शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 16:08 IST

Constitution 130th Amendment Bill: केंद्र सरकारच्या प्रस्तावित १३०व्या घटना दुरुस्ती विधेयकावर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी यांनी भाष्य केले. हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवले गेले असून, मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. 

"पंतप्रधान म्हणून २०१४ पासून माझे सेवा कार्य निरंतर सुरू आहे. इतक्या वर्षांमध्ये माझ्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागलेला नाही", असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रस्तावित भ्रष्टाचार विरोधी विधेयकाचे समर्थन केले. पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा काँग्रेसला घेरले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पंतप्रधान मोदी यांची गयामध्ये जाहीर सभा झाली. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे सुरू असताना मोदींनी काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीवर हल्ला चढवला.  

 काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची मोठी यादी

पंतप्रधान मोदी म्हणाले, "2014 पासून मी पंतप्रधान आहे. इतक्या वर्षांपासून माझे सरकार आहे. पण, भ्रष्टाचाराचा एकही डाग माझ्या सरकारवर लागलेला नाही. ६५ वर्षे सरकारमध्ये राहिलेल्या काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची एक मोठी यादी आहे. राजदचा भ्रष्टाचार तर लहान मुलांनाही माहिती आहे", असा हल्ला मोदींनी काँग्रेसवर केला. 

"माझं मत असे आहे की, जर भ्रष्टाचाराविरोधातील लढाई शेवटाला न्यायची असेल, तर कोणीही कारवाईच्या कक्षेतून बाहेर राहता कामा नये. जर सरकार कर्मचारी ५० तास अटकेत राहिला तर आपोआप तो निलंबित होतो, असा कायदा आहे. त्याचे आयुष्य नेहमीसाठी उद्ध्वस्त होते", असे मोदी म्हणाले. 

"तुरूंगात राहुनही सत्तेचे सुख"

मोदी म्हणाले, "कोणी मुख्यमंत्री आहेत, कोणी मंत्री आहेत, कोणी पंतप्रधान आहेत, जे तुरुंगात राहिले आणि सत्तेचे सुख मिळवत राहिले. असे कसे होऊ शकते? असे असेल, तर भ्रष्टाचार कसा संपणार?", असा सवाल मोदींनी उपस्थित केला. 

"राज्य घटना प्रत्येक लोक प्रतिनिधीकडून प्रामाणिकपणा आणि पारदर्शकेतची अपेक्षा ठेवते. आम्ही संविधानाच्या मर्यादेचे असे उल्लंघन होताना बघू शकत नाही. त्यामुळे एनडीए सरकारने भ्रष्टाचार विरोधात असा कायदा आणला आहे, ज्याच्या कक्षेत देशाचा पंतप्रधानही आहे", असे मोदी म्हणाले.

"कुणीही असो, 31व्या दिवशी खुर्ची सोडावी लागेल"  

बिहारमधील सभेत पंतप्रधान मोदी म्हणाले, "जेव्हा हा कायदा अस्तित्वात येईल, तेव्हा मुख्यमंत्री असो, कोणी मंत्री असो... अटक झाल्यानंतर ३० दिवसाच्या आत त्याला जामीन घ्यावा लागेल. जामीन मिळाला नाही, तर ३१ व्या दिवशी खुर्ची सोडावी लागेल."

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCorruptionभ्रष्टाचारBJPभाजपाprime ministerपंतप्रधानcongressकाँग्रेसBiharबिहार