शहरं
Join us  
Trending Stories
1
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
2
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
3
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
4
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
5
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
6
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
7
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
8
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
9
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
10
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
11
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
12
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
13
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
14
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
15
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
16
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
17
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं
18
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
19
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
20
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला

हिंमत असेल तर मोदींनी सर्वांसमक्ष चर्चा करावी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 7:50 AM

ममतांचे आव्हान; भाजपला बहुमत अशक्यच

विशाखापट्टणम : हिंमत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए सरकारच्या कामगिरीबाबत विरोधकांशी खुलेआम चर्चा करावी, असे आव्हान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले आहे. लोकसभा निवडणुकांत भाजपला १२५ पेक्षा जास्त जागा व बहुमत मिळणार नाही, असेही भाकीत त्यांनी वर्तविले.

तेलुगू देसम पार्टीने येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, २०१४च्या निवडणुकीत दक्षिण भारतात भाजपने २१ जागा जिंकल्या होत्या. त्यातील १७ जागा कर्नाटकातील होत्या. आगामी लोकसभा निवडणुकांत एवढ्याही जागा भाजपला जिंकता येणे अशक्य आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपचा धुव्वा उडाला आहे. गुजरातमध्येही या पक्षाला लोकसभेच्या पूर्वीसारखा विजय मिळणार नाही. उत्तर प्रदेशात २०१४ साली भाजपविरोधी मतांत विभागणी झाल्याने त्या पक्षाला ८० पैकी ७३ जागा जिंकता आल्या होत्या. मात्र, यावेळी भाजपला त्या राज्यात १५ हून जास्त जागा मिळणे अवघड आहे. एनडीए सरकारने पाच वर्षांत केलेल्या कामगिरीवर मोदींची खुलेआम चर्चा करण्याची तयारी असल्यास विरोधकांकडून आम्ही एक प्रतिनिधी पाठवू. तो कोणत्याही कागदपत्रांचा आधार न घेतामोदींना प्रश्न विचारेल. मोदींनीही कोणती कागदपत्रे न चाळताकिंवा टेलिप्रॉम्पटरची मदत न घेता उत्तरे द्यावीत, अशी उपरोधिक टीकाही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. (वृत्तसंस्था)‘सैन्याचा अवमान’भारतीय सैन्याला मोदींची सेना म्हणणाऱ्या योगी आदित्यनाथांनी संरक्षण दलांचा अवमान केला आहे अशी खरमरीत टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे. त्या म्हणाल्या की, भारतीय सैन्य भाजपच्या मालकीचे नसून ते साऱ्या देशाचे आहे. देशाच्या संरक्षण दलांबद्दल आम्हाला रास्त अभिमान आहे. प्रत्येक नागरिकाने योगी आदित्यनाथ यांच्या विधानांचा निषेध केला पाहिजे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा