंक्चरवाल्यांसोबत पळून जात आहेत मुली'

गुलाब चंद कटारिया येथेच थांबले नाहीत. ते पुढे असंही म्हणाले की, ''आता लोकांना कुटुंब आणि तरुण मुलींचा बचाव करण्यासाठी घर सोडून जाव लागत आहे. तुम्हाला माहितीय लव्ह जिहाद काय आहे?. तुमच्या मुली पंक्चरवाल्यांसोबत पळून जात आहेत. त्यामुळे जर तुम्ही चुका करत असाल तर यातून वाचण्याचा कोणताही मार्ग नाही. यावर तुम्ही केवळ रडू शकता. धोका लक्षात घेऊन हिदूंनी आपल्या संपूर्ण ताकदीनिशी एकत्र यायला हवं. आपण सर्व रामाचे पुत्र आहोत, जाती आणि धर्म विसरुन जा. रामच आपला धर्म आणि जात आहे. आपण जेव्हा मरतो, तेव्हाही 'राम-राम' म्हणतो. एकमेकांना भेटतो तेव्हाही 'राम-राम' याच शब्दाचा उपयोग करतो'', अशी वादग्रस्त विधानांची मालिकाच कटारिया यांनी सभेत सुरू ठेवली होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपाच्या वाचाळवीर नेत्यांना चांगलंच फटकारलं होतं. भाजपाच्या काही नेत्यांनी कमी बोलण्याची गरज आहे, असं नितीन गडकरी म्हणाले होते. भाजपाच्या नेत्यांनी मीडियाला सामोरं जाताना कमी बोललं पाहिजे.  आमच्याजवळ भरपूर नेते आहेत आणि त्यातील काहींना पत्रकारांशी बोलण्यास फार आवडते. त्यामुळेच आम्हाला त्या उत्साही नेत्यांना दुसरं काम देण्याची आवश्यकता आहे, असंही गडकरी यांनी सांगितलं आहे.

टॅग्स :BJPभाजपाMuslimमुस्लीमPakistanपाकिस्तानLove Jihadलव्ह जिहाद