शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

"वक्फ विधेयक मंजूर झालं तर...", प्रशांत किशोर यांचं मुस्लीम नेत्यांना मोठं आवाहन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 17:01 IST

जेडीयूवर निशाणा साधताना प्रशांत किशोर म्हणाले, "जर हे विधेयक संसदेत मंजूर झाले, तर याला भाजपपेक्षाही नितीश कुमारांचा पक्षच अधिक जबाबदार असेल."

लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरू असतानाच बिहारमधील राजकारण तापले आहे. जन सूरज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाला (जेडीयू) या विधेयकाला पाठिंबा न देण्याचे आवाहन केले. तसेच, हे विधेयक संसदेत मंजूर झाल्यास, जेडीयूच्या मुस्लीम नेत्यांनी नितीश कुमारांची साथ सोडायला हवी. कारण २०१५ मध्ये नितीश कुमार मुसलमांमुळेच बिहारची निवडणूक जिंकून मुख्यमंत्री झाले होते, असे आवाहनही प्रशांत किशोर यांनी केले आहे. एवढेच नाही तर, मुस्लीम नसते तर नितीश यांचे राजकारण संपले असते, असा दावाही त्यांनी यावेळी केला. ते बुधवारी माध्यमांशी बोलत होते.जेडीयूवर निशाणा साधताना प्रशांत किशोर म्हणाले, "जर हे विधेयक संसदेत मंजूर झाले, तर याला भाजपपेक्षाही नितीश कुमारांचा पक्षच अधिक जबाबदार असेल. नितीश कुमार यांच्या खासदारांनी सभागृहात या विधेयकाच्या बाजूने मतदान करू नये. याच बरोबर, जेडीयूच्या मुस्लीम नेत्यांनीही आपल्या खासदारांना वक्फ विधेयकाविरोधात मतदान करण्याचे आवाहन करायला हवे, असेही ते म्हणाले.

पीके म्हणाले, "आपला जन सूरज पक्ष वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात आहे. या विधेयकाचा मुस्लिमांवर थेट परिणाम होतो. सरकारने मुस्लीम समाजाला विश्वासात न घेता वक्फ कायदा बनवणे चुकीचे ठरेल. संविधानात अल्पसंख्याकांना दिलेल्या अधिकारांमध्ये, त्या समाजाच्या सहमतीशिवाय, कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करणे योग्य नाही."

२०१५ मध्ये मुस्लीम समाजाने आपल्याला मुख्यमंत्री बनवण्यासाठी महाआघाडीला मतदान केले होते, अशी आठवणही प्रशांत किशोर यांनी यावेळी नितीश कुमार यांना करून दिली. एवढेच नाही तर, आज, वक्फ विधेयकाला पाठिंबा देऊन, नितीश आणि जेडीयू मुस्लीम समुदायाला दिलेले वचन मोडत आहेत, असेही प्रशांत किशोर म्हणाले.

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डPrashant Kishoreप्रशांत किशोरBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमारMuslimमुस्लीम