शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
3
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
4
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
5
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
6
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
7
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
8
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
9
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
10
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
11
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
12
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
13
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
14
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
15
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
16
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?
17
“शेतकरी कर्जमाफी फाइलवर सही करण्यास फडणवीस-शिंदे-पवारांच्या हाताला लकवा मारला आहे का?”: सपकाळ
18
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
19
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
20
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स

"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 16:08 IST

Constitution 130th Amendment Bill: केंद्र सरकारच्या प्रस्तावित १३०व्या घटना दुरुस्ती विधेयकावर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी यांनी भाष्य केले. हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवले गेले असून, मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. 

"पंतप्रधान म्हणून २०१४ पासून माझे सेवा कार्य निरंतर सुरू आहे. इतक्या वर्षांमध्ये माझ्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागलेला नाही", असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रस्तावित भ्रष्टाचार विरोधी विधेयकाचे समर्थन केले. पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा काँग्रेसला घेरले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पंतप्रधान मोदी यांची गयामध्ये जाहीर सभा झाली. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे सुरू असताना मोदींनी काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीवर हल्ला चढवला.  

 काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची मोठी यादी

पंतप्रधान मोदी म्हणाले, "2014 पासून मी पंतप्रधान आहे. इतक्या वर्षांपासून माझे सरकार आहे. पण, भ्रष्टाचाराचा एकही डाग माझ्या सरकारवर लागलेला नाही. ६५ वर्षे सरकारमध्ये राहिलेल्या काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची एक मोठी यादी आहे. राजदचा भ्रष्टाचार तर लहान मुलांनाही माहिती आहे", असा हल्ला मोदींनी काँग्रेसवर केला. 

"माझं मत असे आहे की, जर भ्रष्टाचाराविरोधातील लढाई शेवटाला न्यायची असेल, तर कोणीही कारवाईच्या कक्षेतून बाहेर राहता कामा नये. जर सरकार कर्मचारी ५० तास अटकेत राहिला तर आपोआप तो निलंबित होतो, असा कायदा आहे. त्याचे आयुष्य नेहमीसाठी उद्ध्वस्त होते", असे मोदी म्हणाले. 

"तुरूंगात राहुनही सत्तेचे सुख"

मोदी म्हणाले, "कोणी मुख्यमंत्री आहेत, कोणी मंत्री आहेत, कोणी पंतप्रधान आहेत, जे तुरुंगात राहिले आणि सत्तेचे सुख मिळवत राहिले. असे कसे होऊ शकते? असे असेल, तर भ्रष्टाचार कसा संपणार?", असा सवाल मोदींनी उपस्थित केला. 

"राज्य घटना प्रत्येक लोक प्रतिनिधीकडून प्रामाणिकपणा आणि पारदर्शकेतची अपेक्षा ठेवते. आम्ही संविधानाच्या मर्यादेचे असे उल्लंघन होताना बघू शकत नाही. त्यामुळे एनडीए सरकारने भ्रष्टाचार विरोधात असा कायदा आणला आहे, ज्याच्या कक्षेत देशाचा पंतप्रधानही आहे", असे मोदी म्हणाले.

"कुणीही असो, 31व्या दिवशी खुर्ची सोडावी लागेल"  

बिहारमधील सभेत पंतप्रधान मोदी म्हणाले, "जेव्हा हा कायदा अस्तित्वात येईल, तेव्हा मुख्यमंत्री असो, कोणी मंत्री असो... अटक झाल्यानंतर ३० दिवसाच्या आत त्याला जामीन घ्यावा लागेल. जामीन मिळाला नाही, तर ३१ व्या दिवशी खुर्ची सोडावी लागेल."

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCorruptionभ्रष्टाचारBJPभाजपाprime ministerपंतप्रधानcongressकाँग्रेसBiharबिहार