शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य, तर ३६ मंत्री तिकडे का पाठवता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 08:34 IST

काँग्रेसने विचारला प्रश्न; १८ ते २४ दरम्यान होणार दौरा

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमध्ये जर सगळे काही ‘सामान्य’ आहे, तर मग ३६ केंद्रीय मंत्र्यांना तिकडे पाठवायचे कारण काय, असा प्रश्न काँग्रेसने गुरुवारी सरकारला विचारला. ‘प्रचार करणारे’ पाठवण्याची गरज का निर्माण झाली, असे ज्येष्ठ नेते कपिल सिबल यांनी टिष्ट्वटरवर विचारले.

जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा असलेला घटनेतील अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर त्याचे सकारात्मक परिणाम काय आहेत आणि राज्यात विकासाच्या सुरू असलेल्या कामांची माहिती देण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांचा एक गट या महिन्यात राज्याचा दौरा करणार आहे. या दौऱ्याचे अंतिम स्वरूप शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरणार आहे.

‘अमित शहा म्हणाले की, काश्मीरमध्ये सर्व काही सामान्य आहे. जर तसे आहे, तर ३६ प्रचार करणाऱ्यांना काश्मीरमध्ये पाठवण्याची गरज का? तेथील परिस्थिती समजून घेण्यासाठी प्रचार न करणाºयांना का जाऊ दिले जात नाही’, असे कपिल सिबल यांनी विचारले. १८ ते २४ जानेवारीदरम्यान केंद्रशासित प्रदेशच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांत दौरा करतील व गृहमंत्रालय त्यांच्या भेटीचे समन्वयन करील.स्थिती सामान्य नव्हे, तर घबराटीची‘३६ मंत्री जम्मू आणि काश्मीरमध्ये सहा दिवस फिरतील, हे परिस्थिती सामान्य नव्हे, तर घबराट असल्याचे चिन्ह आहे. अनुच्छेद ३७० रद्द करणे ही घोडचूक असून, या अशा तात्पुरत्या उपायांनी काही साध्य होणार नाही, असे पक्षाचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले. अनुच्छेद ३७० रद्द झाल्यापासून केंद्रीय मंत्र्यांनी जम्मू आणि काश्मीरचा दौरा करण्याची ही दुसरी वेळ आहे.

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरcongressकाँग्रेसBJPभाजपा