शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

जर सरदार पटेल देशाचे पहिले पंतप्रधान असते तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 15:48 IST

झारखंडमध्ये मॉब लिंचिगचं प्रकरण झालं. युवकाची हत्या करण्यात आली. हे दुख:दायक आहे. दोषींना कठोर शासन होईल. मात्र अशा घटनांसाठी एका राज्याला जबाबदार धरणे कितपत योग्य आहे?

नवी दिल्ली - काँग्रेस फक्त ईव्हीएमचा विरोध करत नाही तर सर्वच गोष्टीचा विरोध करतं. विरोधी पक्षाचा अर्थ शब्दानुरुप काँग्रेसने घेतला आहे. डिजिटल व्यवहारांना विरोध, आधारला विरोध जर आम्ही नवीन भारत बनवत आहे त्याला विरोध, जीएसटीला विरोध अशा सर्वच गोष्टींना विरोध करणे म्हणजे नकारात्मकता आहे. ज्या लोकांनी फक्त विरोधाचं काम केलं.

सरकारच्या प्रत्येक कामाला विरोध करणाऱ्यांनी देशातील जनतेने शिक्षा दिली आहे. लोकसभा नव्हे तर राज्यसभेत काय करताय हे बघूनच जनतेने मतदान केलं असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगावला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना मोदींनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. 

जुना भारत कसा हवा आहे?न्यू इंडियाचा विरोध केला जात आहे. काही चुकीचं असू शकेल पण सर्वच चुकीचं आहे सांगणे किती योग्य आहे? आम्हाला जुना भारत हवा आहे म्हणजे कसा भारत हवा आहे? कॅबिनेटचा निर्णय फाडून फेकून देणं. जिथे सगळीकडे फक्त घोटाळे आणि घोटाळेच होते. गॅस कनेक्शनसाठी रांगेत उभं राहायला लागत होतं. पासपोर्टसाठी महिनाभर वाट बघावी लागत होती. देशाची जनता आता जुन्या काळात जाऊ इच्छित नाही. आम्ही सामान्य माणसांची स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही नीती आणि रणनीती बदलत आहोत. पाच वर्षात अनेकांनी घरे मिळाली, वीज मिळाली. आम्ही मोठे झालो नाही गरिबांच्या छोट्या छोट्या समस्या सोडविल्या. 

हिंसाचाराच्या घटनांवर राजकारण नको झारखंडमध्ये मॉब लिंचिगचं प्रकरण झालं. युवकाची हत्या करण्यात आली. हे दुख:दायक आहे. दोषींना कठोर शासन होईल. मात्र अशा घटनांसाठी एका राज्याला जबाबदार धरणे कितपत योग्य आहे? सर्वांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं राजकारण केल्याने परिस्थिती सुधारणार नाही. गुन्हा घडल्यानंतर संविधान, कायदा आणि व्यवस्था आहे. दोषींना शिक्षा देण्यासाठी जे करता येणं शक्य आहे ते सर्व करणारच. हिंसाचाराच्या घटनांवर राजकारण करु नये. 

सरदार पटेलांनी आम्हाला सन्मान दिलाजर सरदार वल्लभभाई पटेल पहिले पंतप्रधान असते तर काश्मीर समस्या नसती. त्यांनी 500 संस्थानं खालसा केली. सरदार पटेल काँग्रेसचे होते. त्यांनी काँग्रेससाठी आयुष्य खर्च केले. देशाच्या निवडणुकीत सरदार पटेल दिसत नसले तरी गुजरातच्या निवडणुकीत ते नेहमी दिसतात. आम्ही तुमच्या पक्षातील नेत्याची सर्वात मोठी प्रतिमा गुजरातमध्ये बनविली आहे. काँग्रेस नेत्यांनी त्याठिकाणी जाऊन पाहिलं पाहिजे. 

बिहारमधील चमकी ताप ही लाजिरवाणी बाब आयुष्यमान भारत योजनेवर सभागृहात प्रश्न उपस्थित केले जातात. पाच वर्षात अनेक खासदारांनी पंतप्रधान सहाय्यता निधीतून मदत देण्याची विनंती केली. आयुष्यमान भारतची ताकद काय आहे हे त्या खासदारांना माहित आहे. ज्यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी पत्र दिलं आज एकही पत्र पेडिंग नाही. कारण त्याला आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळतो. एका आजाराने 20 वर्षाची मेहनत वाया जाते. श्रेय मोदी घेऊन जाईल याची चिंता करु नका. 2024 मध्ये नवीन योजना घेऊन येऊ. बिहारमध्ये आलेला चमकी ताप आपल्यासाठी लाजिरवाणी बाब आहे. हे गांभीर्याने घ्यायला हवं. बिहारला या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आरोग्यमंत्री यावर लक्ष ठेऊन आहेत.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस